शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

बिबट्याच्या हल्ल्यातून चिमुरडीला वाचविण्यात यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 13:24 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले.

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथे शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरवैद्य - वंजारवाडी सीमेवर असलेल्या शिवाचा ओहोळ या ठिकाणी अंंबादास सुरेश मुसळे यांच्या छोट्या मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने मुलीची आई घरातून बाहेर आल्यानंतर आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने धुम ठोकल्याने या चिमुरडीचा जीव वाचविण्यात यश मिळवले. नांदूरवैद्य येथील कर्पे मळा, सायखेडे मळा, शिवाचा ओहोळ आदी ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिबट्याने दर्शन दिल्याचे येथील शेतकऱ्यांनी सांगितले.त्याचप्रमाणे काही महिन्यांपुर्वी या ठिकाणी असलेल्या सायखेडे मळा परिसरात सुकदेव सायखेडे यांच्या गायीवर या बिबट्याने हल्ला चढवत गायीला ठार केले होते. सदर बिबट्या आपले भक्ष शोधण्यासाठी चक्क गावात येत असल्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.तसेच नांदूरवैद्य ते वंजारवाडी दरम्यान ऊसशेती जास्त असल्याने तसेच तीन ते चार पोल्ट्री फार्म असल्यामुळे बिबट्याचा भक्ष शोधण्यासाठी या परिसरात गेल्या अनेक अनेक दिवसांपासून वावर असल्याचे येथील शेतकर्यांनी सांगितले. यानंतर सदर घटनेची माहिती कर्पे यांनी दुरध्वनीवरून वनविभागाला दिल्यानंतर वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डोमसे व वनविभागाचे वनपरिमंडल अधिकारी शैलेश झुटे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती शालीनी पवार, श्रीमती साबळे यांनी पंचनामा केला.या घटनेत सुमारे पंचवीस हजाराचे नुकसान झाल्याचे कर्पे यांनी सांगितलेÞ.घटनास्थळी बाळू कर्पे, दत्तु काजळे, मुकुंदा यंदे, सुरेश मुसळे आदीसह वनविभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.---------------वासराचा फडशा, गायी दोरखंड तोडून पळाल्याराञीच्या दोन वाजेच्या सुमारास भक्ष शोधण्यासाठी दबा धरून बसलेल्या बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला चढविल्याने एक वासरू ठार झाले तर याचवेळी सोबत बांधलेल्या इतर गायींनी दोरखंड तोडून पळ काढत आपला जीव वाचविण्यात यश आले.यानंतर सकाळी येथील कर्पे हे आपल्या गोठ्यात गायींना चारा देण्यासाठी जात असतांना सदर घटना घडल्याचे निदर्शनास आले.या घटनेमुळे येथील शेतकरी भयभीत झाले असून या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.तर शेतकर्यांनी आपली जनावरे उघड्यावरच बांधत असल्यामुळे या परिसरात बिबट्या हल्ला करत आहे तर शेतकर्यांनी आपल्या जनावरांना निवा-याची सोय करावी त्यामुळे बिबट्या हल्ला करणार नाही असे यावेळी वनविभागाने शेतकर्यांना माहिती देतांना सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक