शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

त्र्यंबक देवस्थानाला म्हणणे मांडण्यास सर्वोच्च न्यायालयची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 16:18 IST

देवस्थानाचे हित लक्षात घेवून जनहित याचिका दाखल केली असली तरी, त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या खात्याच्या आडमुठेपणामुळे अनेक प्रश्न सुटू शकले नसल्याने जनहित याचिकेने काय साध्य होणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देविश्वस्त नेमणुकीस स्थगिती नाही : संमिश्र मते देवस्थानावरही जिल्हा न्यायाधिशांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करावी

नाशिक : कोल्हापुर, तुळजापूर, पंढरपूर देवस्थानाप्रमाणे त्र्यंबकेश्वर देवस्थानावरही जिल्हा न्यायाधिशांऐवजी जिल्हाधिकाऱ्यांची नेमणूक करावी व विश्वस्तांची संख्या वाढवून मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर न्यायालयाने त्र्यंबकेश्वर देवस्थान, राज्य सरकार व धर्मादाय आयुक्तांना दोन महिन्यात म्हणणे मांडण्याची मुभा दिली असली तरी, विद्यमान विश्वस्तांची मुदत संपल्याने त्यांच्या जागी अन्य विश्वस्तांची नेमणूक न करण्यास कोणतीही स्थगिती न्यायालयाने दिलेली नसल्याने धर्मादाय आयुक्त काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. दरम्यान, देवस्थानाचे हित लक्षात घेवून जनहित याचिका दाखल केली असली तरी, त्र्यंबकेश्वर मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने गेल्या अनेक वर्षापासून या खात्याच्या आडमुठेपणामुळे अनेक प्रश्न सुटू शकले नसल्याने जनहित याचिकेने काय साध्य होणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या विश्वस्त ललीता शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून त्यात प्रामुख्याने विश्वस्तांची संख्या ९ वरून १३ करणे व त्यात ५० टक्के महिलांचा समावेश करणे, अन्य देवस्थानाप्रमाणे जिल्हा न्यायाधिशांऐवजी जिल्हाधिका-यांना विश्वस्त प्रमुखपदी नेमणे या तीन मागण्या केल्या आहेत. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत संबंधितांना नोटीसा बजावून दोन महिन्यात या विषयावर म्हणणे मांडण्याची मुदत दिली आहे. त्यामुळे प्रतिवादींकडून दिला जाणारा खुलासा व त्यावर न्यायालयाचा निर्णय यासा-या गोष्टीस किती कालावधी लागेल याविषयी अंदाज बांधणे कठीण असले तरी, तो पर्यंत नवीन विश्वस्तांच्या नेमणुकीचा प्रश्न कायम आहे. न्यायालयाने जनहित याचिकेच्या सुनावणीत नवीन विश्वस्त नेमणुकीस कोठेही स्थगिती दिलेली नसल्याचे याचिकाकर्ते शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी रद्द केलेल्या मुलाखती होतील कि नाही याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे. जिल्हान्यायाधिश विश्वस्त प्रमुख असल्यामुळे भाविकांच्या सोयीचे अनेक निर्णय घेण्यात अडचणी येत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले असून, त्यांच्यापाठी असलेला कामाचा व्याप, जनतेशी व भाविकांशी थेट संवाद नसल्यामुळे भाविकांच्या दृष्टीने फारसा फायदा होत नाही, त्यामुळे जिल्हाधिकाºयांची विश्वस्त प्रमुखपदी नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे. एकाअर्थाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे रास्त असले तरी, त्र्यंबकेश्वर मंदिरावर पुरात्व खात्याचा कब्जा असून, याठिकाणी कोणतेही काम पुरातत्व खात्याच्या अनुमतीशिवाय करता येत नाही व कोणत्याही कामाला सहजासहजी अनुमती मिळत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे.

टॅग्स :TempleमंदिरNashikनाशिक