शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2019 00:42 IST

चांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.

ठळक मुद्देऊस मिळविण्यासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचांदोरी : निफाड तालुक्यातील संपूर्ण गोदाकाठ परिसरात ऊसतोडणीस प्रारंभ झाला असून, हजारो ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत.दरम्यान, निफाड व रानवड सहकारी साखर कारखाने बंद पडल्याने ऊस उत्पादकांना कादवा, पिंपळगाव निपाणी येथील गोदा कादवा, तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संजीवनी, अगस्ती व कोळपेवाडी येथील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. यंदाही जिल्ह्यातील उसासाठी नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रयत्न चालविले आहेत.निफाड तालुक्यातील चांदोरी येथे अनेक उसाचे खासगी व्यापारी असून, त्यांच्यामार्फत गुजरात, दिल्ली, राजस्थान येथे रसवंतीकरिता तसेच चांदोरी व पिंपळस येथील गूळ उद्योगास ऊस पाठविला जातो. त्यामुळे तालुक्यातील गोदाकाठ भागात उसाची व्यापारीपेठ निर्माण झाली आहे.यंदाच्या गळीत हंगामासाठी गोदाकाठ भागात ऊसतोडणीस प्रारंभ झाला आहे. तसेच जिल्ह्यात व नगर जिल्ह्यातील कारखान्यांना ऊस पोहोचविण्यासाठी चाळीसगाव, बीड, औरंगाबाद येथील ऊसतोडणी मजूर चांदोरी परिसरात दाखल झाले आहेत. साधारणत: सर्वच कारखान्याचे बॉयलर पेटले असून, दसरा झाल्यानंतर साखर कारखाने सुरू केले जातात. त्यानंतर अनेक महिने कारखान्यांचे गाळप सुरू असते. बहुतांश शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहाराचे गणित हे द्राक्ष व उसाच्या पिकांवर अवलंबून असते. त्यामुळे उसाला जास्त दर मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्ग करीत आहे. प्रामुख्याने, जादा दर देणाºया कारखान्यांना किंवा व्यापाऱ्यांना ऊस देण्याकडे शेतकºयांचा कल आहे, तर बाहेरील कारखान्यांनी गोदाकाठ परिसरातील ऊस सर्वात लवकर उचलण्याची घाई चालविली आहे. प्रामुखयाने नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गोदाकाठ भागातील ऊस मिळविण्यासाठी जादा दर देवून प्रयत्न चालविले आहे. खासगी कारखान्यांचे आव्हानउसाला हमीभाव मिळत असल्याने बव्हंशी शेतकरी ऊस लागवडीला प्राधान्य देतात. पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत असल्याने त्याचा लागवडीवर परिणाम होत आहे. ऊस नैसर्गिक आपत्तीला बळी पडत नाही, असा समज आहे. गारपीट किंवा तत्सम काही घटना घडली तरी उसाचे फार नुकसान होत नाही, असे शेतकºयांना वाटते. साखर कारखानदारीत दर देण्याची स्पर्धा वाढली आहे. त्यात खासगी कारखान्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNashikनाशिक