शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबक देवस्थानाला म्हणणे मांडण्यास सर्वोच्च न्यायालयची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:18 IST

देवस्थानाचे हित लक्षात घेवून जनहित याचिका दाखल केली असली तरी, त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या खात्याच्या आडमुठेपणामुळे अनेक प्रश्न सुटू शकले नसल्याने जनहित याचिकेने काय साध्य होणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देविश्वस्त नेमणुकीस स्थगिती नाही : संमिश्र मते देवस्थानावरही जिल्हा न्यायाधिशांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करावी

नाशिक : कोल्हापुर, तुळजापूर, पंढरपूर देवस्थानाप्रमाणे त्र्यंबकेश्वर देवस्थानावरही जिल्हा न्यायाधिशांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करावी व विश्वस्तांची संख्या वाढवून मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने त्र्यंबकेश्वर देवस्थान, राज्य सरकार व धर्मादाय आयुक्तांना दोन महिन्यात म्हणणे मांडण्याची मुभा दिली असली तरी, विद्यमान विश्वस्तांची मुदत संपल्याने त्यांच्या जागी अन्य विश्वस्तांची नेमणूक न करण्यास कोणतीही स्थगिती न्यायालयाने दिलेली नसल्याने धर्मादाय आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, देवस्थानाचे हित लक्षात घेवून जनहित याचिका दाखल केली असली तरी, त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या खात्याच्या आडमुठेपणामुळे अनेक प्रश्न सुटू शकले नसल्याने जनहित याचिकेने काय साध्य होणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त ललीता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून त्यात प्रामुख्याने विश्वस्तांची संख्या ९ वरून १३ करणे व त्यात ५० टक्के महिलांचा समावेश करणे, अन्य देवस्थानाप्रमाणे जिल्हा न्यायाधिशांऐवजी जिल्हाधिका-यांना विश्वस्त प्रमुखपदी नेमणे या तीन मागण्या केल्या आहेत. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत संबंधितांना नोटीसा बजावून दोन महिन्यात या विषयावर म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे प्रतिवादींकडून दिला जाणारा खुलासा व त्यावर न्यायालयाचा निर्णय यासा-या गोष्टीस किती कालावधी लागेल याविषयी अंदाज बांधणे कठीण असले तरी, तो पर्यंत नवीन विश्वस्तांच्या नेमणुकीचा प्रश्न कायम आहे. न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत नवीन विश्वस्त नेमणुकीस कोठेही स्थगिती दिलेली नसल्याचे याचिकाकर्ते शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी रद्द केलेल्या मुलाखती होतील कि नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. जिल्हान्यायाधिश विश्वस्त प्रमुख असल्यामुळे भाविकांच्या सोयीचे अनेक निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले असून, त्यांच्यापाठी असलेला कामाचा व्याप, जनतेशी व भाविकांशी थेट संवाद नसल्यामुळे भाविकांच्या दृष्टीने फारसा फायदा होत नाही, त्यामुळे जिल्हाधिकाºयांची विश्वस्त प्रमुखपदी नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एकाअर्थाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे रास्त असले तरी, त्र्यंबकेश्वर मंदिरावर पुरात्व खात्याचा कब्जा असून, याठिकाणी कोणतेही काम पुरातत्व खात्याच्या अनुमतीशिवाय करता येत नाही व कोणत्याही कामाला सहजासहजी अनुमती मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे.

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिक