शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

आपले सरकार सेवा केंद्र परीचालकांचे काम बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 6:25 PM

ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी चौदाव्या वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सी.एस्.सी.-एसपी.व्ही.कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रूपये जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षातत्र ३ ते ६ हजार रु पये पर्यंत मानधन मिळते. ते सुध्दा ६महिन्यापासुन रखडले आहे. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे आॅनलाईन कामकाज ठप्प होणार आहे.विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले, उतारेसाठी ग्रामस्थांची अडचण निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देमानधन रखडले : शासनप्रणित सी.एस. सी. एस.पी.व्ही. कंपनीवर रोष

साकोरा : ग्रामीण भागातील ग्रामपंचायत अंतर्गत आपले सेवा केंद्र परीचालकांच्या नावाखाली गावाच्या विकास निधी चौदाव्या वित्त आयोगातुन रिम टोनर च्या नावाखाली सी.एस्.सी.-एसपी.व्ही.कंपनीला दरमहा एका केंद्रचालकामागे १२३३१ रूपये जातात. परंतु संगणक परीचालकाला प्रत्यक्षातत्र ३ ते ६ हजार रु पये पर्यंत मानधन मिळते. ते सुध्दा ६महिन्यापासुन रखडले आहे. त्यांनी केलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायतीचे आॅनलाईन कामकाज ठप्प होणार आहे.विविध प्रकारचे आॅनलाईन दाखले, उतारेसाठी ग्रामस्थांची अडचण निर्माण होणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचा ‘‘ड’’ घरकुल यादीचा सर्वे देखील जिल्ह्यातील संगणक परीचालक करीत होते. काम बंद आंदोलनामुळे आवास योजनेच्या कामावर देखील परीणाम झालेला दिसून येत आहे. एकीकडे शासन डिजिटल इंडिया , डिजिटल महाराष्ट्र करत आहे. परंतु डिजिटल इंडिया करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परीचालक हा महत्वाचा घटक आहे. संगणक परीचालकांनी अनेक आंदोलने केली आहे. परंतु शासनाने त्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत सी.एस. सी. एस.पी.व्ही. कंपनीला पाठीशी घालुन संगणक परीचालकांवर अन्याय करत आहे.तरी सर्व थकीत मानधन संगणक परीचालकांना मीळावे, पंचायत समतिी मधील संगणक परीचालकांना आपले सरकार प्रकल्पामध्ये सामावुन घ्यावे अशा प्रकारचे निवेदन नाशिक जिल्हा सरचिटणीस सोमनाथ उडकुडे , नांदगाव तालुका अध्यक्ष दिपक त्रिभुवन , उपाध्यक्ष विजय आहेर सचिव राकेश ताडगे यांनी गटविकास अधिकारी यांना दिले आहे.यावेळी तालुक्यातील सर्व संगणक परिचालक उपस्थित होते.कंपनीच्या अनागोंदीमुळे मानधन ठप्पजिल्हयातील संगणक परीचालक यांचे एप्रिल,मे,जून २०१७ चे मानधनाचे पैसे कंपनीला जाऊन एक वर्ष पूर्ण होऊन गेले तरी कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे अजून मानधन प्राप्त झाले नाही. ग्रामपंचायत मधून मागील मिहन्याचे चेक जिल्हा परीषदेला जमा करून पण अद्याप जून मिहन्यापर्यंतचे मानधन झालेले नाही. जिल्ह्यात ग्रामपंचायत मार्फत जुलै २०१८ पासून पुढील महिन्याचे चेक पूर्ण ग्रामपंचायत चे अद्याप जमा झालेले नाही त्यामुळे पुढील मानधन कसे होणार व कधी होणार याची शाश्वती नाही. काही संगणक परीचालकांचे इनव्हाईस डिममध्ये गेल्याने सदर महिन्यातील मानधन झालेले नाही.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक