शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शेतमजूर महिलांचा प्रकाशा मार्गावर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:44 IST

येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

देवळा : येथील विंचूर-प्रकाशा महामार्गावर पोलिसांनी गाडी अडवली म्हणून शेतमजूर महिलांनी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ठिय्या आंदोलन सुरू केल्याने वाहतूक खोळंबली होती. शहरातील नागरिकांनी पोलीस व महिलांची समजूत घातल्याने सुमारे अर्धा तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.  देवळा तालुक्याचा पूर्व भाग तसेच मालेगाव, चांदवड आदी तालुक्यांतील शेकडो शेतमजूर दुष्काळामुळे देवळा तालुक्याच्या पश्चिम भागात दररोज रोजगारासाठी पीकअप, रिक्षा आदी खासगी वाहनांतून येतात. दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घरी परतत असताना देवळा शहरातील विंचूर-प्रकाशा महामार्गावर मालेगाव नाक्यावर देवळा वाहतूक पोलिसांनी त्यांची गाडी अडवून कागदपत्रांची मागणी केली व अवैध प्रवासी वाहतूक केल्याबद्दल चालकावर दंडात्मक कारवाई केली. त्यावेळी गाडीतील मजूर महिलांनी आम्हाला घरी लवकर जाऊ द्या, अशी विनंती केली. वाहनातून अनधिकृत प्रवासी वाहतूक केली म्हणून दंड भरल्याशिवाय गाडी सोडणार नाही अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने संतप्त महिलांनी रस्त्यातच ठिय्या दिला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी होऊन वाहनधारकांची व पोलिसांची धावपळ उडाली. दरम्यान, मजुरांची वाहतूक करणाऱ्या इतर वाहनचालकांना पोलीस दंडात्मक कारवाई करत असल्याची माहिती मिळताच त्यांनी आपल्या गाडीतील मजुरांना कळवण नाक्यावर उतरवून दिले व मालेगाव नाक्याच्या पुढे शहराबाहेर पायी जाण्यास सांगितले. यामुळे शहरातून मजुरांचे जत्थे जात असल्याचे चित्र होते.यावेळी देवळा बाजार समितीचे माजी सभापती अशोक अहेर, संतोष शिंदे, सुनील अहेर आदींसह शेतकºयांनी पोलिसांच्या या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली व पोलिसांना सामंजस्याची भूमिका घेण्याची विनंती केली. पोलिसांनी समझदारी दाखवल्याने कटू प्रसंग टळला व अर्धा तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली.सध्या दुष्काळी स्थिती निर्माण झाली असल्याने शेजारील तालुक्यातील आदिवासी महिला रोजगारासाठी विविध वाहनांनी देवळा तालुक्यात येतात. त्यांना त्रास देऊ नये अशी विनंती नागरिकांनी पोलीस प्रशासनाला केली आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीWomenमहिलाTrafficवाहतूक कोंडीPoliceपोलिस