शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी येथे महाराष्ट्र बँकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:03 IST

विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देएटीएममध्ये खडखडाट : कॅशियरच नसल्याने नागरिक त्रस्त

विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.विल्होळी, सारूळ, राजुर बहुला, आंबे बहुला, पिंपळद, जातेगाव, रायगड नगर या ग्रामीण भागासाठी ही एकमेव बँक असल्याने येथे खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात बँकेत एकच काऊंटर असल्याने मोठ्या रांगा लागतात. असे असतानाही या बँकेत अजब व मनमानी कारभार चालू आहे.नागरीक गरज असल्याने बँक सुरु होण्या अगोदरच बँकेबाहेर रांगा लावून उभे असतात. शनिवारी (दि.१९) ग्राहकांची सकाळी नऊ वाजेपासून रांग लागलेली असताना दहा वाजेला बँक उघडली, परंतु बँकेचे व्यवस्थापक व कॅशियर दुपारी एक वाजता आल्याने ग्राहकांना तीन-चार तास ताटकळत उभे रहावे लागले.याबाबत ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यास विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गेल्या अनेक दिवसापासून बँकेचा अजब कारभार चालू असून कधी व्यवस्थापक येत असेल तर कॅशियर येत नाही, तर कधी कॅशियर येत असेल तर व्यवस्थापक येत नाही, त्यामुळे पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.नवीन खाते उघडणार्‍यांना आठ ते दहा दिवस काम धंदा सोडून चकरा माराव्या लागत आहेत.बँक ग्रामीण भागात असल्याने या भागातील ग्राहकांना बँकेचे फॉर्म भरता येत नाही, त्याबाबत बँकेकडून सहकार्य केले जात नाही. परिणामी ग्राहकांना फॉर्म भरण्यासाठी गावभर फिरावे लागते.शिवाय गेल्या अनेक दिवसापासून बँक परिसरात अस्वच्छता असल्याचे दृष्य पहावयास मिळते. बँकेच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते. सदर बँकेची पार्किंग नसल्याने येणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असून अनेक छोटे मोठेअपघात नेहमीच येथे घडत आहे. याबाबत बँकेकडे व ग्रामपंचायतीकडे सतत तक्रारी करूनही अद्यापपर्यंत पार्किंगची व्यवस्था केली गेलेली नाही.बँकेच्या एटीएमची दुर्दशा...विल्होळी पंचक्रोशित एकच केटीएम असल्याने पैसे काढण्यासाठी येथे गर्दी होते. परंतु अनेक वेळा ह्या एटीएम मध्ये खडखडाट असते त्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय होते.सकाळी नऊ वाजेपासून बँकेच्या समोर रांगेत उभा होतो. दहा वाजता बँक उघडली. पण बँकेचे कॅशियर व व्यवस्थापक न आल्याने माझे सर्व काम सोडून मला चार तास बँकेच्यासमोर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. बँकेची वेळ निघून गेल्यानंतर कॅशियर दुपारी एक वाजता आले. मोठी रांग असल्याने त्यामध्ये माझ्यासह अनेक नागरिकांचा त्रास सहन करावा लागला.- दिनेश रूपवते, बँक ग्राहक.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक