शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

पोषक वातावरणामुळे वाढला मधाचा गोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:37 IST

चांदोरी : यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे फुल्ल आहेत. शिवाय, थंडीचा कडाकाही वाढला असून, शेतशिवार पिकांनी बहरून गेले आहे. यामुळे मधनिर्मितीसाठीचा मकरंद सहज उपलब्ध होऊ लागल्याने या परिसरात मधमाश्यांची संख्या वाढली आहे. शिवाय, मधाची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांना यामुळे अधिकचा मध उपलब्ध होत आहे.

ठळक मुद्देसध्या सर्व पिके बहरले असल्याने मधमाश्यांना मकरंद सहज उपलब्ध

चांदोरी : यंदा पाऊस चांगला झाल्याने पाणीसाठे फुल्ल आहेत. शिवाय, थंडीचा कडाकाही वाढला असून, शेतशिवार पिकांनी बहरून गेले आहे. यामुळे मधनिर्मितीसाठीचा मकरंद सहज उपलब्ध होऊ लागल्याने या परिसरात मधमाश्यांची संख्या वाढली आहे. शिवाय, मधाची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांना यामुळे अधिकचा मध उपलब्ध होत आहे.मध हा चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्त असल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मधविक्रेते झाडांच्या फांद्याना लागलेला मधाचा गोळा विक्रीस आणतात. यामुळे ग्राहकांना १०० टक्के शुद्ध मध असल्याची खात्री पटते. निफाड तालुक्यात मध ३०० ते ५०० रुपये किलोपर्यंत विक्री केला जातो. मागील काही दिवसांत कमी पाणी तसेच वातावरणात होणारे बदल यामुळे मध विक्री करणाऱ्या लोकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला होता.मात्र, सध्या सर्व पिके बहरले असल्याने मधमाश्यांना मकरंद सहज उपलब्ध होत आहे. यंदा पोषक वातावरणामुळे मधाचा गोडवा वाढला आहे. तसेच मध विक्री करणाऱ्या युवकांना सहज मध उपलब्ध होत आहे. शिवाय, मधमाश्यांमुळे होणाऱ्या परागीभवनामुळे शेती उत्पादनास वाढ होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :nifadनिफाडFarmerशेतकरी