शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:42 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

ठळक मुद्देऊस मिळविण्यासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत.दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.निफाड तालुक्यातील चांदोरी येथे अनेक उसाचे खासगी व्यापारी असून, त्यांच्यामार्फत गुजरात, दिल्ली, राजस्थान येथे रसवंतीकरिता तसेच चांदोरी व पिंपळस येथील गूळ उद्योगास ऊस पाठविला जातो. त्यामुळे तालुक्यातील गोदाकाठ भागात उसाची व्यापारीपेठ निर्माण झाली आहे.यंदाच्या गळीत हंगामासाठी गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ झाला आहे. तसेच जिल्ह्यात व नगर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पोहोचविण्यासाठी चाळीसगाव, बीड, औरंगाबाद येथील ऊसतोडणी मजूर चांदोरी परिसरात दाखल झाले आहेत. साधारणत: सर्वच कारखान्याचे बॉयलर पेटले असून, दसरा झाल्यानंतर साखर कारखाने सुरू केले जातात. त्यानंतर अनेक महिने कारखान्यांचे गाळप सुरू असते. बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहाराचे गणित हे द्राक्ष व उसाच्या पिकांवर अवलंबून असते. त्यामुळे उसाला जास्त दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे. प्रामुख्याने, जादा दर देणाºया कारखान्यांना किंवा व्यापाऱ्यांना ऊस देण्याकडे शेतकºयांचा कल आहे, तर बाहेरील कारखान्यांनी गोदाकाठ परिसरातील ऊस सर्वात लवकर उचलण्याची घाई चालविली आहे. प्रामुखयाने नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गोदाकाठ भागातील ऊस मिळविण्यासाठी जादा दर देवून प्रयत्न चालविले आहे. खासगी कारखान्यांचे आव्हानउसाला हमीभाव मिळत असल्याने बव्हंशी शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देतात. पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असल्याने त्याचा लागवडीवर परिणाम होत आहे. ऊस नैसर्गिक आपत्तीला बळी पडत नाही, असा समज आहे. गारपीट किंवा तत्सम काही घटना घडली तरी उसाचे फार नुकसान होत नाही, असे शेतकºयांना वाटते. साखर कारखानदारीत दर देण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यात खासगी कारखान्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक