शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

विद्यार्थ्यांना उघड्यावर भोजन

By admin | Updated: August 31, 2016 21:59 IST

कळवण : वसतिगृह नसल्याने वर्गातच घेतात आसरा; आदिवासी संघर्ष समितीने वेधले लक्ष

कळवण : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, देसगावच्या विद्यार्थ्यांना भोजनगृह नसल्याने उघड्यावरच जेवण करावे लागत आहे. तसेच वसतिगृह नसल्याने वर्गातच झोपावे लागत लागत आहे.आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या अनेक प्रश्नांकडे कळवण तालुका आदिवासी संघर्ष समिती, आदिवासी बचाव अभियान यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचे लक्ष वेधले. अनेक समस्यांची जंत्रीच मंत्री सावरा यांच्यासमोर ठेवल्याने आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी व यंत्रणेची चांगलीच भंबेरी उडाली. कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी केलेल्या मागण्या रास्त असल्याने प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांना तत्काळ समस्या सोडविण्याचे आदेश आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी यावेळी दिले.शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक, भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसून हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृह प्रवेशापासून वंचित आहेत. तसेच कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत ८२७ विद्यार्थी व विद्यार्थिनी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेशापासून वंचित असल्याने त्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी आदिवासी कार्यकर्त्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली. याप्रश्नी आपण स्वत: लक्ष घालून आश्रमशाळा, वसतिगृहे व नामांकीत इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेशासंदर्भातील प्रश्न सोडणार असल्याचे आश्वासन मंत्री सावरा यानंी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात भिवराज बागुल, फुलदास बागुल, पंढरीनाथ बागुल, पुंडलिक बागुल, सुभाष राऊत, कांतिलाल राऊत, पंडित बागुल, बापू बागुल, गंगाधर बागुल आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)