शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

नाशिक जिल्हा बॅँकेच्या भगूर शाखेत पैसे वाटप बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 18:27 IST

लोकमत न्युज नेटवर्क नाशिक : येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून गेल्या एक महिन्यापासून खातेदारांना पैसे देण्याचे बंद ...

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक: येथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून गेल्या एक महिन्यापासून खातेदारांना पैसे देण्याचे बंद करण्यात आले असून, त्यामुळे परिसरातील खातेधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. एवढेच नव्हे तर ठेवींची मुदत संपल्यानंतरही त्याची रक्कम देण्याऐवजी त्या ठेवी पुन्हा नूतनीकरण करण्याचा आग्रह बॅँकेच्या अधिकाऱ्यांकडून धरला जात आहे.नोटाबंदीनंतर जिल्हा बॅँकेच्या भगूर शाखेतून खातेदारांना मोठी रक्कम मिळत नसली तरी, दोन ते तीन हजार रुपये बॅँकेतून काढता येत असल्याने खातेदारांची फारशी ओरड नसली तरी, गेल्या एक महिन्यापासून बॅँकेने आता तेवढीही रक्कम देणे बंद करून टाकत, पैशांसाठी नाशिकच्या मुख्यालयात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. या संदर्भात खातेदार अंबादास जिवराम आडके यांनी त्यांच्या पन्नास हजार रुपयांच्या ठेवीची मुदत संपुष्टात आल्याने बॅँकेकडे पैसे परतीची मागणी केली असता, शाखा प्रबंधक ए. बी. पानसरे यांनी त्यांना पैसे शिल्लक नसल्याचे कारण देत मुदत ठेवीचे नूतनीकरण करण्याचा सल्ला दिला. पैसे हवेच असतील तर बॅँकेच्या मुख्य कार्यालयाकडे मागणी करा, असे सांगितले. त्यावर आडके यांनी त्यांच्याकडे लेखी देण्याची मागणी केली व चुकीच्या पद्धतीने बॅँकेने कर्ज वाटप केले व ते वसूल होत नसल्याने त्याचा खातेदारांना त्रास का असा सवाल केला. अखेर वाद वाढू लागल्याचे पाहून प्रबंधक पानसरे यांनी २५, २५ हजाराचे दोन चेक देऊन आरटीजीएस केले व पैसे नंतर खात्यात वर्ग होणार असे सांगितले.दरम्यान या संदर्भात शाखा प्रबंधक ए. बी. पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, कर्जदाराकडून कर्ज वसुलीचा विशेष प्रयत्न सुरू असून, बँकेच्या मुख्य शाखेत पैसे वाटप चालू असते. सध्या पैशांच्या कमतरतेमुळे भगूर शाखेतून पैसे वाटप बंद करण्यात आले आहे. एक महिन्यापासून ग्राहकांचा वीज बिल भरणा शाखेत स्वीकारला जात आहे. 

टॅग्स :bankबँकNashikनाशिक