शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बोकडबळी प्रथेच्या जागेवरून गडावर तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2018 00:52 IST

नवरात्रोत्सवाच्या अंतिम सत्रात शिवकालीन परंपरेपासून सुरू झालेली बोकडबळी प्रथा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागेत करण्याबाबत सूचित केल्याने याविरोधात सप्तशृंग गडावरील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केले तसेच ध्वज मिरवणुकीवर बहिष्कार टाकल्याने गडावर तणावाचे वातावरण आहे.

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या अंतिम सत्रात शिवकालीन परंपरेपासून सुरू झालेली बोकडबळी प्रथा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागेत करण्याबाबत सूचित केल्याने याविरोधात सप्तशृंग गडावरील व्यावसायिकांनी व्यवसाय बंद केले तसेच ध्वज मिरवणुकीवर बहिष्कार टाकल्याने गडावर तणावाचे वातावरण आहे.  सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सवात बोकडबळी देण्याची शिवकालीन परंपरा असल्याची ग्रामस्थांची भावना आहे. मंदिरापासून सुमारे शंभर पायऱ्या खाली उतरल्या नंतर उंबराचा वृक्ष आहे त्या ठिकाणी बोकडबळी देण्याची प्रथा आहे. या ठिकाणी बोकडबळी दिल्यानंतर पर्जन्यमानाचे प्रमाण समाधानकारक राहते अशी गडावरील नागरिकांची भावना आहे, तर सप्तशृंग गडावरील न्यासाच्या कार्यक्षेत्रातील पायºयांवरील उंबराच्या झाडाखाली बोकडबळी प्रथा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पार पाडू नये तसेच भावनांचा आदर राखत ही प्रथा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील जागेत पार पाडावी, अशी न्यासाची भूमिका आहे. दरम्यान, मागीलवर्षी ग्रामपंचायत हद्दीतील मराठी शाळेच्या पटांगणावर बोकडबळी दिला गेला होता. मात्र यावर्षी गडवासीयांनी उंबराच्या झाडाखाली बोकडबळी देण्याची आग्रही भूमिका घेतली. यातून मार्ग निघत नसल्याने गडावरील शेकडो व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने व्यवसाय बंद ठेवले. प्युनिक्युऊर ट्रॉलीही बंद ठेवण्यात आली. न्यासाच्या कार्यालयासमोर व्यावसायिक व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, उशिरापर्यंत याबाबत निर्णय प्रलंबित राहिल्याने तिढा कायम होता. दरम्यान, प्रशासन व ग्रामस्थांच्या संयुक्त बैठकीत पुढील वर्षापासून कायदेशीर बाबी तपासून बोकडबळीची प्रथा पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. दरम्यान मागील वर्षांप्रमाणेच शाळेजवळील पटांगणांत बोकडबळी देण्याचा निर्णय झाल्याचे कळविण्यात आले.

टॅग्स :saptashrungi templeसप्तश्रृंगी देवी मंदिरNashikनाशिक