शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:23 IST

नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

नाशिक : नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. कंधाणे (ता. बागलाण) येथील शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष  प्राशन करून जीवनयात्रा संपवली. बिरारी यांच्या नावे सोसायटीचे तीन लाखांचे  कर्ज आहे. गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे अडकवलेले भांडवल व येणारे उत्पादन यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेती करणे जिकिरीचे झाले होते. यातच शेतमालाच्या बाजारभावातील अस्थिरता ह्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासूनही वंचित राहिल्याने बिरारी सतत कर्जफेडीच्या विंवचनेत राहत होते. रविवारी (दि.१९) त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ सटाणा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.  उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, वडील असा परिवार आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सटाणा : शेतीसाठी बँक कर्ज देत नसल्याने नैराश्य आलेल्या बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील पस्तीस वर्षीय शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  प्रवीण कडू पगार असे या शेतकºयाचे नाव आहे. नोकरी मिळत नाही म्हणून शेती विकिसत करण्यासाठी प्रवीणची धडपड सुरू होती. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेत त्याने शेतीसाठी कर्ज प्रकरण केले. अनेकवेळा त्याने बँकेत हेलपाटे मारले; मात्र ऐनवेळी बँकेच्या अधिकाºयांनी कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे प्रवीणला नैराश्य आले. त्यातूनच प्रवीण सकाळी अचानक घरातून निघून गेला. घरी जेवणासाठी वाट बघणाºया आई-वडिलांनी दुपारचे तीन वाजले तरी प्रवीण घरी न आल्याने शोधाशोध केली असता एका शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवीणचा मृतदेह विहिरीतून काढला. पोलिसांना प्रवीणच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येचे कारण दिलेले आहे. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेने कर्ज दिले नाही म्हणून आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे त्याने नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गुरव यांनी पंचनामा केला. घटनास्थळी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी भेट दिली. जायखेडा पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या