शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासकीय अंधशाळेत विद्यार्थ्यांना मारहाण ; ‘त्या’ कर्मचाऱ्यास निव्वळ नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:51 IST

नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण विभागाच्या शासकीय अंधशाळेत मद्याच्या नशेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मंगळवारी काळजीवाहू कर्मचा-यास कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.

नाशिकरोड : नासर्डी पुलाजवळील समाजकल्याण विभागाच्या शासकीय अंधशाळेत मद्याच्या नशेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच मंगळवारी काळजीवाहू कर्मचा-यास कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधितावर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली.  पांढरी काठी दिनाच्या दोन दिवसांपूर्वी नासर्डी पूल समाजकल्याण विभागाच्या शासकीय अंधशाळेत शुक्रवारी रात्री कनिष्ठ काळजीवाहक कर्मचारी संदीप कांबळे याने दारूच्या नशेत चंद्रा बटाला, अजय सोनवणे, सागर मुरकुटे व सुरदास पावसे या विद्यार्थ्यांना लाथाबुक्क्यांनी, बॅटने गंभीर मारहाण केली होती. त्यानंतर पुन्हा शनिवारी दुपारी कांबळे याने विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली. यामुळे अंध विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड भीती व दहशतीचे वातावरण पसरले होते. शुक्रवारी पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मारहाण झाल्याची तक्रार अंध विद्यार्थ्यांनी शिक्षकांकडे करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. रविवारी सुट्टीच्या दिवशी संबंधित विद्यार्थ्यांचा नातेवाइकांशी संपर्क साधल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. याबाबत लोकमतच्या (१६ आॅक्टोबर) अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. सोमवारी समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील यांनीदेखील शासकीय अंधशाळेस भेट देऊन घडलेल्या मारहाणीच्या घटनेची माहिती घेतली होती.याबाबत अंध शाळेच्या अधीक्षिका एम. एम. वांझट यांच्याशी संपर्क साधला असता कनिष्ठ काळजीवाहक कर्मचारी संदीप कांबळे याला कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आल्याचे सांगितले. त्याकरिता तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांना मारहाण केल्यानंतर कर्मचारी कांबळे हा आपल्या गावी गेल्याचे बोलले जात आहे. तर समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील हे मंगळवारी मुंबई मंत्रालयात कामानिमित्त गेल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. अंध विद्यार्थ्यांबाबत घडलेल्या या प्रकरणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.त्या चिठ्ठीत दडलंय काय?अंध विद्यार्थ्यांना मारहाण झाल्यानंतर शासकीय अंधशाळेत समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील यांनी सोमवारी भेट देऊन घडलेल्या या घटनेची माहिती घेतली. यावेळी अंध विद्यार्थ्यांनी ‘गुपचूप’ पाटील यांना चिठ्ठी दिल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. त्यामुळे त्या चिठ्ठीत शाळेतील कारभाराबाबत आणखीन काय दडलंय हे मात्र गुलदस्त्यात आहे.अंध विद्यार्थ्यांना मारहाण करणाºया काळजीवाहू कर्मचाºयावर फौजदारी गुन्हा दाखल करणे अपेक्षित आहे. सदर घटना अतिशय संतापजनक असल्याने कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. यासंदर्भात समाजकल्याण अधिकारी नीलेश पाटील यांच्याशी भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही. संबंधितास अटक करण्याची मागणी आहे.- मुक्तेश्वर मुनशेट्टीवार,  सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :NashikनाशिकSchoolशाळा