शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

पाणीप्रश्नी नांदगावी रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 16:03 IST

सर्वपक्षीय आंदोलन : नवीन पाईपलाईनची मागणी

ठळक मुद्देनांदगाव शहराला काही प्रमाणात माणिकपुंज धरणातून आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असतो.

नांदगाव : नांदगाव शहरास पाणी पुरवठा करणारी माणिकपुंज धरणाची मुख्य जलवाहिनी रस्त्याच्या कामामुळे ठिकठिकाणी वारंवार फुटत असल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून सदर जलवाहिनी लोखंडी (जीआय) बनवून द्यावी या मागणीसाठी नगराध्यक्ष राजेश कवडे व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली हुतात्मा चौकात सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आला. या संदर्भात तहसीलदार भारती सागरे यांना निवेदन देण्यात आले.नांदगाव शहराला काही प्रमाणात माणिकपुंज धरणातून आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत असतो. सदरची जलवाहिनी नांदगाव औरंगाबाद रस्त्याला समांतर आहे. अलीकडेच हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग म्हणून जाहीर झाला आहे. या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गाचे मजबुतीकरण व रु दीकरणाचे काम सुरु असल्याने खोदकाम करतांना पाईप लाईन अनेक ठिकाणी वारंवार फुटत आहे. त्यामुळे पाण्याचे आवर्तन लांबणीवर पडून शहरातील नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित पाईप लाईन तातडीने बदलवून द्यावी,अशी आग्रही मागणी नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी रास्ता रोको प्रसंगी व्यक्त केली. अ‍ॅड. सचिन साळवे यांनी संबंधितांनी लोखंडी पाईप लाईन बनवून देण्याचे आश्वासन पाळले नसल्याचे सांगितले. शहराला होणारा पाणी पुरवठा लांबणीवर पडत असल्याने अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली आहे. रस्त्यांवर सर्वत्र पाण्याचे टॅँकर दिसू लागले असून त्यांचेही दर वाढले आहेत. त्याची झळ नागरिकांना पोहोचत आहे. दरम्यान, रास्ता रोकोमुळे औरंगाबाद मालेगाव येवला भागाकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

टॅग्स :Nashikनाशिकwater shortageपाणीटंचाई