शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

मालेगाव तालुक्यात तरुण शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:55 IST

वजीरखेडे येथील घटना : कर्जाला कंटाळून घेतला निर्णय

ठळक मुद्देयाप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे

मालेगाव : दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन आलेल्या नैराश्यातुन तालुक्यातील वजीरखेडे येथील नीलेश धर्मराज ह्याळीज (२९) या तरुण शेतक-याने शनिवारी (दि.१५) पहाटे विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. नीलेशच्या नावावर सुमारे पाच लाख रुपये कर्ज आहे. तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा तर खरीप व रब्बी पिकेही हातची गेली आहेत.नीलेश ह्याळीज यांच्या  नावावर स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे ४ लाख व इतर १ लाख असे एकूण ५ लाख रुपये कर्ज आहे. शेतीतील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन आलेल्या नैराश्यातुन नीलेश याने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेश हा ह्याळीज कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. नीलेश हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई चित्रकला तसेच ऋषाली, प्रणाली, तृप्तीमाला, सपना या चार बहिणी आहेत. या घटनेची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ह्याळीज कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. तर तहसिल कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद घेण्यात आली असून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या