शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

‘गोड’ द्राक्ष भावाअभावी ‘आंबट’; एकरी २० हजारांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:32 IST

कर्जाचा डोंगर, वाढलेली मजुरी, महागडी औषधे, कुटुंबाचे कष्ट आणि वर्षभर नैसर्गिक  आपत्तींचा सामना करीत पिकविलेल्या गोड द्राक्षांना भाव नसल्याने बागायतदारांना ती ‘आंबट’ लागत आहेत.

योगेश सगर ।कसबे सुकणे : कर्जाचा डोंगर, वाढलेली मजुरी, महागडी औषधे, कुटुंबाचे कष्ट आणि वर्षभर नैसर्गिक  आपत्तींचा सामना करीत पिकविलेल्या गोड द्राक्षांना भाव नसल्याने बागायतदारांना ती ‘आंबट’ लागत आहेत.  ‘ग्रीन बेल्ट’ अर्थात द्राक्षपंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक घटणाºया भावामुळे चिंंतातुर आहेत. ३५ ते ४० रुपये भाव, पावसामुळे घटलेले उत्पादन व झालेला खर्च पाहता त्यांना एकरी १५ ते २० हजार रुपये तोटा होत आहे. मजुरी, औषधे, खते, संप्रेरक, ट्रॅक्टर डीझेल, ठिंबक, स्प्रिंकलर, मेंटेनन्स आदींचा खर्च एकरी सव्वा ते दीड लाखांपर्यंत जातो. त्यातच आर्थिक वर्ष संपत आल्याने बँकांनी बागायदारांकडे कर्जवसुलीचा तगादा लावला आहे.यंदा उत्पादन घटले- नाशिक जिल्ह्यात सुमारे अडीच ते पावणे तीन लाख एकरावर विविध जातीच्या द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रात ३५ ते ४० लाख टन उत्पादन होते. यात नाशिक जिल्ह्याचा वाटा २५ ते ३० लाख टन आहे. यंदा निफाडसह नाशिक, दिंडोरीतील द्राक्षबागांचे अवेळी पावसाने ३५ ते ४०% नुकसान झाले. एकरी १४ ते १५ टन द्राक्षऐवजी ते ७ ते ८ टन उत्पादन झाले. निफाडच्या खेरवाडी, ओणे, सुकेणे, चांदोरी, नाशिकच्या गिरणारे, दुगाव, मखमलाबाद, दरी-मातोरी, जलालपूर व दिंडोरीच्या पश्चिम भागाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झाले. त्यामुळे निर्यातक्षम व लोकलच्या द्राक्ष उत्पादनात निम्म्याने घट झाली.10%  वाइनरी सुरूवाइन कॅपिटल असलेल्या नाशिक जिल्ह्यात ६० वायनरी आहेत. यातील केवळ सात ते आठ वायनरी सुरू आहेत. जेमतेम एक टक्का द्राक्षे वायनरीला जातात. सध्या दर्जानुसार वाइनरीच्या द्राक्षांना ६० रुपयांपर्यंंत भाव मिळत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी