शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

अतिवृष्टीमुळे यंदा उसाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 18:55 IST

जास्तीच्या पावसामुळे उसाची लागवड वाढू शकते असा अंदाज या क्षेत्रातील जाणकरांनी व्यक्त केला आहे. मागील वर्षी असलेल्या पाणीटंचाईमुळे उसाचे उत्पादन घटले, तर काही उसाच्या शेतात अजून पाणी साचून आहे. यामुळे यंदा १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता कमी आहे.

चांदोरी : जास्तीच्या पावसामुळे उसाची लागवड वाढू शकते असा अंदाज या क्षेत्रातील जाणकरांनी व्यक्त केला आहे.मागील वर्षी असलेल्या पाणीटंचाईमुळे उसाचे उत्पादन घटले, तर काही उसाच्या शेतात अजून पाणी साचून आहे. यामुळे यंदा १४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होण्याची शक्यता कमी आहे. निफाड तालुक्यातील रानवड व भाऊसाहेबनगर (पिंपळस) हे दोन कारखाने बंद असल्याने दिंडोरी तसेच अहमदनगर व कोपरगाव या कारखान्यांना नाशिक जिल्ह्यातील गोदकाठचा ऊस उपलब्ध होत असतो.यंदा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे शेतीची मशागत करायलाच अवधी लागला व त्यानंतर उसाची लागवड केली जाऊ शकते. तसेच नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात द्राक्षबाग, सोयाबीन, मका, भात या पिकांचे नुकसान झाले आहे. आर्थिक तग धरण्यासाठी शेतकरी उसाचे उत्पादन घेण्याची शक्यता आहे.येणाऱ्या हंगामात राज्यातील यापूर्वी हंगाम घेतलेल्या १९५ कारखान्यांपैकी किमान ५० कारखाने बंद राहतील. उरलेल्या कारखान्यांना त्यांच्या क्षमतेएवढा ऊस मिळणार नाही.यावर्षी साखरेचे उत्पादन ५५ लाख टनापर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जागतिक स्तरावर गेल्या वर्षातील अतिरिक्त साखर उत्पादननानंतर यंदा उत्पादन ६० ते ६५ लाख टनांनी घटणार आहे. अशा परिस्थितीत साखरेची मागणी कायम राहणार असून, पुरवठा अपुरा राहणार आहे. त्यामुळे भारताला निर्यातीची संधी अधिक आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.अतिवृष्टीमुळे द्राक्षबाग व सोयाबीन या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक झळ सोसावी लागली असल्याने कमी खर्चिक असणारे पीक शेतकरी घेतील, असा अंदाज आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती