शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:31 IST

भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी समर्थन केले आहे.

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी समर्थन केले आहे. विशेष म्हणजे भाजपाने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून, त्याच्याशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, भाजपची मातृसंस्था म्हणविणाऱ्या आरएसएसचे वक्ते इंद्रेश कुमार यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी त्यांनी सत्य परिस्थिती कथन केल्याचे मत व्यक्त करीत नव्याने या वादाला तोंड फोडले आहे.मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना नाशकात ते बोलत होते. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरील आक्षेपांवर बोलताना निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज वैध ठरविला असल्याचे इंद्रेशकुमार यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञा यांची सहा पैकी चार आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली असून, दोन आरोपांमध्ये त्या जामिनावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या चार ते पाच वर्षांत देशात सहिष्णुतेचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा केला.धार्मिक भावना दुखावल्या नाहीदेशात गेल्या काही दिवसांमध्ये कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसल्याचे इंद्रेश कुमार यांनी कार्यशाळेत सांगितले मात्र एका तरुणाने त्यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला. आपल्याकडे गेल्या दोन महिन्यांतच काही ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी इंद्रेश कुमार यांनी गेल्या पाच वर्षांतील विविध घटनांचा दाखला देत देशात सकारात्मक बदल होत असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मात्र बगल देत त्यांनी देशात सहिष्णुतेचे वातावरण वाढले असून, गेल्या पाच वर्षांत जातीय दंगलींचे प्रमाण घटल्याचा दावाही केला.‘मिशन शक्ती’तून समरसतेचा संदेशराष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनाही इंद्रेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘मिशन शक्ती’ माध्यमातून समरसतेचा संदेश देताना जात-पात व कटरता मुक्त सन्मान आणि सहकार्याची भावना असलेला भारत निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी न्यू भारत फाउंडेशनच्या रेशमा एच. सिंह, लेखक तथा चित्रपट निर्माता अभिनव सिंह कश्यप उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा