शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बाजार समित्यांसाठी कडक नियमावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 15:43 IST

नाशिक : गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सोमवार (दि.२४) पासून पूर्ववत सुरू होणार असले ...

ठळक मुद्देआजपासून शेतमाल लिलाव : रोज पाचशे वाहनांना परवानगी

नाशिक : गेल्या बारा दिवसांपासून बंद असलेल्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज सोमवार (दि.२४) पासून पूर्ववत सुरू होणार असले तरी जिल्हा प्रशासनाने गर्दी नियंत्रणासाठी बाजार समित्यांकरीता कडक नियमावली लागू केली आहे. बाजार समितीत दररोज नियमितपणे सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्याबरोबरच शेतमाल घेऊन येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोविड तपासणी करणे बंधनकारक केले आहे.

कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दि. १२ ते २३ मे या कालावधीत कडक निर्बंध लागू करतानाच जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या कालावधीत शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर शेतमाल विक्री करण्याची परवानगी देण्यात आली होती. परंतु भाव भरुन घेण्याच्या तोट्यात अडकून न पडता शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांच्या थेट खळ्यावर शेतमाल घेऊन जाण्याऐवजी माल शेतावरच झाकून ठेवणे पसंत केले.

आता जिल्हा प्रशासनाने कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज पूर्ववत सुरू करण्यास मान्यता दिली असली तरी कोरोनाचा अद्यापही प्रभाव लक्षात घेता समित्यांसाठी काही कडक नियमावली लागू केली आहे. त्यात प्रामुख्याने, बाजार समितीत प्रवेश करणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर अथवा रॅपिड ॲटिजन टेस्ट १५ दिवसांच्या आत करणे बंधनकारक केले आहे. याचबरोबर बाजार समिती आवारात प्रवेश करण्यासाठी व बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट असावे, संपूर्ण बाजारात दररोज नियमित सोडियम हायपोक्लोराइडची फवारणी करणे, प्रत्येकाचे तापमान मोजणे तसेच मास्कशिवाय प्रवेश न देणे आवश्यक केले आहे.

बाजार समितीच्या आवारात समितीने रॅपिड ॲटिजन टेस्ट करण्याची सुविधाही उपलब्ध करून देणे अनिवार्य करण्यात आले आहे. स्थानिक जागेची उपलब्धता लक्षात घेता रोज किती लोकांना व किती वाहनांना एकाच वेळी प्रवेश द्यायचा, याची संख्याही बाजार समित्यांना निश्चित करावी लागणार आहे.किरकोळ विक्रीचे व्यवहार बंदबाजार समित्यांचे कामकाज सुरू करताना समितीच्या आवारात मात्र किरकोळ शेतमाल खरेदी-विक्रिचे व्यवहार मात्र बंद ठेवण्यात येणार आहेत. बाजार समितीत येणाऱ्या लोकांसाठी फिरती स्वच्छतागृहे उपलब्ध करून देणे व त्यांची कोरोनाच्या पाश्व'भूमीवर देखभाल करणेही समित्यांना अनिवार्य करण्यात आले आहे.बाजार समित्यांसाठी लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित बाजार समिती अनिश्चित कालावधीपर्यंत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.बाजार समित्यांची कसोटीशेतमालांचे लिलाव सुरू करण्यास परवानगी देतानाच समिती आवारात येणाऱ्या प्रत्येकाची ॲटिजन टेस्ट करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे बाजार समित्यांची या कामी मोठी कसोटी लागणार आहे. अनेक बाजार समित्यांनी रोज मोबाईलवर नोंदणी केलेल्या पाचशे वाहनांना परवानगी देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे या पाचशे वाहनांतील प्रत्येकी दोन व्यक्तींची चाचणी करावी लागणार असून या चाचणीसाठी ॲटिजन किटही उपलब्ध करून घ्यावे लागणार आहे. त्यातच चाचणीतच अधिक वेळ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी