शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

विरोधी पक्षांचे पाणी रोको आंदोलन : रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 01:49 IST

गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करीत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला.

पंचवटी : गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयाला सत्ताधारी भाजपा वगळता मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा या सर्वपक्षीयांनी एकत्र येत विरोध दर्शवित पाणी सोडण्यास कडाडून विरोध केला आहे. शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाचा विचार न करता परस्पर घेतलेल्या निर्णयाचा निषेध म्हणून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २४) दुपारी रामकुंडात पाण्यात उतरून घोषणाबाजी करीत सत्ताधारी भाजपा तसेच शासनाचा निषेध नोंदविला.  यावेळी सर्वपक्षीयांनी गोदावरीची महाआरती केली. नाशिकच्या गंगापूर धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी घेतला. सदरचा निर्णय घेताना नाशिकच्या नागरिकांना पिण्यासाठी लागणाºया पाण्याचा अंदाज घेतलेला नाही तसेच नाशिकच्या जनतेसाठी धरणातून पाणी आरक्षित केलेले नाही.यावेळी धरण उशाशी कोरड घशाशी, पाणी नाही कुणाच्या बापाचे ते तर आमच्या हक्काचे, नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी अशा घोषणा दिल्या. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, मनसे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष अनंता सूर्यवंशी, मनपा विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, माजी महापौर अशोक मुर्तडक, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बडवे, विलास शिंदे, माकपचे श्रीधर देशपांडे, गजानन शेलार, शाहू खैरे, राजेंद्र बागुल, पूनम मोगरे, वैशाली भोसले, दिगंबर मोगरे, प्रवीण भाटे, खंडू बोडके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांनी नाशिकला येऊन नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. यंदाच्या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्यातच आता जायकवाडीला पाणी देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. नाशिकचे पाणी नाशिकच्या जनतेसाठी असून, हे हक्काचे असल्याने कुणालाही देऊ नये. दत्तक नाशिकला सत्ताधारीच सावत्रपणाची वागणूक देत असल्याने नाशिक दत्तक की सावत्र असा प्रश्न तमाम नाशिककरांना पडला आहे. नाशिकचे पाणी जायकवाडीला सोडल्यास आंदोलन छेडण्यात येईल.- अ‍ॅड. राहुल ढिकले, मनसे प्रदेश उपाध्यक्षदुष्काळजन्य परिस्थितीयंदा कमी प्रमाणात पाऊस झाल्याने नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे असे असतानाही जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेल्याने सत्ताधारी वगळता सर्वपक्षीयांनी एकत्र येत पाणी सोडण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध केला आहे.मनसे, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व माकपा पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रामकुंडावर एकत्र येत पाण्यात उतरून हातात फलक घेत शासनाचा व सत्ताधारी पक्षाचा निषेध नोंदविला.

टॅग्स :godavariगोदावरीMarathwadaमराठवाडाWaterपाणीgangapur damगंगापूर धरण