शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

शेतमाल निर्यातवाढीसाठी राज्य स्तरावर प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 01:29 IST

शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत विक्री व निर्यातीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन, शेतमालाची निर्यात मोठ्या प्रमाणत वाढावी, याकरिता राज्य स्तरावर कृषी विभागामार्फत कृती दल गठित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

ठळक मुद्देदादा भुसे : आदिवासींच्या रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन

नाशिक : शेतकऱ्यांनी कोरोनासारखी आपत्ती, तसेच नैसर्गिक अतिवृष्टी किंवा दुष्काळासारखे संकट असेल, अशा परिस्थितीतही शेतात राबून आपल्याला अन्नधान्य, भाजीपाला उपलब्ध करून दिला आहे. त्या अनुषंगाने शेतात पिकणाऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत विक्री व निर्यातीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊन, शेतमालाची निर्यात मोठ्या प्रमाणत वाढावी, याकरिता राज्य स्तरावर कृषी विभागामार्फत कृती दल गठित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि.१२) नाशिक पंचायत समिती येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन कृषी मंत्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, रानभाज्यांची ओळख व संवर्धन यामध्ये आदिवासी बांधवांचे फार मोठे योगदान आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकार क्षमता वाढावी, यासाठी रानभाज्यांचा दैनंदिन आहारात समावेश होणे आवश्यक आहे. रानभाज्यांना आयुर्वेदात अनन्यसाधारण महत्त्व असून, त्या पौष्टीक व जीवनसत्वयुक्त असल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी ग्रामीण भागाबरोबर शहरी भागातील नागरिकांनाही त्याची माहिती मिळावी, हा या सप्ताहाचा महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे रानभाजी महोत्सव एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता पावसाळ्यात दर रविवारी किंवा महिन्यातून किमान एक-दोन वेळा याचे आयोजन करावे, अशा सूचनाही कृषी मंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.

या महोत्सवामध्ये जिल्ह्यात उपलब्ध होणाऱ्या सर्व रानभाज्या व रानफळांची वैशिष्टे, गुणधर्म व आरोग्यासाठी उपयोग, संवर्धन पद्धती, भाजीची पाककृती (रेसिपी) यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. कृषी विभागाने या आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा अनुभव व ज्ञानाचा फायदा करून घेऊन, सदर रानभाज्यांची माहिती ही पुस्तक स्वरूपात तयार करून जतन करावी व त्या माहितीची जनजागृती व प्रसार करावा, तसेच हे प्रदर्शन भरविण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देऊन कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या कामाचे कौतुक कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले आहे.

यावेळी रानभाज्यांचे संवर्धन, संकलन व प्रसार आणि प्रचार करण्यासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि वृक्ष भेट देऊन सन्मान करण्यात आला, तसेच कृषी विभागातील युरिया ब्रिकेट अंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला. या महोत्सवात ७७ भाज्यांचा प्रदर्शनात समावेश करण्यात येऊन २५ भाज्या या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, प्रकल्प संचालक उज्ज्वला बावके, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, दिलीप देवरे, गटविकास अधिकारी डॉ. सागरिका वारी आदि उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती