शहरं
Join us  
Trending Stories
1
"याच्या तळाशी जाऊ, कोणालाही सोडणार नाही"; दिल्ली बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्यांना पंतप्रधान मोदींचा स्पष्ट इशारा
2
Delhi Red Fort Blast : 'आम्ही दोषींना सोडणार नाही...', दिल्ली स्फोटांवर राजनाथ सिंह यांचा इशारा
3
ऑपरेशन सिंदूर २.० सुरु होणार? दिल्लीतील आत्मघाती स्फोटानंतर मागणी जोर धरू लागली, एकजरी हल्ला झाला तरी... 
4
जैशच्या महिला विंगची 'ती' प्रमुख निघाली; कारमध्ये घेऊन फिरायची AK 47, कोण आहे डॉ. शाहीन शाहीद?
5
"मरे उनके दुश्मन..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या वाचून शत्रुघ्न सिन्हांचा राग अनावर
6
Adani Group Companies IPO: विमानतळ, मेटल, रस्ते आणि डेटा सेंटर्स... अदानींची लवकरच आयपीओ लाँच करण्याची तयारी; कमाईची मिळणार संधी
7
Delhi Blast : वडिलांचं निधन, आईची कॅन्सरशी झुंज, ४ बहि‍णींचा एकच भाऊ; शिवाची मन हेलावून टाकणारी गोष्ट
8
सकाळीच दिल्ली गाठली, दिवसभर कारमध्ये बॉम्ब घेऊन फिरला; चौथा दहशतवादी डॉक्टर कुठे कुठे गेला...
9
दिल्ली हादरवणारे ४ डॉक्टर! तिघांनी वेळीच अटक केली तर चौथ्याने स्वत:ला उडवून हाहाकार माजवला
10
एसआयपीला मोठा धक्का! एकाच महिन्यात ४४ लाखांहून अधिक SIP बंद; गुंतवणुकदार का घेताहेत माघार?
11
भारतासाठी खुशखबर! डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले 50% टॅरिफ कमी करण्याचे संकेत, म्हणाले...
12
दिल्ली कार स्फोटाच्या धक्क्यानंतर लाल किल्ल्याबाबत घेण्यात आला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
Delhi Blast :"४ वर्षांपूर्वी घरातून निघून गेला, आम्हाला..."; अटक केलेल्या डॉक्टरच्या आईचा धक्कादायक खुलासा
14
"त्याच्या निधनानंतर माझ्यातली निरागसता...", सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत शहनाज गिल भावुक
15
Delhi Blast : "आम्ही गेट उघडलं आणि पळत सुटलो..."; दिल्ली स्फोटादरम्यान प्रत्यक्षदर्शीने कसा वाचवला जीव?
16
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
17
लाल किल्ला बॉम्बस्फोटानंतर मोठा प्रश्न! सामान्य जीवन विमा पॉलिसीत दहशतवादी हल्ले कव्हर होतात का?
18
IPL Trade Rules: संजू-जड्डू जोडी अदलाबदलीच्या खेळामुळे चर्चेत! जाणून घ्या त्यासंदर्भातील नियम
19
प्रेमानंद महाराज सांगतात, 'बुधवारी केस कापल्याने येते धन-समृद्धी आणि टळतो अकाली मृत्यू!'
20
माधुरी दीक्षितची कार्बन कॉपी, आजही अगदी तशीच दिसते 90sची अभिनेत्री; ओळखलंत का?

जिल्ह्यात कांद्याला उन्हाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 00:46 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या ...

ठळक मुद्देआवकेत वाढ, दरात घट : उष्णतेमुळे नवीन कांदा लवकर होतोय परिपक्व

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी व मार्च महिन्याच्या सुरुवातीला उन्हाच्या तीव्रतेमुळे कांदा पिकाला तडाखा बसत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे कांदे लवकर परिपक्व होऊ लागल्याने वणी व दिंडोरी बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू होऊ लागली आहे. परिणामी दरात घट होण्याची शक्यता व्यापारी वर्गातून व्यक्त केली जात आहे.सध्या उन्हाळी कांद्याचा हंगाम सुरू झाला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उन्हाचा तडाखा वाढल्याने त्याचा परिणाम कांदा पिकावर झाल्याने कांदा पक्का झाला. परिणामी घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घट झाल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.१ मार्च २०२१ ते १० मार्च या कालावधीत विक्रमी वाहनांची आवक१) जिल्हा परिषद वाहने :- १०६० कांदा वाहतुकीसाठी वापरात आली.२) ट्रॅक्टर :- १४२१ ,कांदा वाहतुकीसाठी वापरात आले.दि. १ ते १० मार्चपर्यंत वणी व दिंडोरीत आवक व भावलाल कांदा आवक :- १३००० क्विंटल. (भाव ८०० ते २८६१ रुपये)उन्हाळी कांदा:-२१५०० क्विंटल (९०० ते २८६० रुपये)गोल्टी कांदा (२०० ते २५०० रुपये)एकूण आवक :- ३४५०० क्विंटलकांद्याची आवक दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत असून अत्यंत मेहनत करून, अतिशय महागडी औषधे खरेदी करूनही भाव मिळत नसेल तर विविध बँक, सोसायटी, पतसंस्थांचे कर्ज फेडायचे कसे अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.येवला तालुक्यात पिके कोमेजलीमानोरी : एकीकडे कांद्याच्या दरात घसरण, दुसरीकडे पालखेड आवर्तनाकडे नजरा तर तिसरीकडे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने येवला तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चांगलीच त्रेधा उडाली आहे. येवल्याच्या पश्चिम भागात विहिरींनी तळ गाठल्याने कांद्यासाठी पाणीच राहत नसल्याने वाढत्या उष्णतेमुळे कांद्याची पिके कोमेजू लागली आहेत. काही ठिकाणी पाणी आहे असून थकीत वीज बिलामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. सरकारने वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश मागे घेण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.उन्हाळी आणि लाल कांदा लागवडीत मोठ्या प्रमाणात विक्रमी वाढ झाली असून यंदा अवकाळी पावसामुळे रोपांचे नुकसान झाल्यानंतर शेतकरी वर्गाने मिळेल तेथून कांद्याची रोपे विकत घेऊन कांद्याची लागवड पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कांद्याच्या बियाणांमध्ये फसगत झाल्याचे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.दरम्यान, कांद्याच्या दरात सातत्याने मोठ्या प्रमाणात घसरण होत असल्याने उन्हाळी आणि लाल कांदा काढणीला वेग आला असून कांद्याचे दर अजून किती कमी होतील याची शाश्वती नसल्याने बाजार समित्यांत कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला येत असून आवक दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याचे दिसून येत आहे.उष्णता दिवसेंदिवस वाढतच चालली असल्याने विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. उन्हाळी कांद्याला देण्यासाठी मुबलक पाणी विहिरीत येत नसल्याने शेतकरी वर्गाकडून पालखेड आवर्तन सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. उन्हाळी कांद्याला अद्यापही चार ते पाच पाणी मुबलक प्रमाणात देणे गरजेचे असून पालखेड आवर्तनातून वितरीका क्र. २१ , २५ व २८ ला आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.विहिरींनी तळ गाठल्यानंतर कांद्याला पाणी भरण्यासाठी तारेवरची कसरत शेतकरी वर्गाला करावी लागत असतानाच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने स्थगित केलेली वीज पुरवठा खंडितचा आदेश मागे घेत पुन्हा थकबाकीदार शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा आदेश दिल्यानंतर शेतकरी वर्गाकडून या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीजपुरवठा खंडित करून शेतकरी वर्गाची बोळवण होत असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहेत.

टॅग्स :agricultureशेतीonionकांदा