शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
3
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
4
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
5
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
6
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
7
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
8
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
9
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
10
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
11
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
12
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
13
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
14
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
15
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
16
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
17
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
18
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
19
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
20
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?

जिल्ह्यात कांद्याला उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 00:46 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या ...

ठळक मुद्देआवकेत वाढ, दरात घट : उष्णतेमुळे नवीन कांदा लवकर होतोय परिपक्व

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे कांदे लवकर परिपक्व होऊ लागल्याने वणी व दिंडोरी बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू होऊ लागली आहे. परिणामी दरात घट होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.सध्या उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम कांदा पिकावर झाल्याने कांदा पक्का झाला. परिणामी घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घट झाल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.१ मार्च २०२१ ते १० मार्च या कालावधीत विक्रमी वाहनांची आवक१) जिल्हा परिषद वाहने :- १०६० कांदा वाहतुकीसाठी वापरात आली.२) ट्रॅक्टर :- १४२१ ,कांदा वाहतुकीसाठी वापरात आले.दि. १ ते १० मार्चपर्यंत वणी व दिंडोरीत आवक व भावलाल कांदा आवक :- १३००० क्विंटल. (भाव ८०० ते २८६१ रुपये)उन्हाळी कांदा:-२१५०० क्विंटल (९०० ते २८६० रुपये)गोल्टी कांदा (२०० ते २५०० रुपये)एकूण आवक :- ३४५०० क्विंटलकांद्याची आवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून अत्यंत मेहनत करून, अतिशय महागडी औषधे खरेदी करूनही भाव मिळत नसेल तर विविध बँक, सोसायटी, पतसंस्थांचे कर्ज फेडायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.येवला तालुक्यात पिके कोमेजलीमानोरी : एकीकडे कांद्याच्या दरात घसरण, दुसरीकडे पालखेड आवर्तनाकडे नजरा तर तिसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे. येवल्याच्या पश्चिम भागात विहिरींनी तळ गाठल्याने कांद्यासाठी पाणीच राहत नसल्याने वाढत्या उष्णतेमुळे कांद्याची पिके कोमेजू लागली आहेत. काही ठिकाणी पाणी आहे असून थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. सरकारने वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश मागे घेण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.उन्हाळी आणि लाल कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली असून यंदा अवकाळी पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी वर्गाने मिळेल तेथून कांद्याची रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्याच्या बियाणांमध्ये फसगत झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.दरम्यान, कांद्याच्या दरात सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने उन्हाळी आणि लाल कांदा काढणीला वेग आला असून कांद्याचे दर अजून किती कमी होतील याची शाश्वती नसल्याने बाजार समित्यांत कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असून आवक दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे.उष्णता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळी कांद्याला देण्यासाठी मुबलक पाणी विहिरीत येत नसल्याने शेतकरी वर्गाकडून पालखेड आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळी कांद्याला अद्यापही चार ते पाच पाणी मुबलक प्रमाणात देणे गरजेचे असून पालखेड आवर्तनातून वितरीका क्र. २१ , २५ व २८ ला आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.विहिरींनी तळ गाठल्यानंतर कांद्याला पाणी भरण्यासाठी तारेवरची कसरत शेतकरी वर्गाला करावी लागत असतानाच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने स्थगित केलेली वीज पुरवठा खंडितचा आदेश मागे घेत पुन्हा थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिल्यानंतर शेतकरी वर्गाकडून या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीजपुरवठा खंडित करून शेतकरी वर्गाची बोळवण होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा