शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पूर्व भागात उन्हाळ कांद्याची काढणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 00:46 IST

नाशिक तालुक्यातील पूर्व भागात उन्हाळ कांदा काढण्याच्या कामास वेग आला असून, शेतकऱ्यांनी काढलेल्या कांद्याची साठवणूक करण्यात सुरुवात केली आहे.

एकलहरे : नाशिक तालुक्यातील पूर्व भागात उन्हाळ कांदा काढण्याच्या कामास वेग आला असून, शेतकऱ्यांनी काढलेल्या कांद्याची साठवणूक करण्यात सुरुवात केली आहे.  उन्हाळ कांद्याची लागवड डिसेंबर ते जानेवारी महिन्यात केली जाते. साधारणत: हा कांदा मार्चअखेर व एप्रिलमध्ये काढला जातो. एकलहरे परिसरात काही शेतकऱ्यांचा उन्हाळ कांदा काढून झाला आहे, तर काही शेतकऱ्यांच्या शेतात कांदा काढण्याचे काम सुरू आहे.मजुरांकडून कांदा उपटून, खांडून, ट्रॅक्टरमध्ये भरून चाळीमध्ये साठवणूक करण्यासाठी नेला जात आहे. आर्थिक गरजेमुळे काही शेतकरी आपला कांदा लगेच मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात आहेत. नाशिक तालुका पूर्व भागात मजुरांची वानवा असल्याने ठेकेदारी पद्धतीने मजुरांकडून कांदा काढण्याचे काम केले जात आहे. सध्या लग्नसराई असल्याने अनेक शेतकºयांना मुला-मुलींच्या लग्नासाठी पैशांची आवश्यकता असल्याने शेतकºयांनी हा कांदा नाशिक बाजार समितीच्या सिन्नरफाटा उपबाजार, पेठरोडवरील मुख्य बाजार आवार, पिंपळगाव बसवंत, लासलगाव, सायखेडा येथील मार्केटमध्ये आपापल्या सोईने विक्रीसाठी नेण्यास सुरुवात केली आहे.लागवडीची धावपळएकलहरे परिसरातील शेतकरी बारमाही पाण्याची सोय असल्याने कायम भाजीपाला पिकवित असतात. सध्या कोबी, फ्लॉवर, करडई असा भाजीपाला लागवड करण्यासाठी रोपे तयार करून ठिकठिकाणी भाजीपाला लागवडीसाठी लगबग सुरू आहे. काही ठिकाणी कोबीच्या लागवडीनंतर बुरशीनाशक फवारणी सुरू आहे. नवीन कोबीची लागवड करण्यासाठी सºया तयार करून रोपांची लागवड केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonionकांदा