शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

लासलगाव बाजार समितीकडून शेतकरी साठे यांचे समर्थन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 18:11 IST

कांदाप्रश्न : दीर्घकालीन उपाययोजनेची मागणी

ठळक मुद्देकांद्याचे बाजारभाव कमी झाले असून त्यातून लागवड खर्चही निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, शासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करत होळकर यांनी संजय साठे यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.

लासलगाव : कांद्याच्या लिलावातून आलेली तुटपुंजी रक्कम मनीआॅर्डरने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणारे नैताळे येथील शेतकरी संजय साठे चांगलेच चर्चेत आले असून लासलगाव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांनी साठे यांचेशी चर्चा करून वस्तुस्थिती जाणून घेतली. कांद्याचे बाजारभाव कमी झाले असून त्यातून लागवड खर्चही निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, शासनाने तातडीने उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करत होळकर यांनी संजय साठे यांच्या कृतीचे समर्थन केले आहे.होळकर यांनी सांगितले, लासलगाव बाजार समितीचे निफाड येथील उपबाजार आवारात नैताळेचे शेतकरी संजय बाळकृष्ण साठे यांनी दि. २९ नोव्हेंबर रोजी कांदा विक्र ीस आणलेला होता. सदर कांदा कमी दराने विक्र  झाला होता. सदर  कांदा खराब व हलका दर्जाचा असल्याबाबत बाजार समितीने शासनास कळविल्याची चुकीची चर्चा पसरवली जात आहे. वास्तविक बाजार समितीने कांदा खराब असल्याबाबतची कोणतीही माहिती शासनास पुरवलेली नसल्याचेही होळकर यांनी स्पष्ट केले आहे.कांद्याचे बाजारभाव कमी झालेले असून शेतकऱ्यांचा कांदा लागवड खर्च देखील निघत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यासाठी शासनाने कांद्यासाठी भावांतर योजना लागु करावी, कांद्याला ५०० रुपये प्रती क्विंटल अनुदान देण्यात यावे, इतर शेतीमालाप्रमाणे कांदा खरेदीदारांना ट्रान्झिट सबसिडी द्यावी, निर्यातसाठी प्रयत्न करणेसाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, किंमत स्थिरीकरण निधीचा वापर ग्राहकांबरोबर उत्पादकांसाठी करण्यात यावा, कांदा निर्यात प्रोत्साहन योजनेच्या दरात वाढ करून सदर योजनेस दीर्घकाळ मुदतवाढ द्यावी आदी अनेक उपाययोजना शासनाला वेळोवेळी निवेदनाद्वारे सुचविलेल्या असल्याचेही जयदत्त होळकर यांनी म्हटले आहे.प्रस्ताव केंद्राला रवानाबाजार समितीने दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त कांदा निर्यात होणेसाठी कांदा निर्यातदारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कांदा निर्यात प्रोत्साहन योजना दीर्घकाळासाठी लागू करु न त्यात १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठविलेला असल्याची माहितीही जयदत्त होळकर यांनी दिली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकonionकांदा