शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
3
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
4
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
5
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
6
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
7
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
8
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
9
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
10
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
11
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
12
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
13
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
14
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
16
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
17
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
18
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
19
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
20
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी बाहेर पडणे टाळणेच योग्य: डॉ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:34 IST

नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात उष्माघाताचे कक्ष उघडण्याचे आदेश दिले असले तरी नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देउष्माघात टाळणे आवश्यकडोक्याबरोबरच कानही झाकणे गरजेचे

नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात उष्माघाताचे कक्ष उघडण्याचे आदेश दिले असले तरी नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: उष्माघात टाळण्यासाठी उन्हात बाहेर पडण्याचे टाळावे आणि गरज भासलीत डोक्याबरोबरच कान देखील बंद ठेवावे कारण त्यातील उष्णता थेट मेंदुपर्यंत जात असते. त्यामुळे यासंदर्भात काळजी घ्यावी असे आवाहन नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकिय अधिक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी केले आहे.प्रश्न : सध्या मोठ्या प्रमाणात उन जाणवत असून इतक्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढ किंवा उष्णतेची लाट जाणवत आहे. त्याचे काय परिणाम होऊ शकतात.?डॉ. पाटील : नाशिकमध्ये यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शासनाने उष्माघाताची शक्यता असल्याने विशेष कक्ष सुरू केले आहे. उन्हामुळे उष्माघात तर होऊ शकतोत. परंतु अन्य आजारही होऊ शकतात. उलट्याही होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहेप्रश्न: नागरीकांनी काय काळजी घेतली पाहिजे.?डॉ पाटील: मुळात बाहेर पडणे टाळले पाहिजे आणि बाहेर पडलेच तर सर्वच प्रकारची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच डोक्याबरोबर कान देखील बंद होतील अशी व्यवस्था करूनच बाहेर पडले पाहिजे. पुर्वीचे लोक पागोटे घालायचे त्यातून डोक्याबरोबरच कानाचे देखील संरक्षण होत असे. त्यामुळे ही प्रथम काळजी घ्यावी दुसरीबाब म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे म्हणजे डीहायड्रेशन होणार नाही.प्रश्न: उन्हाळ्यात खूप लोक शीत पेय पितात, त्याबाबत काय सांगाल?डॉ. पाटील: उन्हाळ्यात पाणी खूप प्यायले पाहिजे आणि लिंबु सरबत देखील घेतले पाहिजे. अलिकडे लोक ताक, लस्सी असे पदार्थ घेतात. परंतु त्यासाठी पाणी कुठून आणले ते शुध्द की दुषीत माहिती नसते. त्यामुळे या काळात जलजन्य आजारही बळवतात. त्या पार्श्वभूमीवर असे पदार्थ टाळले पाहिजे आणि विशेष करून बाहेर खाणे- पिणे टाळले पाहिजे.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यSun strokeउष्माघात