शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

जिल्ह्यातील कंधाणे, उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 01:23 IST

नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

नाशिक : नापिकी, शेतमालाचे कोसळणारे बाजारभाव व कर्जाचा बोजा यामुळे जिल्ह्यातील कंधाणे आणि उत्राणे येथील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.दरम्यान, उत्राणे येथील पस्तीसवर्षीय शेतकºयाने कर्जमाफीसह मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याच्या नैराश्येतून जीवन संपवत असल्याचे मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. कंधाणे (ता. बागलाण) येथील शेतकरी बापू सीताराम बिरारी यांनी विष  प्राशन करून जीवनयात्रा संपवली. बिरारी यांच्या नावे सोसायटीचे तीन लाखांचे  कर्ज आहे. गेल्या तीन वर्षांपासून अत्यल्प पर्जन्यमानामुळे अडकवलेले भांडवल व येणारे उत्पादन यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत चालली असल्याने शेती करणे जिकिरीचे झाले होते. यातच शेतमालाच्या बाजारभावातील अस्थिरता ह्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेपासूनही वंचित राहिल्याने बिरारी सतत कर्जफेडीच्या विंवचनेत राहत होते. रविवारी (दि.१९) त्यांनी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले. घरातील सदस्यांचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तत्काळ सटाणा येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.  उपचारादरम्यान मंगळवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुली, वडील असा परिवार आहे. मंगळवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.सटाणा : शेतीसाठी बँक कर्ज देत नसल्याने नैराश्य आलेल्या बागलाण तालुक्यातील उत्राणे येथील पस्तीस वर्षीय शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही हृदयद्रावक घटना मंगळवारी (दि. २१) दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली.  प्रवीण कडू पगार असे या शेतकºयाचे नाव आहे. नोकरी मिळत नाही म्हणून शेती विकिसत करण्यासाठी प्रवीणची धडपड सुरू होती. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेत त्याने शेतीसाठी कर्ज प्रकरण केले. अनेकवेळा त्याने बँकेत हेलपाटे मारले; मात्र ऐनवेळी बँकेच्या अधिकाºयांनी कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे प्रवीणला नैराश्य आले. त्यातूनच प्रवीण सकाळी अचानक घरातून निघून गेला. घरी जेवणासाठी वाट बघणाºया आई-वडिलांनी दुपारचे तीन वाजले तरी प्रवीण घरी न आल्याने शोधाशोध केली असता एका शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह तरंगतांना आढळून आला.जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रवीणचा मृतदेह विहिरीतून काढला. पोलिसांना प्रवीणच्या खिशात चिठ्ठी सापडली असून, त्यात आत्महत्येचे कारण दिलेले आहे. साक्र ी तालुक्यातील म्हसदी येथील बँकेने कर्ज दिले नाही म्हणून आपण जीवनयात्रा संपवत असल्याचे त्याने नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक गुरव यांनी पंचनामा केला. घटनास्थळी तहसीलदार जितेंद्र कुंवर यांनी भेट दिली. जायखेडा पोलिसांनी घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या