शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

अभोण्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

By admin | Updated: July 23, 2016 00:18 IST

अभोण्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको

 निषेध : जिल्ह्यातील अडतसंदर्भात कांदा खरेदी-विक्री बंद अभोणा : महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरुद्ध कांदा-बटाटा खरेदीदार व्यापाऱ्यांनी गेल्या १२ दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा खरेदी बंद केली होती. त्यावर शासनाने तडजोड करून कृषी बाजार समितीमध्ये कांदा खरेदी सुरू केली आहे. जिल्ह्यातील फळे, भाजीपाला खरेदी सुरू केली आहे. व्यापारी ते ग्राहक असा व्यापार सुरू केला आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी अडतसंदर्भात आडमुठेपणाचे धोरण घेऊन कांदा खरेदी-विक्री बंद केल्याने परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी गुरुवारी दुपारी १ वाजेदरम्यान येथील चार रस्त्यांना जोडणाऱ्या चौफुलीवर रास्ता रोको करून जवळपास दोन तास वाहतूक बंद केली. यावेळी भाई दादाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र भामरे, अण्णासाहेब मराठे, हरिश्चंद्र देसाई, मधुकर भदाणे, संतोष देशमुख आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले. शासनाने योग्य निर्णय घेऊन सोमवारपासून कळवण कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने गेल्या सात दिवसात कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा प्रत्यक्ष फटका हा शेतकऱ्यांना, तर अप्रत्यक्षरीत्या नागरिकांना बसला आहे. पावसाने शेतकऱ्यांमध्ये जरी आनंदाचे वातावरण असले तरी दुसरीकडे बाजार समितीचे लिलाव प्रक्रियेचे कामकाज बंद असल्याने शेतीसाठी औषध, अवजारे आणावे कुठून यासारख्या अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण झाल्या आहेत. शेतकरी बांधवांची आर्थिक कोंडी झाली असून, शासनाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. राजू पाटील, संतोष देशमुख, विजय देसाई, पंडित वाघ, विजय चव्हाण, बाबाजी वाघ, गिरीश देवरे, विठ्ठल ढुमसे, योगेश वेढणे, सोमनाथ सोनवणे, दीपक सोनजे, शेखर जोशी आदि शेतकरी बांधव उपस्थित होते. (वार्ताहर)