शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

काटेकोर गावबंदी ठरली निर्णायक !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 00:09 IST

नाशिक : जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या मालेगाव आणि नाशिक शहरात आहे. मात्र, मालेगाव महानगरातून नजीकच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यावर तेथील नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे गावबंदीचे आणि संचारबंदीचे पालन केले. तसेच ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनतादेखील कमी असल्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या फारशी वाढलेली नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

नाशिक : जिल्ह्यातील सर्वाधिक रुग्णसंख्या मालेगाव आणि नाशिक शहरात आहे. मात्र, मालेगाव महानगरातून नजीकच्या ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव होऊ लागल्यावर तेथील नागरिकांनी अत्यंत काटेकोरपणे गावबंदीचे आणि संचारबंदीचे पालन केले. तसेच ग्रामीण भागातील लोकसंख्येची घनतादेखील कमी असल्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाग्रस्तांची संख्या फारशी वाढलेली नसल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.नाशिक महापालिका हद्दीत गुरुवारपर्यंत ५१६, तर मालेगाव मनपा क्षेत्रात ८६२ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील सर्वाधिक बाधित लोकसंख्या ही या दोन महानगरपालिकांच्या हद्दीतील असून, सध्याच्या स्थितीतही या दोन्ही मनपा हद्दीतच रुग्णवाढीचे प्रमाण अधिक आहे. ज्यावेळी रावळगाव, द्याने, पिंपळगाव अशा मालेगावच्या परिसरात कोरोनाचा शिरकाव झाला, त्यावेळी तेथील ग्रामस्थांनी मिळून तीन दिवसांच्या गावबंदीची एकदम कोटेकोरपणे अंमलबजावणी केली. त्यामुळे त्या गावांमध्ये रुग्णसंख्या वाढीला आळा बसला. तसेच ग्रामीण भागात घरेदेखील विखुरलेली असल्याने कोरोनाग्रस्तांचा इतरांना संसर्ग होण्याचे प्रमाणदेखील खूप न वाढता नियंत्रणात राहिले. त्याशिवाय मालेगाव शहरात धर्मगुरू, मौलानांच्या उपस्थितीत घेतलेल्या बैठका, त्यांनी केलेली आवाहनेदेखील परिणामकारक ठरली. नागरिकांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग तसेच मास्क वापराबाबत खबरदारी घेण्याच्या प्रमाणात अधिक चांगल्याप्रकारे झालेली जागृती ग्रामीण भागातील फैलाव रोखण्याच्या दृष्टीने अत्यंत निर्णायक ठरत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ज्या गावांमध्ये प्रारंभीच्या टप्प्यात रुग्ण आढळून आले आणि ज्या गावांनी त्यानंतर कठोर गावबंदीचे धोरण राबविले त्या गावांना, तालुक्यांच्या शहरांना त्याचा फायदाच झाल्याचे आढळून येत आहे.-------------------------मृत्यूदरातील घट दिलासादायककोरोनाच्या प्रादुर्भावानंतर सर्वाधिक मृत्यू हे मालेगाव महानगरातील होते. त्यानंतरच्या काळात प्रभावी उपाययोजना आणि मालेगावमधील जनतेने प्रबोधन मनावर घेतल्याने तेथील प्रादुर्भाव आणि मृत्यूदरातदेखील घट आली असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.-------------------मालेगावसह ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरवणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनादेखील या विविध गावांमधील गावबंदी, नाकेबंदीचा अनुभव आला. काही ठिकाणी तर आरोग्य कर्मचाºयांनादेखील गावात घेण्यात आले नव्हते. कोरोना झाल्यानंतर त्यावर आरोग्याच्या उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच खबरदारी घेणे केव्हाही अधिक परिणामकारक असते.- डॉ. योगेश पाटील, आरोग्य अधिकारी, सामान्य रुग्णालय, मालेगाव

टॅग्स :Nashikनाशिक