शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

उन्हाचा तडाखा : नाशिकच्या ‘देवराई‘वरील रोपट्यांना हवी तरुण हातांची ऊर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 16:26 IST

आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे.

ठळक मुद्दे संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन बोटावर मोजण्याइतक्या स्वयंसेवकांची धडपडवनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेने संयुक्तरीत्या ३४ महिन्यांपूर्वी वनमहोत्सव राबविला

नाशिक : नाशिकच्या ‘देवराई’द्वारे हरित भविष्य साकारण्यासाठी ५ जून २०१५ रोजी हजारो आबालवृद्ध नाशिककर सातपूर येथील वनविभागाच्या जागेवर (फाशीचा डोंगर) आपलं पर्यावरण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकत्र आले होते. वनमहोत्सवातून त्यावेळी तब्बल ११ हजार रोपांची लागवड झाली. तीन वर्षांत रोपांचीही चांगली वाढ झाली असून, किमान पुढील दोन वर्षे तरी नाशिककरांना रोपांच्या संवर्धनाची काळजी घ्यावीच लागणार आहे. मार्चचा अखेरचा आठवडा सुरू असून, सूर्य तळपू लागल्याने उन्हाची तीव्रता वाढत आहे. देवराईला तरुण हातांची प्रतीक्षा कायम असून, दर रविवारी तरुणाईने देवराईकडे पाऊल वळवून हरित नाशिकसाठी हातभार लावण्याचा प्रयत्न क रणे आवश्यक आहे.वनविभाग व आपलं पर्यावरण संस्थेने संयुक्तरीत्या ३४ महिन्यांपूर्वी वनमहोत्सव राबविला. या वनमहोत्सवाला नाशिककरांचा मिळालेला अभूतपूर्व प्रतिसादामुळे दहा हजार रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण होऊन एक हजार अतिरिक्त रोपे लावण्यात आली. नाशिककरांनी एकाच दिवशी ११ हजार रोपांची लागवड यशस्वीपणे करून दाखविल्याने हा ‘नाशिक पॅटर्न’शासनाचा लक्षवेधी ठरला. ‘देवराई’निर्मितीचा पॅटर्न राज्यभर राबविण्याचे धोरण वन मंत्रालयाने घेत ५० कोटी झाडे लागवडीचा संकल्प सोडला.आपलं पर्यावरण संस्थेकडून तीन वर्षांपासून येथील रोपट्यांचे संगोपन-संवर्धन करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे; मात्र काही स्वयंसेवक उच्च शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने शहराबाहेर स्थायिक झाल्याने मनुष्यबळ तोकडे पडू लागले आहे. वनविभाग, वनविकास महामंडळ, सामाजिक वनीकरण विभागाकडूनही आठवड्यातून एक दिवस तरी या ठिकाणी वनमजुरांना पाचारण करण्याची मागणी होत आहे.

बोटावर मोजण्याइतक्या स्वयंसेवकांची धडपडबोटावर मोजण्याइतके स्वयंसेवक वीकेण्डला येथे चार ते पाच तास श्रमदान करून जगलेल्या रोपांना वाढविण्याचा कसोशीने प्रयत्न क रत आहेत. महाविद्यालयीन तरुणांचे ग्रुप व विविध शाळा-महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना, हरित सेना, स्काउट-गाइड दलाचे विद्यार्थ्यांनी दर शनिवार, रविवारी देवराईला भेट देऊन श्रमदान के ल्यास येथील हजारो रोपांची अधिक वेगाने वाढ होण्यास मदत होईल. मार्च अंतिम टप्प्यात आला असून, पुढील दोन महिने प्रखर ऊन पडणार असून तपमानात वाढ होणार आहे. त्यामुळे आता रोपांना पाणी देण्याची गरज अधिक वाढली आहे; कारण सूर्य तळपू लागला असून, उन्हाची तीव्रता वाढत आहे.

टॅग्स :NashikनाशिकNatureनिसर्गenvironmentवातावरण