शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

कांदा लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 01:15 IST

नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.

ठळक मुद्देसिन्नर तालुका : बदलत्या हवामानाने नुकसान

नायगाव : सतत बदलणाऱ्या हवामानामुळे कांदा रोपांची व लागवड केलेल्या कांद्याचे नुकसान होत आहे. लागवडीचा खर्च परवडत नसल्याने शेतकऱ्यांनी लागवडीऐवजी पेरणीचा फंडा सुरू केला आहे. सिन्नरच्या उत्तर व पश्चिम पट्ट्यात शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी करण्यावर शेतकऱ्यांनी भर दिला आहे.जिल्ह्यात कांद्याचे आगार म्हणून नायगाव खोऱ्याची ओळख आहे. यंदा मात्र खोऱ्यातील कांदा पीक सतत पडणारा पाऊस व बदलणाऱ्या हवामानामुळे पुरता खराब झाला आहे. महागडे कांदा बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी टाकलेली रोपे पूर्णता वाया गेली. शेतातील आर्द्रता व खराब हवामान यामुळे रोपांची उगवणच झाली नाही. लागवड केलेले कांदा पीक पाऊस व हवामानामुळे शेतातच सडले. वारंवार रोपे व कांदा लागवड करूनही खरिपापाठोपाठ रब्बीचा हंगाम वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.कांदा पीक मशागत, लागवड, खते व औषध आदी खर्च करूनही वाया गेल्यामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची यंत्राद्वारे पेरणी करण्याची शक्कल लढवली आहे. कमी खर्चात कांद्याचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे प्रत्येक गावात या पेरणीयंत्राला मागणी वाढली आहे. बघता बघता संपूर्ण नायगाव खोऱ्यात कांद्याची लागवड करण्याऐवजी पेरणीला शेतकऱ्यांनी पसंती दिली आहे. नायगाव खोऱ्याबरोबरच पश्चिम पट्ट्यातील चिंचोली, मोह, वडगाव पिंगळा आदी गावांमध्येही पेरणी करण्यावर शेतकरी भर देताना दिसत आहे. आत्तापर्यंत शेकडो हेक्टर क्षेत्रावर कांद्याची पेरणी पूर्ण पूर्ण झाली आहे.यावर्षी पाऊस व दूषित हवामानामुळे लागवड केलेल्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करून पीक वाया गेल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. पेरणीयंत्राच्या साह्याने कांदा पेरणी केल्यास शेतकऱ्यांचा वावरबांधणी, कांदा लागवड, रोपांची निगा आदींसह इतर खर्चाची बचत होत आहे. त्यामुळे कांदा पिकाच्या पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे.- अजय हुळहुळे, शेतकरी, वडगाव पिंगळा 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी