शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 00:31 IST

भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी समर्थन केले आहे.

नाशिक : भारतीय जनता पक्षाच्या भोपाळ मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय वक्ते इंद्रेश कुमार यांनी समर्थन केले आहे. विशेष म्हणजे भाजपाने साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून, त्याच्याशी पक्षाचा कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु, भाजपची मातृसंस्था म्हणविणाऱ्या आरएसएसचे वक्ते इंद्रेश कुमार यांनी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याचे समर्थन करताना त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराविषयी त्यांनी सत्य परिस्थिती कथन केल्याचे मत व्यक्त करीत नव्याने या वादाला तोंड फोडले आहे.मुस्लीम राष्ट्रीय मंचाच्या कार्यक्रमासाठी आले असताना पत्रकारांशी संवाद साधताना नाशकात ते बोलत होते. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्या उमेदवारीवरील आक्षेपांवर बोलताना निवडणूक आयोगाने त्यांचा अर्ज वैध ठरविला असल्याचे इंद्रेशकुमार यांनी सांगितले. साध्वी प्रज्ञा यांची सहा पैकी चार आरोपांतून निर्दोष मुक्तता झाली असून, दोन आरोपांमध्ये त्या जामिनावर असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्या चार ते पाच वर्षांत देशात सहिष्णुतेचे वातावरण निर्माण होत असल्याचा दावा केला.धार्मिक भावना दुखावल्या नाहीदेशात गेल्या काही दिवसांमध्ये कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या गेल्या नसल्याचे इंद्रेश कुमार यांनी कार्यशाळेत सांगितले मात्र एका तरुणाने त्यांच्या विधानावर आक्षेप नोंदवला. आपल्याकडे गेल्या दोन महिन्यांतच काही ठिकाणी धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्याने सांगितले. त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. यावेळी इंद्रेश कुमार यांनी गेल्या पाच वर्षांतील विविध घटनांचा दाखला देत देशात सकारात्मक बदल होत असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मात्र बगल देत त्यांनी देशात सहिष्णुतेचे वातावरण वाढले असून, गेल्या पाच वर्षांत जातीय दंगलींचे प्रमाण घटल्याचा दावाही केला.‘मिशन शक्ती’तून समरसतेचा संदेशराष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या कार्यकर्त्यांनाही इंद्रेश कुमार यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी ‘मिशन शक्ती’ माध्यमातून समरसतेचा संदेश देताना जात-पात व कटरता मुक्त सन्मान आणि सहकार्याची भावना असलेला भारत निर्मितीसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी न्यू भारत फाउंडेशनच्या रेशमा एच. सिंह, लेखक तथा चित्रपट निर्माता अभिनव सिंह कश्यप उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNashikनाशिकRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा