शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:42 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

ठळक मुद्देऊस मिळविण्यासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत.दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.निफाड तालुक्यातील चांदोरी येथे अनेक उसाचे खासगी व्यापारी असून, त्यांच्यामार्फत गुजरात, दिल्ली, राजस्थान येथे रसवंतीकरिता तसेच चांदोरी व पिंपळस येथील गूळ उद्योगास ऊस पाठविला जातो. त्यामुळे तालुक्यातील गोदाकाठ भागात उसाची व्यापारीपेठ निर्माण झाली आहे.यंदाच्या गळीत हंगामासाठी गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ झाला आहे. तसेच जिल्ह्यात व नगर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पोहोचविण्यासाठी चाळीसगाव, बीड, औरंगाबाद येथील ऊसतोडणी मजूर चांदोरी परिसरात दाखल झाले आहेत. साधारणत: सर्वच कारखान्याचे बॉयलर पेटले असून, दसरा झाल्यानंतर साखर कारखाने सुरू केले जातात. त्यानंतर अनेक महिने कारखान्यांचे गाळप सुरू असते. बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहाराचे गणित हे द्राक्ष व उसाच्या पिकांवर अवलंबून असते. त्यामुळे उसाला जास्त दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे. प्रामुख्याने, जादा दर देणाºया कारखान्यांना किंवा व्यापाऱ्यांना ऊस देण्याकडे शेतकºयांचा कल आहे, तर बाहेरील कारखान्यांनी गोदाकाठ परिसरातील ऊस सर्वात लवकर उचलण्याची घाई चालविली आहे. प्रामुखयाने नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गोदाकाठ भागातील ऊस मिळविण्यासाठी जादा दर देवून प्रयत्न चालविले आहे. खासगी कारखान्यांचे आव्हानउसाला हमीभाव मिळत असल्याने बव्हंशी शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देतात. पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असल्याने त्याचा लागवडीवर परिणाम होत आहे. ऊस नैसर्गिक आपत्तीला बळी पडत नाही, असा समज आहे. गारपीट किंवा तत्सम काही घटना घडली तरी उसाचे फार नुकसान होत नाही, असे शेतकºयांना वाटते. साखर कारखानदारीत दर देण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यात खासगी कारखान्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक