शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

म्हसरूळला रास्ता रोको

By admin | Updated: February 22, 2017 01:39 IST

यादीतून नावे गायब : साडेसहाशे मतदारांची तक्रार, साडेसहा तास ठिय्या

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एक म्हसरूळमधील वडनगर, महालक्ष्मीनगर तसेच मळे परिसरातील सुमारे साडेसहाशे मतदारांची नावे मतदार यादीत नसल्यामुळे संतप्त झालेल्या मतदारांनी दोन वेळा रास्ता रोको करून प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ मतदानाचा हक्क मिळणार नसेल तर पुनर्मतदानाची मागणी करून पंचवटीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारीत त्यांचे वाहन अडवून धरले होते़ दरम्यान, मनपा अधिकाऱ्यांनी सायंकाळपर्यंत आंदोलनकर्त्यांना अक्षरश: आश्वासनांवर झुलवत ठेवले. म्हसरूळ गावातील वडनगर, महालक्ष्मीनगर, गोहाड मळे परिसरातील सुमारे साडेसहाशे नागरिकांचे मतदान यादीत नाव नसल्याने मतदार आक्रमक झाले़ दहा वाजेच्या सुमारास संतप्त नागरिकांनी मनपाच्या विद्यानिकेतन क्रमांक ८९ मध्ये जाऊन तेथील केंद्राध्यक्षांना जाब विचारण्यासाठी कूच केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे व कर्मचाऱ्यांनी यातील पाच प्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी शाळेत सोडले़ त्याठिकाणी केंद्राचे अध्यक्ष प्रेमराज गुळवे यांच्याकडे विचारणा केल्यानंतर त्यांनी अधिकारी प्रशांत शिवगुडे यांचा नंबर दिला़  नागरिकांनी फोन केल्यानंतर अधिकारी शिवगुडे शाळेत आले व त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा सल्ला दिला़ तर बराच वेळ होऊनही विचारणा करण्यासाठी गेलेले प्रतिनिधी बाहेर येत नसल्याने महिला तसेच पुरुष मंडळी अस्वस्थ झाली व त्यांनी पोलिसांशी बाचाबाची सुरू करून रास्ता रोको आंदोलन केले़ यानंतर आमचे मतदान होणार नसेल तर सर्वच ठिकाणचे मतदान थांबवा, अशी भूमिका घेत सुमारे पाचशे नागरिकांचा जमाव पेट्रोलपंपावरील मतदान केंद्र बंद करण्यासाठी पायी निघाला़ या ठिकाणी पंचवटी विभागातील प्रभाग क्रमांक १ ते ३ चे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ए़ पी़ वाघ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले़ निवडणूक निर्णय अधिकारी वाघ यांनी नागरिकांना नाव शोधून देण्याचे आश्वासन देऊन म्हसरूळ पोलीस चौकीकडे पाठविले़ नागरिकांनी रांग लावून तसेच नावांची यादी तयार करून ती शोधण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांकडे दिली़ मात्र नावे सापडत नसल्याने आक्रमक झालेले नागरिक पाहून वाघ दुसऱ्या वाहनात बसून निघून गेले़ या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी दुसऱ्यांदा रास्ता रोको केला़ यावेळी पोलीस उपायुक्त दत्तात्रय कराळे, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण यांनीही समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र नागरिक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते़ यानंतर निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविल्याचे कारण सांगत पोलीस व मनपा अधिकाऱ्यांनी या नागरिकांना सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत झुलवत ठेवले व त्यानंतर घरी काढून देण्यात आले़ दरम्यान, स्थानिक रहिवासी असून केवळ स्थानिक निवडणुकीतच नावे गायब करण्यामागे मोठे राजकारण असल्याचा आरोप करून नाराजी व्यक्त केली़ (प्रतिनिधी)