शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
3
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
4
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
5
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
6
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
7
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
8
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
9
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
10
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
12
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
13
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
14
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
15
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
16
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
17
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
18
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
19
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
20
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
Daily Top 2Weekly Top 5

शेतमजूर महिलांचा प्रकाशा मार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:44 IST

येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

देवळा : येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.  देवळा तालुक्याचा पूर्व भाग तसेच मालेगाव, चांदवड आदी तालुक्यांतील शेकडो शेतमजूर दुष्काळामुळे देवळा तालुक्याच्या पश्चिम भागात दररोज रोजगारासाठी पीकअप, रिक्षा आदी खासगी वाहनांतून येतात. दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घरी परतत असताना देवळा शहरातील विंचूर-प्रकाशा महामार्गावर मालेगाव नाक्यावर देवळा वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवून कागदपत्रांची मागणी केली व अवैध प्रवासी वाहतूक केल्याबद्दल चालकावर दंडात्मक कारवाई केली. त्यावेळी गाडीतील मजूर महिलांनी आम्हाला घरी लवकर जाऊ द्या, अशी विनंती केली. वाहनातून अनधिकृत प्रवासी वाहतूक केली म्हणून दंड भरल्याशिवाय गाडी सोडणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने संतप्त महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊन वाहनधारकांची व पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, मजुरांची वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना पोलीस दंडात्मक कारवाई करत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या गाडीतील मजुरांना कळवण नाक्यावर उतरवून दिले व मालेगाव नाक्याच्या पुढे शहराबाहेर पायी जाण्यास सांगितले. यामुळे शहरातून मजुरांचे जत्थे जात असल्याचे चित्र होते.यावेळी देवळा बाजार समितीचे माजी सभापती अशोक अहेर, संतोष शिंदे, सुनील अहेर आदींसह शेतकºयांनी पोलिसांच्या या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली व पोलिसांना सामंजस्याची भूमिका घेण्याची विनंती केली. पोलिसांनी समझदारी दाखवल्याने कटू प्रसंग टळला व अर्धा तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.सध्या दुष्काळी स्थिती निर्माण झाली असल्याने शेजारील तालुक्यातील आदिवासी महिला रोजगारासाठी विविध वाहनांनी देवळा तालुक्यात येतात. त्यांना त्रास देऊ नये अशी विनंती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीWomenमहिलाTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस