शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

बिबट्याच्या हल्ल्यातून चिमुरडीला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:24 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले. नांदूरवैद्य येथील कर्पे मळा, सायखेडे मळा, शिवाचा ओहोळ आदी ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे काही महिन्यांपुर्वी या ठिकाणी असलेल्या सायखेडे मळा परिसरात सुकदेव सायखेडे यांच्या गायीवर या बिबट्याने हल्ला चढवत गायीला ठार केले होते. सदर बिबट्या आपले भक्ष शोधण्यासाठी चक्क गावात येत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच नांदूरवैद्य ते वंजारवाडी दरम्यान ऊसशेती जास्त असल्याने तसेच तीन ते चार पोल्ट्री फार्म असल्यामुळे बिबट्याचा भक्ष शोधण्यासाठी या परिसरात गेल्या अनेक अनेक दिवसांपासून वावर असल्याचे येथील शेतकर्यांनी सांगितले. यानंतर सदर घटनेची माहिती कर्पे यांनी दुरध्वनीवरून वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डोमसे व वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी शैलेश झुटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शालीनी पवार, श्रीमती साबळे यांनी पंचनामा केला.या घटनेत सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाल्याचे कर्पे यांनी सांगितलेÞ.घटनास्थळी बाळू कर्पे, दत्तु काजळे, मुकुंदा यंदे, सुरेश मुसळे आदीसह वनविभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.---------------वासराचा फडशा, गायी दोरखंड तोडून पळाल्याराञीच्या दोन वाजेच्या सुमारास भक्ष शोधण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याने एक वासरू ठार झाले तर याचवेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यश आले.यानंतर सकाळी येथील कर्पे हे आपल्या गोठ्यात गायींना चारा देण्यासाठी जात असतांना सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले.या घटनेमुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.तर शेतकर्यांनी आपली जनावरे उघड्यावरच बांधत असल्यामुळे या परिसरात बिबट्या हल्ला करत आहे तर शेतकर्यांनी आपल्या जनावरांना निवा-याची सोय करावी त्यामुळे बिबट्या हल्ला करणार नाही असे यावेळी वनविभागाने शेतकर्यांना माहिती देतांना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक