शहरं
Join us  
Trending Stories
1
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
2
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
3
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
4
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
5
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
6
शर्टच्या आतून लावला बॉम्ब, गेटजवळ पोहचताच दाबले डेटोनेटर, पाकिस्तानातील आत्मघाती हल्ल्याचा फोटो
7
सावधान! सरकार नवीन काहीतरी आणते, लोक फसतात; आता 'SIR फॉर्म' स्कॅमचे जाळे टाकू लागले सायबर भामटे
8
डॉक्टर, सुशिक्षित तरुणांना पाकिस्तानी 'आका'ने दिली ट्रेनिंग; लाल किल्ला स्फोटातील आरोपींचे जैश-ए-मोहम्मदशी थेट कनेक्शन!
9
“मेट्रोसारखी सुंदर लोकल ट्रेन मुंबईकरांना देणार, लवकरच कायापालट”; CM फडणवीसांचे आश्वासन
10
'अरुणाचल'मध्ये जन्मलेल्या भारतीय महिलेला शांघाय विमानतळावर १८ तास डांबले; 'हा' पासपोर्ट अवैध असल्याचे चीनचे फर्मान
11
"भारतीय सिनेमातील एका युगाचा अंत..."; पंतप्रधान मोदी, शरद पवार, राज ठाकरेंनी धर्मेंद्र यांना वाहिली श्रद्धांजली
12
आता सरकारी विमा कंपन्यांचे विलीनीकरण की खासगीकरण? विचार सुरू; सरकार म्हणते...
13
Dharmendra Passed Away: डोळ्यांत अश्रू अन् निस्तेज चेहरा! धर्मेंद्र यांच्या निधनाने पत्नी हेमा मालिनी व्यथित
14
'शोले'चा 'वीरू' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
15
IND vs SA : मार्कोचा 'सिक्सर'! १५ वर्षांत पहिल्यांदा असं घडलं! टीम इंडिया २०१ धावांत ऑलआउट
16
Dharmendra: 'बाप'माणूस हरपला! वडिलांच्या निधनाने कोलमडून गेली ईशा देओल, स्मशानभूमीतील भावुक करणारा व्हिडीओ
17
Palmistry: भाग्य रेषा तुटलेली आहे की अखंड? 'या' स्थितीवरून उलगडते संपत्ति आणि नशिबाचे गूढ
18
Nashik Crime: कॉल केला आणि म्हणाली, 'पतीला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवायचे नसेल तर पाच लाख दे!'
19
सरकारी बंगला, २०० लिटर पेट्रोल आणि २० लाखांची ग्रॅच्युइटी! सरन्यायाधीशांना मिळतात 'या' खास सुविधा!
20
भारताच्या वीरपुत्राला अमेरिकेचा सलाम! दुबई एअर शोमध्ये शहीद विंग कमांडर नमांश स्याल यांच्या सन्मानार्थ F-16 डेमॉन्स्ट्रेशन रद्द
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यातून चिमुरडीला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:24 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले. नांदूरवैद्य येथील कर्पे मळा, सायखेडे मळा, शिवाचा ओहोळ आदी ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे काही महिन्यांपुर्वी या ठिकाणी असलेल्या सायखेडे मळा परिसरात सुकदेव सायखेडे यांच्या गायीवर या बिबट्याने हल्ला चढवत गायीला ठार केले होते. सदर बिबट्या आपले भक्ष शोधण्यासाठी चक्क गावात येत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच नांदूरवैद्य ते वंजारवाडी दरम्यान ऊसशेती जास्त असल्याने तसेच तीन ते चार पोल्ट्री फार्म असल्यामुळे बिबट्याचा भक्ष शोधण्यासाठी या परिसरात गेल्या अनेक अनेक दिवसांपासून वावर असल्याचे येथील शेतकर्यांनी सांगितले. यानंतर सदर घटनेची माहिती कर्पे यांनी दुरध्वनीवरून वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डोमसे व वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी शैलेश झुटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शालीनी पवार, श्रीमती साबळे यांनी पंचनामा केला.या घटनेत सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाल्याचे कर्पे यांनी सांगितलेÞ.घटनास्थळी बाळू कर्पे, दत्तु काजळे, मुकुंदा यंदे, सुरेश मुसळे आदीसह वनविभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.---------------वासराचा फडशा, गायी दोरखंड तोडून पळाल्याराञीच्या दोन वाजेच्या सुमारास भक्ष शोधण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याने एक वासरू ठार झाले तर याचवेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यश आले.यानंतर सकाळी येथील कर्पे हे आपल्या गोठ्यात गायींना चारा देण्यासाठी जात असतांना सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले.या घटनेमुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.तर शेतकर्यांनी आपली जनावरे उघड्यावरच बांधत असल्यामुळे या परिसरात बिबट्या हल्ला करत आहे तर शेतकर्यांनी आपल्या जनावरांना निवा-याची सोय करावी त्यामुळे बिबट्या हल्ला करणार नाही असे यावेळी वनविभागाने शेतकर्यांना माहिती देतांना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक