शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
3
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
4
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
5
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
6
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
7
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
8
२०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
9
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
10
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
11
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
12
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
13
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
14
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
15
नात्याला काळिमा! नराधम पित्याचा १३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; पोलीस आईनेच पतीला धाडले गजाआड
16
कर्ज, किडनी आणि गांजा : शेतकरी या मार्गाने का निघाले?
17
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
18
विनाशकारी विकासाला नकार! अरवलीचे संरक्षण म्हणजे विकासाला विरोध नव्हे...
19
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
20
राज्यातील वाढते रस्ते अपघात रोखा; नितीन गडकरींचे CM ना पत्र, तातडीने उपाययोजना करायची सूचना
Daily Top 2Weekly Top 5

येवला तालुक्याला वादळाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 22:04 IST

येवला/जळगाव नेऊर : मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वादळाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील जन्याबाई पोपट पाडेकर यांच्या घराचे पत्रे उडून धान्य, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय पुस्तकांचे नुकसान झाले तसेच अर्जुन आनंदा जाधव यांच्या घराचे पत्रे, कांदा चाळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देघरावरील पत्रे उडाले : पिंपळगाव लेप सजेत पंधरा लाखांचे नुकसान

येवला/जळगाव नेऊर : मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह सोसाट्याच्या वादळाने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील जन्याबाई पोपट पाडेकर यांच्या घराचे पत्रे उडून धान्य, संसारोपयोगी साहित्य, मुलांचे शालेय पुस्तकांचे नुकसान झाले तसेच अर्जुन आनंदा जाधव यांच्या घराचे पत्रे, कांदा चाळ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.जऊळके शिवारातील दिनकर सूर्यभान शिंदे यांचे पत्र्याचे शेड उडून नुकसान झाले असून, वेणूबाई चव्हाण व रंगनाथ शिंदे यांच्या घरावरील पत्रे या वाºयाने उडून गेले आहेत. तसेच चांगदेव रामा जाधव यांच्या शेतातील दत्तमंदिरावर पन्नास वर्षांपूर्वीचे पिंपळाचे झाड पडल्याने मंदिर जमीनदोस्त झाले. पिंपळगाव लेप सजेत पंधरा लाखांच्या आसपास नुकसान झाले असून, तलाठी कमलेश पाटील यांनी घरोघरी जाऊन पंचनामा केला आहे. प्रचंड उन्हाच्या काहिलीत गेल्या तीन महिन्यांपासून भाजून निघाल्यामुळे प्रत्येक जण पावसाची वाट पाहत होता; पण पावसाबरोबर वादळी वाºयाने शेतकºयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. वादळामुळे ठिकठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीसाठी हा पाऊस चांगला असला तरी शेतकºयांचे भरून न निघणारे नुकसान झाले आहे.येवलाजोरदार वादळासह अल्पपावसाचा अनुभव मंगळवारी सलग चौथ्या दिवशी येवलेकरांनी घेतला. या वादळामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. मंगळवारी अनेक ठिकाणी घरांचे पत्रे उडून लाखो रुपयांचे नुकसानझाले. तसेच खिर्डीसाठे येथे वीजपडून शेळी व मेंढी जागीच ठारझाली.गेल्या तीन दिवसांप्रमाणे मंगळवारीही सुरु वातीला दहा ते पंधरा मिनिटे जोरदार वादळ झाल्याने ग्रामीण भागात विशेषत: पूर्वभागात शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. या वादळी पावसामध्ये कोळम खुर्द येथील संतोष साहेबराव भांडे यांचे पत्रे उडाले. देवदरी, खरवंडी व रहाडी येथे वादळी वाºयामध्ये पत्रे तसेच घराचे खूप नुकसान झाले आहे. ममदापूर येथे जनार्दन गुडगे यांच्या घराचे पत्रे उडून नुकसान झाले, तर जिजाबाई लहू साबळे यांच्या घराची भिंत पडून त्या जखमी झाल्या. त्यांना उपचाराकरिता येवला येथे दाखल करण्यात आले आहे. श्रवण साबळे व भाऊसाहेब वैद्य यांचे घर पडले. येथील व खरवंडी येथे शाळेचे पत्रे उडून गेले तसेच दहेगाव, पाटोदा येथील सुधाकर आहेर यांच्या घराचेही पत्रे उडाले. खिर्डीसाठे येथे अर्जुन साबळे यांची मेंढी तसेच तुळशीराम पवार यांची शेळी वीज पडून ठार झाल्या.पिंपळगाव लेपमध्ये जन्याबाई पाडेकर यांच्या घराचे पत्र्याचे छत वादळामुळे उडाले. त्यात घरगुती सामानाचे नुकसान झाले. तसेच जन्याबाई व त्यांचा मुलगा विजय जखमी झाला असून, डोक्याला व पायाला टाके पडले. जऊळके येथे जाधव वस्तीवर पिंपळाचे झाड कोसळून नुकसान झाले. ममदापूरला अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले असून, केरे वस्ती हनुमान मंदिर वरील पत्रे उडून गेले आहेत.येवल्याच्या २० टक्के भागात अंधारशनिवारी झालेल्या वादळी पावसाने शहरात विजेचे खांब पडून तारा तुटल्या आहेत. अनेक ठिकाणी खांबावर झाडे पडल्याने खांब वाकले आहेत. तसेच तारा तुटल्याने शहराच्या बहुतांशी भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज वितरणच्या कर्मचारी व अधिकाºयांनी दोन दिवस मेहनत घेऊन अनेक भागात पुरवठा सुरळीत केला असला तरी विंचूर रोड परिसरात काही भागात सलग तिसºया दिवशी अंधार आहे. अजूनही १५ ते २० टक्के भागात वीजपुरवठा खंडित होता. जऊळके येथे विजेचे खांब तसेच तारा तुटलेल्या असून, अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडले आहेत.वादळी पावसाने झालेल्या नुकसानीचे गावनिहाय पंचनामे सुरू आहेत. भिंत पडून मृत झालेल्या महिलेच्या नातेवाइकांना व वीज पडून बैलजोडी ठार झालेल्या महिलेला शासकीय मदत देण्यात आली आहे. प्रशासन नुकसानीचा आढावा घेण्यासह पंचनामा करण्यासाठी दक्ष आहे.- रोहिदास वारु ळे, तहसीलदार, येवला