शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

उन्हाचा तडाखा टाळण्यासाठी बाहेर पडणे टाळणेच योग्य: डॉ. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:34 IST

नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात उष्माघाताचे कक्ष उघडण्याचे आदेश दिले असले तरी नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देउष्माघात टाळणे आवश्यकडोक्याबरोबरच कानही झाकणे गरजेचे

नाशिक - शहरात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी (दि.२७) तर ४२.७ अशी तापमानाची नोंद झाली आहे. नाशिकमध्ये गेल्या दहा वर्षात नव्हे इतक्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने नाशिक शहरात उष्माघाताचे कक्ष उघडण्याचे आदेश दिले असले तरी नागरीकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषत: उष्माघात टाळण्यासाठी उन्हात बाहेर पडण्याचे टाळावे आणि गरज भासलीत डोक्याबरोबरच कान देखील बंद ठेवावे कारण त्यातील उष्णता थेट मेंदुपर्यंत जात असते. त्यामुळे यासंदर्भात काळजी घ्यावी असे आवाहन नाशिक महापालिकेचे माजी वैद्यकिय अधिक्षक डॉ. डी. बी. पाटील यांनी केले आहे.प्रश्न : सध्या मोठ्या प्रमाणात उन जाणवत असून इतक्या मोठ्या प्रमाणात तापमान वाढ किंवा उष्णतेची लाट जाणवत आहे. त्याचे काय परिणाम होऊ शकतात.?डॉ. पाटील : नाशिकमध्ये यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे शासनाने उष्माघाताची शक्यता असल्याने विशेष कक्ष सुरू केले आहे. उन्हामुळे उष्माघात तर होऊ शकतोत. परंतु अन्य आजारही होऊ शकतात. उलट्याही होऊ शकतात. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहेप्रश्न: नागरीकांनी काय काळजी घेतली पाहिजे.?डॉ पाटील: मुळात बाहेर पडणे टाळले पाहिजे आणि बाहेर पडलेच तर सर्वच प्रकारची काळजी घेतली पाहिजे. म्हणजेच डोक्याबरोबर कान देखील बंद होतील अशी व्यवस्था करूनच बाहेर पडले पाहिजे. पुर्वीचे लोक पागोटे घालायचे त्यातून डोक्याबरोबरच कानाचे देखील संरक्षण होत असे. त्यामुळे ही प्रथम काळजी घ्यावी दुसरीबाब म्हणजे पाणी भरपूर प्यायला पाहिजे म्हणजे डीहायड्रेशन होणार नाही.प्रश्न: उन्हाळ्यात खूप लोक शीत पेय पितात, त्याबाबत काय सांगाल?डॉ. पाटील: उन्हाळ्यात पाणी खूप प्यायले पाहिजे आणि लिंबु सरबत देखील घेतले पाहिजे. अलिकडे लोक ताक, लस्सी असे पदार्थ घेतात. परंतु त्यासाठी पाणी कुठून आणले ते शुध्द की दुषीत माहिती नसते. त्यामुळे या काळात जलजन्य आजारही बळवतात. त्या पार्श्वभूमीवर असे पदार्थ टाळले पाहिजे आणि विशेष करून बाहेर खाणे- पिणे टाळले पाहिजे.मुलाखत- संजय पाठक 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यSun strokeउष्माघात