शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

विल्होळी येथे महाराष्ट्र बँकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:03 IST

विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देएटीएममध्ये खडखडाट : कॅशियरच नसल्याने नागरिक त्रस्त

विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.विल्होळी, सारूळ, राजुर बहुला, आंबे बहुला, पिंपळद, जातेगाव, रायगड नगर या ग्रामीण भागासाठी ही एकमेव बँक असल्याने येथे खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात बँकेत एकच काऊंटर असल्याने मोठ्या रांगा लागतात. असे असतानाही या बँकेत अजब व मनमानी कारभार चालू आहे.नागरीक गरज असल्याने बँक सुरु होण्या अगोदरच बँकेबाहेर रांगा लावून उभे असतात. शनिवारी (दि.१९) ग्राहकांची सकाळी नऊ वाजेपासून रांग लागलेली असताना दहा वाजेला बँक उघडली, परंतु बँकेचे व्यवस्थापक व कॅशियर दुपारी एक वाजता आल्याने ग्राहकांना तीन-चार तास ताटकळत उभे रहावे लागले.याबाबत ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यास विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गेल्या अनेक दिवसापासून बँकेचा अजब कारभार चालू असून कधी व्यवस्थापक येत असेल तर कॅशियर येत नाही, तर कधी कॅशियर येत असेल तर व्यवस्थापक येत नाही, त्यामुळे पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.नवीन खाते उघडणार्‍यांना आठ ते दहा दिवस काम धंदा सोडून चकरा माराव्या लागत आहेत.बँक ग्रामीण भागात असल्याने या भागातील ग्राहकांना बँकेचे फॉर्म भरता येत नाही, त्याबाबत बँकेकडून सहकार्य केले जात नाही. परिणामी ग्राहकांना फॉर्म भरण्यासाठी गावभर फिरावे लागते.शिवाय गेल्या अनेक दिवसापासून बँक परिसरात अस्वच्छता असल्याचे दृष्य पहावयास मिळते. बँकेच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते. सदर बँकेची पार्किंग नसल्याने येणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असून अनेक छोटे मोठेअपघात नेहमीच येथे घडत आहे. याबाबत बँकेकडे व ग्रामपंचायतीकडे सतत तक्रारी करूनही अद्यापपर्यंत पार्किंगची व्यवस्था केली गेलेली नाही.बँकेच्या एटीएमची दुर्दशा...विल्होळी पंचक्रोशित एकच केटीएम असल्याने पैसे काढण्यासाठी येथे गर्दी होते. परंतु अनेक वेळा ह्या एटीएम मध्ये खडखडाट असते त्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय होते.सकाळी नऊ वाजेपासून बँकेच्या समोर रांगेत उभा होतो. दहा वाजता बँक उघडली. पण बँकेचे कॅशियर व व्यवस्थापक न आल्याने माझे सर्व काम सोडून मला चार तास बँकेच्यासमोर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. बँकेची वेळ निघून गेल्यानंतर कॅशियर दुपारी एक वाजता आले. मोठी रांग असल्याने त्यामध्ये माझ्यासह अनेक नागरिकांचा त्रास सहन करावा लागला.- दिनेश रूपवते, बँक ग्राहक.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक