शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे जो भारताचा... - मोहन भागवत
2
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
3
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
4
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
5
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
6
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
7
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
8
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
9
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
10
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
11
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
12
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
13
अल-फलाह विद्यापीठाचा संस्थापक जावेद सिद्दीकीवर मोठी कारवाई; ईडीने केली अटक! मनी लॉन्ड्रिंग, घोटाळ्याचा आरोप
14
मोठी दुर्घटना: पुलावरच दोन बसची समोरासमोर धडक; एका नेपाळी महिलेचा मृत्यू, ३५ हून अधिक प्रवासी जखमी
15
राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश 
16
Asia Cup Rising Stars 2025 : विदर्भकराची मॅच विनिंग फिफ्टी! भारतीय संघाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
17
डॉ. उमरला करायचा होता 9/11 सारखा घातपात, पण मुजम्मिल सोबत झाले मतभेद अन् फेल झाला संपूर्ण मनसुबा!
18
ऑटोमोबाईल क्षेत्रातील चमत्कार! होंडाकडे आहे जगातील सर्वात 'स्वस्त' प्रायव्हेट जेट; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
19
चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले...
20
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी संतप्त महिलांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 18:29 IST

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.

ठळक मुद्देप्रशासनाचे दुर्लक्ष : सटाणा पालिका प्रवेशद्वारासमोर आंदोलन

सटाणा:शहरात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पंचवीस दिवसाआड देखील पाणी मिळत नसताना देखील पालिका प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना न केल्याने पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी आज शुक्र वारी (दि. 19) पालिका प्रवेशद्वारा समोर दोन तास ठिय्या आंदोलन केले.दरम्यान शहरातील टंचाई निवारणसाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी बैठक घेऊन सूचना केल्यानंतर महिलांनी ठिय्या मागे घेतला.गेल्या 1 वर्षापासून सटाणा शहरात भीषण पाणी टंचाई आहे . त्यावर त्विरत व दीर्घ मुदतीसाठी कायमस्वरु पी उपाय करावेत अशी मागणी केली होती .मात्र पालिकेने कोणत्याही उपाययोजना न केल्याने संतप्त झालेल्या 25 ते 30 महिलांनी आज शुक्र वारी दुपारी 12 वाजता पालिका कार्यालयावर हल्लाबोल करून प्रवेशद्वारा जवळच ठिय्या दिला.यावेळी आंदोलनकर्त्या एड.सरोज चंद्रात्रे म्हणाल्या की, गेल्या एिप्रल मध्ये जिल्हाधिकारी सटाणा येथे आले असतांना पाणी टंचाईची भीषणता त्यांना दर्शवण्यात आली होती . यावर विहीरी अधिग्रहीत करु न पाणी टंचाई आटोक्यात आणण्याचे आश्वासन देण्यात आले होते . मात्र नगरपालिके मार्फत कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही . परिणामी पिण्यासाठी व वापरासाठी पाणी उपलब्ध नसल्याने सामान्य नारिक हैराण झाले आहेत . पिण्यासाठी वीस लिटर पाण्यासाठी 60 ते 70 रु पये मोजावे लागत आहेत . त्यामुळे पाणी पट्टी भरूनही गरीब जनता भरडली जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. . पुनद प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास कमीत कमी दिड ते दोन वर्षाचा अवधी लागणार आहे . अशा परिस्थितीत नगरपालिका ढिम्मपणे बसुन आहे . पाण्यासाठी नागरिक हैराण झाले असुन नगरपालिके मार्फत काहीच पाणीपुरवठा करण्यात येत नसल्याचा आरोप करत शहरात पाणी पुरवठा करण्याबाबत ठोक रु परेखा जनतेला दयावी अशी मागणी केली.दरम्यान नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आंदोलनकर्त्याशी भेट घेऊन चर्चा केली. मात्र ठोस उपाययोजना केल्या शिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी नगराध्यक्ष मोरे यांनी तात्काळ पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी तसेच आंदोलनकर्त्या महिलांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत ज्या भागात पाणीपुरवठा होत नाही त्या भागात टँकरने तात्काळ पाणीपुरवठा करावा अशा सूचना दिल्या तसेच विहीर अधिग्रहण करण्यासाठी कार्यवाही करावी जेणेकरून जलकुंभ भरून शुद्ध पाण्याचा पुरवठा करता येईल असे स्पष्ट. आंदोलनाची तात्काळ दखल घेतल्याने दोन तासांनी ठिय्या मागे घेण्यात आले. आंदोलनात सरोज चंद्रात्रे, रु पाली पंडित, वंदना भामरे, किरण परदेशी,वंदना सोनवणे, मंगल सोनवणे,विनता सोनवणे,लता पगार, विजया सोनवणे,राधाबाई पगार,संगीता सोनवणे,सुनंदा पवार,शुभांगी कुलकर्णी,ललिता मुळे आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई