त्र्यंबकेश्वर : तालुका व परिसरात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीला तोंड देण्यासाठी पिंप्री (त्र्यंबक) येथे लोकसहभागातून किकवी नदीवर सुमारे ४३ लाख रुपये खर्चाच्या कोल्हापूर पद्धतीच्या (केटीवेअर) बंधाऱ्याची योजना साकारण्यात येत असून, या योजनेतून मिळणाऱ्या पाण्याचा उपयोग परिसरातील शेतीसाठी तसेच पिण्यासाठी होऊन हा भाग कायमस्वरूपी टंचाईमुक्त होईल, अशी अपेक्षा आहे.या योजनेचा शुभारंभ श्री निवृत्तिनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ.प. त्र्यंबकराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बहिरू पाटील मुळाणे, रामभाऊ मुळाणे, काळू वाघ, नामदेव भाडमुखे, काळू कुंदे, शिवराम कर्पे, दत्ता पारधी, वंदना तुपलोंढे, इंदूबाई भाडमुखे, अनिता कुंदे, कचरू घुले, यशोदा कुंदे, रामू घुले, सुरेश मुळाणे, रामदास कुंदे, सारिका कुंदे, सुभाष चोथे, शिवाजी वाघ, गंगाराम भाडमुखे, कचरू मुतडक, काळू वाघसरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)
‘किकवी’च्या कामास प्रारंभ
By admin | Updated: May 5, 2016 22:36 IST