शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
2
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईन; निर्मला सीतारामन यांचे विधान
3
गणेश विसर्जनावेळी वीजेचा शॉक लागून दुर्घटना; एकाचा मृत्यू, चौघे जखमी, मुंबईतील घटना
4
पंतप्रधानांच्या मणिपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; १५००० लोकांची बैठक व्यवस्था, स्टेज उभारणीचे काम सुरू
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
6
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
7
खलिस्तानी अतिरेक्यांना कॅनडामधून मदत; कनडा सरकारचा अहवाल : दोन संघटनांची केली नोंद
8
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
9
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
10
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
11
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
12
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
13
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
14
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
15
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
16
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
17
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
18
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
19
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
20
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 

म्हसरूळला रास्ता रोको

By admin | Updated: February 22, 2017 01:39 IST

यादीतून नावे गायब : साडेसहाशे मतदारांची तक्रार, साडेसहा तास ठिय्या

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एक म्हसरूळमधील वडनगर, महालक्ष्मीनगर तसेच मळे परिसरातील सुमारे साडेसहाशे मतदारांची नावे मतदार यादीत नसल्यामुळे संतप्त झालेल्या मतदारांनी दोन वेळा रास्ता रोको करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ मतदानाचा हक्क मिळणार नसेल तर पुनर्मतदानाची मागणी करून पंचवटीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारीत त्यांचे वाहन अडवून धरले होते़ दरम्यान, मनपा अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांना अक्षरश: आश्वासनांवर झुलवत ठेवले. म्हसरूळ गावातील वडनगर, महालक्ष्मीनगर, गोहाड मळे परिसरातील सुमारे साडेसहाशे नागरिकांचे मतदान यादीत नाव नसल्याने मतदार आक्रमक झाले़ दहा वाजेच्या सुमारास संतप्त नागरिकांनी मनपाच्या विद्यानिकेतन क्रमांक ८९ मध्ये जाऊन तेथील केंद्राध्यक्षांना जाब विचारण्यासाठी कूच केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे व कर्मचाऱ्यांनी यातील पाच प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी शाळेत सोडले़ त्याठिकाणी केंद्राचे अध्यक्ष प्रेमराज गुळवे यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी अधिकारी प्रशांत शिवगुडे यांचा नंबर दिला़  नागरिकांनी फोन केल्यानंतर अधिकारी शिवगुडे शाळेत आले व त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला़ तर बराच वेळ होऊनही विचारणा करण्यासाठी गेलेले प्रतिनिधी बाहेर येत नसल्याने महिला तसेच पुरुष मंडळी अस्वस्थ झाली व त्यांनी पोलिसांशी बाचाबाची सुरू करून रास्ता रोको आंदोलन केले़ यानंतर आमचे मतदान होणार नसेल तर सर्वच ठिकाणचे मतदान थांबवा, अशी भूमिका घेत सुमारे पाचशे नागरिकांचा जमाव पेट्रोलपंपावरील मतदान केंद्र बंद करण्यासाठी पायी निघाला़ या ठिकाणी पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ ते ३ चे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ए़ पी़ वाघ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले़ निवडणूक निर्णय अधिकारी वाघ यांनी नागरिकांना नाव शोधून देण्याचे आश्वासन देऊन म्हसरूळ पोलीस चौकीकडे पाठविले़ नागरिकांनी रांग लावून तसेच नावांची यादी तयार करून ती शोधण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडे दिली़ मात्र नावे सापडत नसल्याने आक्रमक झालेले नागरिक पाहून वाघ दुसऱ्या वाहनात बसून निघून गेले़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दुसऱ्यांदा रास्ता रोको केला़ यावेळी पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते़ यानंतर निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविल्याचे कारण सांगत पोलीस व मनपा अधिकाऱ्यांनी या नागरिकांना सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत झुलवत ठेवले व त्यानंतर घरी काढून देण्यात आले़ दरम्यान, स्थानिक रहिवासी असून केवळ स्थानिक निवडणुकीतच नावे गायब करण्यामागे मोठे राजकारण असल्याचा आरोप करून नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)