शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

तणावमुक्त, आरोग्यदायी राहा, हाच हृदय दिनाचा संदेश डॉ. सुरेश सुर्यवंशी यांचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 23:46 IST

नाशिक- हदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरूणांमध्ये देखील हा विकार वाढू लागला आहे. बदलती जीवन शैली आणि वाढते ताण तणाव यामुळे यंदा सुदृढ राहा आणि इतरांसाठी प्रेरणादायी बना असे ब्रीद देण्यात आले आहे. हृदय रोग टाळून सुदृढ राहणे हे त्या व्यक्तीच्याच नव्हे तर कुटूंबाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे मत नाशिक येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्र्यवंशी यांनी रविवारी (दि.२९) होत असलेल्या जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.

ठळक मुद्देहृदय रोग टाळण्यासाठी फिट राहातणावमुक्त राहणे आवश्यकच

नाशिक- हदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तरूणांमध्ये देखील हा विकार वाढू लागला आहे. बदलती जीवन शैली आणि वाढते ताण तणाव यामुळे यंदा सुदृढ राहा आणि इतरांसाठी प्रेरणादायी बना असे ब्रीद देण्यात आले आहे. हृदय रोग टाळून सुदृढ राहणे हे त्या व्यक्तीच्याच नव्हे तर कुटूंबाच्या दृष्टीने महत्वाचे आहे, असे मत नाशिक येथील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुरेश सूर्र्यवंशी यांनी रविवारी (दि.२९) होत असलेल्या जागतिक हृदय दिनाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केले.प्रश्न: हृदय दिनाचे यंदा वेगळे ब्रीद आहे. त्याविषयी काय सांगाल?

डॉ. सूर्यवंशी: होय. दरवर्षी साजरा होणाऱ्या हृदय दिनाच्या दिवशी वेगवेगळे ब्रीद असते. यंदा वर्ल्ड हार्ट फाऊंडेशनने प्रतिबंधात्मक उपायासाठी सदृढ राहा आणि इतरांसाठी प्रेरणादायी बना असे ब्रिद दिले आहे. हृदय विकाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी असे विकार टाळण्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी मानसिक तणाव घालवणे आणि स्वस्थ सुदृढ राहील्यास तो कुटूंबाच्या दृष्टीने आदर्श ठरू शकतो. आपण आपल्या कुटूंबासाठीच नव्हे तर कार्यालयातील अन्य सहकारी, समाजासाठी देखील प्रेरणादायी ठरू शकतो. त्यातूनच जनजागृती होऊ शकतो.प्रश्न: हृदय विकार टाळण्यासाठी कोणत्या स्वरूपाची दक्षता घेतली पाहिजे.डॉ. सूर्यवंशी: हृदय विकार टाळण्यासाठी सर्व प्रथम बदलत्या जीवन शैलीत बदल केला पाहिजे. त्याच बरोबर सिगारेट, तंबाखुजन्य पदार्थ आणि मद्यपान टाळले पाहिजे. मुख्य म्हणजे चालणे आणि ध्यानधारणा केली पाहिजे. चार ते पाच किलो मीटर चालणे आणि अर्धातास प्राणायम, सुदर्शन क्रिया अशाप्रकाची ध्यान धारणा केली पाहिजे. बºयाच नोकरी व्यवसायात रात्री उशिरा घरी जाणे आणि सकाळी उशिरा उठणे यामुळे व्यायाम होत नाही अशी सबब सांगितली जाते. तथापि, चोवीस तासात केवळ एक तास माणसाने स्वत:च्या आरोग्यासाठी दिल्यास तो सुदृढ राहू शकतो. आणि इतक्या साध्या व्यायामासाठी खर्चाची देखील आवश्यकता नाही.प्रश्न: तरूणाईत हृदय विकाराचे प्रमाण वाढत आहे, त्या विषयी काय सांगाल?डॉ. सूर्यवंशी: तरूणांना नोकरी व्यवसायानिमित्त धावपळ करावी लागते. या जीवन शैलीत ताण तणाव वाढतो आणि त्यामुळे विकार वाढतात. त्याच मद्यपान, सिगारेट आणि तंबाखुजन्य पदार्थांचा वापर देखील कमी वयातच सुरू होतो. त्यामुळे व्यसने टाळली पाहिजेत या पथ्याबरोबरच ताण तणावाचे व्यस्थापन केले पाहिजे. तर हा विकार टाळता येईल.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्यHeart Diseaseहृदयरोग