शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

चौरंगी लढतीचे यशापयश मतविभागणीच्या हाती

By admin | Updated: October 11, 2014 23:25 IST

चौरंगी लढतीचे यशापयश मतविभागणीच्या हाती

व्यक्तिकेंद्रित राजकारणाची ओळख निर्माण केलेल्या निफाड विधानसभा मतदारसंघात यंदा चार तुल्यबळ पक्षांमध्ये खरी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र या चौरंगी लढतीच्या यशापयशाची खरी मदार मतविभागणीवर अवलंबून आहे. नाते-गोते आणि गट-तट तसेच वेगवेगळ्या पक्षांमध्ये राहूनसुद्धा आतून भलत्याच उमेदवाराला रसद पुरविण्याचे तंत्र वापरणे सुरू झाल्याने कोण नेमकी कोणाची मते खेचतो याभोवतीच निकालाचे गणित फिरणार आहे.शिवसेनेकडून आमदार अनिल कदम, राष्ट्रवादीतर्फे माजी आमदार दिलीप बनकर, काँगे्रसकडून राजेंद्र मोगल, भाजपाकडून वैकुंठ पाटील, मनसेकडून सुभाष होळकर, बसपाकडून धर्मेंद्र जाधव, तर अपक्ष म्हणून नईम शब्बीर शेख नशीब आजमावित आहेत. प्रारंभी आजी-माजी आमदारांमध्येच दुरंगी लढत होईल, असे गृहितक मानले जात होते. मात्र युती आणि आघाडीमधला ‘संसार’ दुभंगला आणि प्रचाराचा ज्वर जसाजसा चढू लागला तसे स्वतंत्र लढतीचे चित्र बदलत गेले. आजच्या घडीला प्रमुख पक्षांमध्ये चौरंगी लढत होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. आतापर्यंत ओझर-सुकेणा-पिंपळगाव पट्ट्याचे एक गठ्ठा मतदान निर्णायक ठरायचे. यंदा मात्र चौरंगी लढतीतील उमेदवार आपापल्या भागातील मते मिळविण्यासोबतच नाते संबंधातील मते खेचणार असल्याने चारही दिशेकडील मते पदरात पाडून घेण्यात कोण यशस्वी होतो, यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे. विद्यमान आमदार कदम यांनी सेनेचा भक्कम उभारलेला गड, जनसंपर्काच्या बळावर तालुक्यात कार्यकर्त्यांचे विणलेले जाळे या गोष्टी त्यांच्यासाठी पोषक मानल्या जात असल्या तरी गोदाकाठच्या भागातील रस्त्याच्या न सुटलेल्या समस्या तसेच तालुक्यात येवला-सिन्नरच्या धर्तीवर टोलेजंग इमारतींसारखी भरीव कामे न केल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहेच.राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी गेल्या पाच वर्षांपासून विरोधक म्हणून बजावलेली भूमिका, पक्षाचे वाढविलेले संघटन, भुजबळांची लाभलेली साथ, तसेच गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीत राहून घरभेदी करणाऱ्या नेत्यांना आपलेसे करण्यात मिळविलेले यश या बनकरांच्या दृष्टीने जमेच्या बाजू मानल्या जात आहेत. कॉँग्रेसचे राजेंद्र मोगल यांच्यामागे स्व. माजी आमदार मालोजीराव मोगल यांची पुण्याई, सहानुभूती, निसाकाची थबकलेली चाके नव्याने फिरविण्यासाठी वठविलेली महत्त्वाची भूमिका तसेच विविध पक्षांमध्ये विखुरलेला पूर्वाश्रमीचा मोगल गट या निवडणुकीत मात्र मागे उभा राहिल्याने राजेंद्र मोगल यांच्यासाठी लाभदायी ठरणार आहे. भाजपाचे वैकुंठ पाटील यांना मोदी प्रभावाचा किती लाभ होतो याचा निष्कर्ष आत्ताच काढणे शक्य नसले तरी निफाडच्या पूर्व आणि मध्य भागावर असलेली त्यांची पकड, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष सुरेशबाबा पाटील व कॉँग्रेसचे माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचा पुतण्या, तसेच तालुक्यात मोगल यांच्या पाठोपाठ असलेले मोठे नातेसंबंध याचा लाभ पाटील यांना नक्कीच होणार आहे. मनसेचे सुभाष होळकर नात्याने दिलीप बनकर यांचे चुलत जावई असल्याने, तसेच व्यापारामुळे पिंपळगाव बसवंतमध्ये वाढलेल्या संपर्काच्या बळावर निर्णायक मते मिळविण्यापर्यंत ते मजल गाठतील, असे वाटते. बनकर यांच्या वोट बॅँकेत वाटेकरी होणार असल्याने होळकर व मोगल यांची उमेदवारी बनकर यांच्यासाठी, तर वैकुंठ पाटील यांची उमेदवारी कदम यांच्यासाठी डोकेदुखी ठरू शकेल.निफाड मतदारसंघात यावेळी चारही उमेदवारांमध्ये होणारी मतविभागणी निवडणूक रंगतदार आणि अटीतटीची होण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.