शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:23 IST

नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

नाशिक : नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. कंधाणे (ता. बागलाण) येथील शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष  प्राशन करून जीवनयात्रा संपवली. बिरारी यांच्या नावे सोसायटीचे तीन लाखांचे  कर्ज आहे. गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे अडकवलेले भांडवल व येणारे उत्पादन यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेती करणे जिकिरीचे झाले होते. यातच शेतमालाच्या बाजारभावातील अस्थिरता ह्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासूनही वंचित राहिल्याने बिरारी सतत कर्जफेडीच्या विंवचनेत राहत होते. रविवारी (दि.१९) त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ सटाणा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.  उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, वडील असा परिवार आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सटाणा : शेतीसाठी बँक कर्ज देत नसल्याने नैराश्य आलेल्या बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील पस्तीस वर्षीय शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  प्रवीण कडू पगार असे या शेतकºयाचे नाव आहे. नोकरी मिळत नाही म्हणून शेती विकिसत करण्यासाठी प्रवीणची धडपड सुरू होती. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेत त्याने शेतीसाठी कर्ज प्रकरण केले. अनेकवेळा त्याने बँकेत हेलपाटे मारले; मात्र ऐनवेळी बँकेच्या अधिकाºयांनी कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे प्रवीणला नैराश्य आले. त्यातूनच प्रवीण सकाळी अचानक घरातून निघून गेला. घरी जेवणासाठी वाट बघणाºया आई-वडिलांनी दुपारचे तीन वाजले तरी प्रवीण घरी न आल्याने शोधाशोध केली असता एका शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवीणचा मृतदेह विहिरीतून काढला. पोलिसांना प्रवीणच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येचे कारण दिलेले आहे. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेने कर्ज दिले नाही म्हणून आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे त्याने नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गुरव यांनी पंचनामा केला. घटनास्थळी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी भेट दिली. जायखेडा पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या