शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

यशस्वी वकील घडण्यासाठी ‘म्यूट ट्रायल’ आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 01:41 IST

न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजशेखर मनथा यांनी सांगितले.

ठळक मुद्देराजशेखर मनथा : एनबीटी विधि महाविद्यालयात राष्ट्रस्तरीय स्पर्धेचे उद््घाटन

नाशिक : न्यायालयीन प्रक्रियेत निर्णयप्रक्रिया अतिशय महत्त्वाची असून, तिचे ज्ञान वकिलांनाही असणे आवश्यक आहे. त्यामुळे विधि शाखेच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांमधून यशस्वी वकील घडण्याकरिता ‘ म्यूट ट्रायल’ उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राजशेखर मनथा यांनी सांगितले.एनबीटी विधि महाविद्यालय व डी. टी. जायभावे प्रतिष्ठान यांच्यातर्फे संयुक्तरीत्या तेराव्या राष्टÑस्तरीय म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेचे शनिवारी (दि. १२) राजशेखर मनथा यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले, यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांना न्यायालयीन खटल्यांच्या कामकाजाविषयी माहिती मिळावी, एखादा खटला कसा हाताळावा या विषयीचा सराव व्हावा, साक्षीदारांची तपासणी कशी करावी, खटल्याचा निकाल कसा लिहावा, याविषयी माहिती मिळावी यासाठी आयोजित या राष्टÑस्तरीय म्यूट ट्रायल व जजमेंट रायटिंग स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे यांनी ट्रायल कोर्टामध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्यांविषयी मार्गदर्शन केले. अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी या उपक्रमामुळे प्रत्यक्ष खटला चालवताना येणाऱ्या अडचणी कमी होतील, अशी ग्वाही दिली. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अ‍ॅड. अनिल सिंग यांनी विद्यार्थ्यांनी अशा स्पर्धेतसहभाग घेतल्यामुळे न्यायालयात प्रत्यक्ष काम करणे सहजासहजी शक्य आहे, असे सांगितले.गोखले एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी डॉ. मो. स. गोसावी यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करूनआदर्श वकील व्हावे, असेउपस्थितांना आवाहन केले.अ‍ॅड. जयंत जायभावे यांनी स्पर्धेविषयी सखोल माहिती देत खटला चालविण्यासाठी आवश्यक कौशल्य अवगत करण्यासाठी बारा वर्षांपासून सदर उपक्रमाचे आयोजन केले जाते असल्याचे सांगितले.प्राचार्य डॉ. अस्मिता वैद्य यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन वासंती भूमकर यांनी केले.

टॅग्स :NashikनाशिकEducationशिक्षण