शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

विद्यार्थ्यांना उघड्यावर भोजन

By admin | Updated: August 31, 2016 21:59 IST

कळवण : वसतिगृह नसल्याने वर्गातच घेतात आसरा; आदिवासी संघर्ष समितीने वेधले लक्ष

कळवण : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत असलेल्या शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून, देसगावच्या विद्यार्थ्यांना भोजनगृह नसल्याने उघड्यावरच जेवण करावे लागत आहे. तसेच वसतिगृह नसल्याने वर्गातच झोपावे लागत लागत आहे.आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या अनेक प्रश्नांकडे कळवण तालुका आदिवासी संघर्ष समिती, आदिवासी बचाव अभियान यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचे लक्ष वेधले. अनेक समस्यांची जंत्रीच मंत्री सावरा यांच्यासमोर ठेवल्याने आदिवासी विकास विभागाच्या अधिकारी व यंत्रणेची चांगलीच भंबेरी उडाली. कळवण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी केलेल्या मागण्या रास्त असल्याने प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांना तत्काळ समस्या सोडविण्याचे आदेश आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी यावेळी दिले.शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना शैक्षणिक, भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या नसून हजारो विद्यार्थी व विद्यार्थिनी वसतिगृह प्रवेशापासून वंचित आहेत. तसेच कळवण प्रकल्प कार्यालयांतर्गत ८२७ विद्यार्थी व विद्यार्थिनी नामांकित इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेशापासून वंचित असल्याने त्यांना प्रवेश द्यावा, अशी मागणी आदिवासी कार्यकर्त्यांनी आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याकडे केली. याप्रश्नी आपण स्वत: लक्ष घालून आश्रमशाळा, वसतिगृहे व नामांकीत इंग्रजी माध्यम शाळेतील प्रवेशासंदर्भातील प्रश्न सोडणार असल्याचे आश्वासन मंत्री सावरा यानंी शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात भिवराज बागुल, फुलदास बागुल, पंढरीनाथ बागुल, पुंडलिक बागुल, सुभाष राऊत, कांतिलाल राऊत, पंडित बागुल, बापू बागुल, गंगाधर बागुल आदि कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)