शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
2
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
3
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
4
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
5
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
6
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
7
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
8
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
9
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
10
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
11
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
13
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
14
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
15
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
16
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
17
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
18
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
19
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
20
संजय शिरसाटांचा उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप; अजित पवारांनी एका वाक्यात उत्तर दिले...

विजेच्या तारांमुळे अडले रविवार कारंजा रस्त्याचे घोडे

By admin | Updated: February 12, 2015 00:49 IST

नागरिकांचे हाल : पालिकेनेही केले हात वर; महावितरणकडे ताराच शिल्लक नाहीत

नाशिक : शहरातील महत्त्वाच्या अशा अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यानच्या रस्ता कॉँक्रिटीकरणाचे काम आता महावितरणमुळे खोळंबले आहे. विजेच्या तारा भूमिगत करण्यासाठी महावितरणकडे ताराच शिल्लक नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला आहे. तथापि, रहदारीच्या या मार्गावरील नागरिकांना रस्त्याच्या अर्धवट कामामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, महापालिकेने त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.महापालिकेच्या वतीने कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण, डांबरीकरण आणि काही भागात कॉँक्रिटीकरण करण्यात येत आहे. त्याच अंतर्गत अशोकस्तंभ ते रविवार पेठ दरम्यान कॉँक्रिटीकरणाचे काम तीन महिन्यांपूर्वी सुरू करण्यात आले आहे. रहदारीच्या दृष्टीने हा रस्ता वाहता आहे. हा रस्ता बंद करून वाहतूक घारपुरे घाटाकडून वळविण्यात आल्याने आधीच गोंधळ होत आहे. त्यातच अशोकस्तंभ ते रविवार कारंजा दरम्यान शेकडो नागरिक वास्तव्यास आहेत. त्यापलीकडे जाऊन नाशिकचा घाऊक बाजार येथे असून तेल, तूप, गूळ, तांदळासह अन्य अनेक अन्न-धान्याची बाजारपेठ येथे आहे. रस्ता बंद असल्याने आणि अर्धवट कामामुळे त्यांना या रस्त्यावरून माल ने-आण करणे अडचणीचे ठरले आहे. तरीही शहरच्या दृष्टीने हा महत्त्वाचा रस्ता असल्याने त्याचे काम चांगलेच व्हावे, यासाठी व्यापारी आणि नागरिकांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तथापि, या रस्त्याचे काम रखडल्याने ते कधी पूर्ण होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.कॉँक्रिटीकरण केल्यानंतर ते काम दीर्घकाळ टिकते त्यामुळे रस्ता होण्याच्या आत गटारींची कामे, मलवाहिका टाकणे तसेच विजेच्या तारा भूमिगत करणे अशी विविध कामे करण्यात येणार आहेत. तथापि, महावितरणचे काम रखडल्याने रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले आहे. यासंदर्भात या भागातील नागरिकांनी मंगळवारी खरवंदा पार्क येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सोनुले यांची भेट घेतली आणि वीज तारांचे काम का रखडले, अशी विचारणा केली, त्यावर त्यांनी महावितरणकडे या कामासाठी ताराच शिल्लक नाही आणि आता नवीन प्राकलन बनवावे लागेल, असे उत्तर दिल्याने नागरिक सर्द झाले आहेत. रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करावे अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)