शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
4
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
5
वयाच्या १५ व्या वर्षीच अक्षय कुमारच्या लेकाने सोडलंय घर, आरवच्या सवयी वाचून व्हाल शॉक!
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
7
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
8
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
9
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
10
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
11
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
12
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
13
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
14
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
15
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
16
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
17
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
18
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
19
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
20
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ

कांदा लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2020 11:29 PM

नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : बदलत्या हवामानाने नुकसान

नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.जिल्ह्यात कांद्याचे आगार म्हणून नायगाव खोऱ्याची ओळख आहे. यंदा मात्र खोऱ्यातील कांदा पीक सतत पडणारा पाऊस व बदलणाऱ्या हवामानामुळे पुरता खराब झाला आहे. महागडे कांदा बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी टाकलेली रोपे पूर्णता वाया गेली. शेतातील आर्द्रता व खराब हवामान यामुळे रोपांची उगवणच झाली नाही. लागवड केलेले कांदा पीक पाऊस व हवामानामुळे शेतातच सडले. वारंवार रोपे व कांदा लागवड करूनही खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.कांदा पीक मशागत, लागवड, खते व औषध आदी खर्च करूनही वाया गेल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची यंत्राद्वारे पेरणी करण्याची शक्कल लढवली आहे. कमी खर्चात कांद्याचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे प्रत्येक गावात या पेरणीयंत्राला मागणी वाढली आहे. बघता बघता संपूर्ण नायगाव खोऱ्यात कांद्याची लागवड करण्याऐवजी पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. नायगाव खोऱ्याबरोबरच पश्चिम पट्ट्यातील चिंचोली, मोह, वडगाव पिंगळा आदी गावांमध्येही पेरणी करण्यावर शेतकरी भर देताना दिसत आहे. आत्तापर्यंत शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी पूर्ण पूर्ण झाली आहे.यावर्षी पाऊस व दूषित हवामानामुळे लागवड केलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पेरणीयंत्राच्या साह्याने कांदा पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा वावरबांधणी, कांदा लागवड, रोपांची निगा आदींसह इतर खर्चाची बचत होत आहे. त्यामुळे कांदा पिकाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.- अजय हुळहुळे, शेतकरी, वडगाव पिंगळा 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी