शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

पोलीस ठाण्यातील पूजापाठ होणार बंद

By admin | Updated: July 11, 2014 00:16 IST

पोलीस ठाण्यातील पूजापाठ होणार बंद

नाशिक, दि. १० - पोलीस ठाणे आणि पोलिसांच्या कोणत्याही कार्यालयामध्ये यापुढे कोणतीही पूजा अथवा धार्मिक कार्यक्र म करू नयेत, अशा सूचना गुन्हे विषयक बैठकीमध्ये देण्यात आली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमागील सूत्रधारांचा आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पुण्याचे तत्कालीन आयुक्त गुलाबराव पोळ यांनी मांत्रिकाची मदत घेतल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहेत. सत्यनारायण पूजा तर नित्यनियमानेच केली जात असल्याने, आता त्यावर देखील बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेऊनच आपली कामगिरी बजवावी हा यामागील दृष्टीकोन असल्याचे बोलले जाते. लिंबू-मिरची; काळी बाहुलीचा घेराघराला, गाडीला, दुकानाला नजर लागू नये म्हणून किंवा काही विक्षिप्त प्रकार घडू नये म्हणून लिंबू-मिरची बांधण्याची अंधश्रद्धा आपल्याकडे अगदी सर्रासपणे पाहायला मिळते. लिंबु मिरची बांधली किंवा काळी बाहुली लटकवली म्हणजे कुणाचीही वाईट नजर लागणार नाही असा समज लोकांमध्ये आहे. देशातील कुठल्याही भागात गेल्यास हा प्रकार बघावयास मिळत असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ठिकठिकाणी ‘लिंबू-मिरची टांगणे बंद अभियान’ राबविले होते. परंतु या अभियानाचा लोकांच्या मनावर फारसा परिणाम झाला नसल्याचेच बघावयास मिळत आहे. लिंबु-मिरचीच्या घेऱ्यात केवळ अशिक्षित मंडळीच गुरफटलेली आहे असे नाही तर, शिक्षित व उच्च शिक्षित मंडळी देखील लिंबू-मिरचीच्या या मोहातून मुक्त झालेले नसल्याचे चित्र बघावयास मिळते. हल्ली तर अंधश्रद्धेप्रकरणी बुवा-बाबांचा पडदाफास करणारेच अंधश्रद्धेला कळत नकळत खतपाणी घालत असल्याने, आता त्यांचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या मंडळींकडून बोलले जात आहे. डोळस अधिकारीही हतबल पोलिस दलातील बहुसंख्य अधिकारी आणि कर्मचारी डोळसपणे विचार करणारे आहेत. पण, अंधश्रद्धेच्या या परंपरा बदलण्यास त्यांनाही फारशे यश येत नसल्याचेच चित्र बघावयास मिळते. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शांताराम अवसरे यांना पोलीस ठाण्याच्या मुख्य दरवाज्यावर लटकवलेल्या ‘कोहळा’ या फळाबाबत विचारले असता, त्यांनी हतबलता दर्शवित याचा माझ्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. विशेष म्हणजे आपण हे फळ काढणार काय? असे विचारले असता, त्यांनी समर्पक उत्तर न देता, माहिती घेऊन विचार करू असे सांगितले. पोलिसांची अंधश्रद्धा नुकसान करणारी आहे काय?पोलिसांमध्ये असलेल्या अंधश्रद्धेविषयी काही अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांनी, पोलिसांमधील या अंधश्रद्धेविषयी आम्हाला माहिती आहे. पोलिसांनी आता हे विचार सोडून द्यायला हवेत. पण, ते पाळत असलेल्या अंधश्रद्धेपासून कुणाचेही नुकसान होत नाही. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याचे उल्लंघन होण्याचा प्रश्नच नाही, असे सांगण्यात आले. तसेच पोलिसांच्या अशा कृतीतून अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याची मानसिकता वाढीस लागत असून, पोलिसांनी वैज्ञानिक दृष्टीकोन अंगीकारण्याची आवश्यकता असल्याचेही काही अधिकाऱ्यांनी सांगितले. अमावस्येची रात्र म्हणजे देवाची खास उपलब्धीअमावस्येच्या रात्री सर्वाधिक चोरींच्या घटनांची नोंद होत असल्याने, अमावस्येच्या रात्रीबाबत चोरांबरोबरच पोलिसांमध्ये देखील प्रचंड गैरसमज आहेत. वास्तविक अमावस्येच्या रात्री किर्रर्र अंधाराचा फायदा घेऊन चोरटे हात साफ करतात. मात्र अमावस्येची रात्र ही खास चोरी करण्यासाठी असते, चोरांसाठी ती देवाची खास उपलब्धी आहे, असा समज काही चोरांचा आहे. त्यामुळे बहुतेक चोरटे या दिवशीच चोरीचा बेत आखतात. पोलीसांमध्ये देखील या रात्रीबाबत अनेक गैरसमज असल्याने, ते देखील अमावस्येचा दिवस अंधाश्रद्धात्मक दृष्टीकोनातून बघतात. वास्तविक चोरटे अंधाराचा फायदा घेऊनच चोरी करीत असल्याने अमावस्येच्या रात्रीला अंधश्रद्धेचा जोड देण्याची काहीही गरज नसल्याचे अंनिसकडून स्पष्ट करण्यात आले.