शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
3
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
4
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
5
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
6
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
7
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
8
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
9
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
10
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
11
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
12
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
13
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
14
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
15
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
16
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
17
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
18
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
19
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
20
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक

विल्होळी येथे महाराष्ट्र बँकेचा अजब कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 18:03 IST

विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देएटीएममध्ये खडखडाट : कॅशियरच नसल्याने नागरिक त्रस्त

विल्होळी : येथील बँक ऑफ महाराष्ट्रचा कारभार अजब पद्धतीने चालू असून याकडे बँकेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष दिसून येत असल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.विल्होळी, सारूळ, राजुर बहुला, आंबे बहुला, पिंपळद, जातेगाव, रायगड नगर या ग्रामीण भागासाठी ही एकमेव बँक असल्याने येथे खातेदारांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यात बँकेत एकच काऊंटर असल्याने मोठ्या रांगा लागतात. असे असतानाही या बँकेत अजब व मनमानी कारभार चालू आहे.नागरीक गरज असल्याने बँक सुरु होण्या अगोदरच बँकेबाहेर रांगा लावून उभे असतात. शनिवारी (दि.१९) ग्राहकांची सकाळी नऊ वाजेपासून रांग लागलेली असताना दहा वाजेला बँक उघडली, परंतु बँकेचे व्यवस्थापक व कॅशियर दुपारी एक वाजता आल्याने ग्राहकांना तीन-चार तास ताटकळत उभे रहावे लागले.याबाबत ग्राहकांनी बँक कर्मचाऱ्यास विचारले असता त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. गेल्या अनेक दिवसापासून बँकेचा अजब कारभार चालू असून कधी व्यवस्थापक येत असेल तर कॅशियर येत नाही, तर कधी कॅशियर येत असेल तर व्यवस्थापक येत नाही, त्यामुळे पैशाची देवाणघेवाण करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे.नवीन खाते उघडणार्‍यांना आठ ते दहा दिवस काम धंदा सोडून चकरा माराव्या लागत आहेत.बँक ग्रामीण भागात असल्याने या भागातील ग्राहकांना बँकेचे फॉर्म भरता येत नाही, त्याबाबत बँकेकडून सहकार्य केले जात नाही. परिणामी ग्राहकांना फॉर्म भरण्यासाठी गावभर फिरावे लागते.शिवाय गेल्या अनेक दिवसापासून बँक परिसरात अस्वच्छता असल्याचे दृष्य पहावयास मिळते. बँकेच्या स्वच्छतेसाठी कर्मचारी नसल्याचे सांगितले जाते. सदर बँकेची पार्किंग नसल्याने येणारी वाहने रस्त्यावर उभी राहत असून अनेक छोटे मोठेअपघात नेहमीच येथे घडत आहे. याबाबत बँकेकडे व ग्रामपंचायतीकडे सतत तक्रारी करूनही अद्यापपर्यंत पार्किंगची व्यवस्था केली गेलेली नाही.बँकेच्या एटीएमची दुर्दशा...विल्होळी पंचक्रोशित एकच केटीएम असल्याने पैसे काढण्यासाठी येथे गर्दी होते. परंतु अनेक वेळा ह्या एटीएम मध्ये खडखडाट असते त्यामुळे अनेक ग्राहकांची गैरसोय होते.सकाळी नऊ वाजेपासून बँकेच्या समोर रांगेत उभा होतो. दहा वाजता बँक उघडली. पण बँकेचे कॅशियर व व्यवस्थापक न आल्याने माझे सर्व काम सोडून मला चार तास बँकेच्यासमोर रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. बँकेची वेळ निघून गेल्यानंतर कॅशियर दुपारी एक वाजता आले. मोठी रांग असल्याने त्यामध्ये माझ्यासह अनेक नागरिकांचा त्रास सहन करावा लागला.- दिनेश रूपवते, बँक ग्राहक.

टॅग्स :igatpuri-acइगतपुरीSocialसामाजिक