शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

अनुदान कोट्यवधींचे; उपयुक्तता मात्र शून्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:06 IST

शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांकडे असतानाही शाळांना गॅसजोडणीची सक्ती कशासाठी करण्यात आली याबाबतची कोणतीही स्पष्टता नसतांना शासनाचे कोट्यवधींचे अनुदान वापराविना पडून राहाण्याची दाट शक्यता आहे. शाळांनी गॅसजोडणीसाठी अद्यापही अनुकूलता दर्शविली नसल्यामुळे या निधीचे कारायचे काय? असा शाळांसमोर प्रश्न आहे.

संदीप भालेराव।नाशिक : शालेय पोषण आहाराची जबाबदारी बचत गटांकडे असतानाही शाळांना गॅसजोडणीची सक्ती कशासाठी करण्यात आली याबाबतची कोणतीही स्पष्टता नसतांना शासनाचे कोट्यवधींचे अनुदान वापराविना पडून राहाण्याची दाट शक्यता आहे. शाळांनी गॅसजोडणीसाठी अद्यापही अनुकूलता दर्शविली नसल्यामुळे या निधीचे कारायचे काय? असा शाळांसमोर प्रश्न आहे. विशेष म्हणजे गॅसजोडणी केवळ शालेय पोषण आहारासाठीच असल्याचे शासनाचे म्हणणे असल्याने अन्य कारणांसाठी गॅस वापरण्याचे मार्गही शासनाने बंद करून टाकले आहेत.  नाशिक जिल्ह्यातील ४०२९ शाळांना गॅसजोडणी घेण्यासाठी केंद्रशासनाच्या निधीतून प्रतिशाळा ३४६५ या-प्रमाणे १,३९,६०,४८५ इतकी रक्कम शाळास्तरावर वितरित केलेली आहे. तालुकानिहाय शाळांच्या संख्येनुसार प्रत्येक तालुक्यांना निधी देण्यात आलेला असून, तेथून तो प्रत्येक शाळेला वितरितही करण्यात आलेला आहे. मात्र गॅसजोडणी घेण्यास शाळा अनुकूल नसल्याने सदर निधी वापराविना पडून राहाण्याची शक्यता अधिक आहे. शालेय पोषण आहरासाठी सदर गॅसजोडणी घ्यावयाची असल्याने आणि पोषण आहार शाळा शिजवत नसल्यामुळे शाळांचा पुरता गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे एका गॅसजोडणीवर रोज ५०० ते १५०० मुलांचा पोषण आहार शिजविणे शक्य नसल्याने कोणत्या अर्थाने एक सिलिंडर गॅसजोडणी देण्यात आली याबाबत शाळांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.  वास्तविक या योजनेबाबत आणि मिळालेल्या निधीबाबत अनेक प्रश्न आहेत. केंद्र शासनाची ही महत्त्वाकांक्षी योजना असेल तर मग त्यासाठी आगोदर जिल्हानिहाय मुख्याध्यापकांची बैठक घेऊन चर्चा करणे अपेक्षित होते. त्यातून मुख्याध्यापकांची भूमिका आणि अडचणी तसेच गरजही लक्षात आली असती. परंतु याची कोणतीही माहिती न देता थेट अनुदान शाळांना वितरीत केले जात आहे.शाळांना केवळ ग्राह्य धरण्यात आले असून, योजनेची अंमलबजावणी कशी करावी याची कुठेही स्पष्टता देण्यात आलेली नाही. यामुळे शाळांना या निधीचे कारायचे काय? असा प्रश्न पडला आहे. शासनाच्या निधीचा योग्य विनियोग होणे अपेक्षित असल्याने ज्या शाळांना गॅसजोडणी ऐवजी शाळांना अन्य कामासाठी सदर निधी देण्याची परवानगी शासानाने द्यावी, अशी शाळांची मागणी आहे. मात्र त्यातून अद्याप मार्ग निघू शकलेला नाही.गॅस सिलिंडर शाळेत ठेवणे धोकादायककुंभकोणम येथे एका शाळेला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर देशभरातील शाळांना शाळेत ज्वलनशील पदार्थ ठेवण्यास मनाई करण्यात आली होती. त्यामुळे शाळेत पोषण आहारदेखील शिजविण्याची संकल्पना मागे पडून बचतगट आणि शाळेपासून दूर किचन असावे असे मुद्द्ये पुढे आले आहेत. असे असतानाही आता शाळेत गॅसजोडणी घेण्याचा फतवा गोंधळात भर घालणारा असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Schoolशाळा