शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात तरुण शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:55 IST

वजीरखेडे येथील घटना : कर्जाला कंटाळून घेतला निर्णय

ठळक मुद्देयाप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे

मालेगाव : दुष्काळी परिस्थिती, सततची नापिकी व कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन आलेल्या नैराश्यातुन तालुक्यातील वजीरखेडे येथील नीलेश धर्मराज ह्याळीज (२९) या तरुण शेतक-याने शनिवारी (दि.१५) पहाटे विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. नीलेशच्या नावावर सुमारे पाच लाख रुपये कर्ज आहे. तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा तर खरीप व रब्बी पिकेही हातची गेली आहेत.नीलेश ह्याळीज यांच्या  नावावर स्टेट बॅँक आॅफ इंडियाचे ४ लाख व इतर १ लाख असे एकूण ५ लाख रुपये कर्ज आहे. शेतीतील उत्पन्न घटल्याने कर्जाची परतफेड कशी करायची या विवंचनेतुन आलेल्या नैराश्यातुन नीलेश याने विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेश हा ह्याळीज कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता. नीलेश हा अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई चित्रकला तसेच ऋषाली, प्रणाली, तृप्तीमाला, सपना या चार बहिणी आहेत. या घटनेची माहिती तहसिलदार ज्योती देवरे यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन ह्याळीज कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली आहे. तर तहसिल कार्यालयात शेतकरी आत्महत्येची नोंद घेण्यात आली असून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला जाणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिकfarmer suicideशेतकरी आत्महत्या