शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मृत कामगारांच्या न्यायासाठी मनसेचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 00:03 IST

वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे जवळील एका कंपनीत चार दिवसांपूर्वी पत्रा तूटून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. याबाबत त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी तसेच या प्रकरणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तहसीलदार यांना दिले आहे.

ठळक मुद्देकामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे जवळील एका कंपनीत चार दिवसांपूर्वी पत्रा तूटून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. याबाबत त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी तसेच या प्रकरणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकारचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने तहसीलदार यांना दिले आहे.निवेदनात म्हटले आहे की वाडीवऱ्हे एम. आय. डी. सी. मध्ये चार दिवसांपूर्वी वाडीवऱ्हे येथील फैब कंपनीमध्ये उंचावरून पडून दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कामगारांना सुरक्षा विषयक साहित्य पुरवले नसल्याने अशाप्रकारचे अपघात घडत असतात. त्यामुळे कंपनी प्रशासनाचे कामगार संरक्षणाकडे दुर्लक्ष झालेले आहे, हे यावरून दिसून येत आहे. यामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.या कंपनीमध्ये अती जोखमीचे व अवजड लोखंडी काम असून कामगारांना कोणतेही सुरक्षा किंवा सुरक्षाविषयक साहित्य दिले जात नाही. या अगोदरपण या कारखान्यात छोटे मोठे अपघात झाले आहेत. येथील कामगार जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यामुळे या व इतर कामगारांचा विमा उतरविला आहे का? कामगार कायद्यानुसार कामगारांना सर्व सुविधा पुरविल्या जातात का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने मंगळवारी (दि.१५) ईगतपुरीचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांना निवेदन दिले आहे. या अपघाताची सखोल चौकशी करावी व मृत कामगारांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी मनविसे जिल्हा उपाध्यक्ष आत्माराम मते व विधानसभा अध्यक्ष गणेश मुसळे यानी वाडीवऱ्हे गोंदे एमआयडीसीतील कामगारांची कैफियत तहसीलदार यांना भेटून मांडली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :MNSमनसेPoliticsराजकारण