शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 18:43 IST

कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर शनिवारपासून प्रारंभ झाला. श्रीराम नवमी अािण चैत्रोत्सवाला प्रारंभ यामुळे शनिवारी सप्तशृंग गडावर देवीभक्तांनी एकच गर्दी केली होती. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने मागील वर्षापेक्षा यंदा संख्या रोडावली, आज २५ हजार देवी भक्तांनी मनोभावे पूजा करु न देवीचरणी नतमस्तक झाले.

ठळक मुद्देकळवण : २५ हजार भक्त झाले देवीचरणी नतमस्तक

कळवण : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या सप्तशृंगगडावर चैत्रोत्सवास दुर्गाष्टमी व रामनवमीच्या मुहूर्तावर शनिवारपासून प्रारंभ झाला. श्रीराम नवमी अािण चैत्रोत्सवाला प्रारंभ यामुळे शनिवारी सप्तशृंग गडावर देवीभक्तांनी एकच गर्दी केली होती. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने मागील वर्षापेक्षा यंदा संख्या रोडावली, आज २५ हजार देवी भक्तांनी मनोभावे पूजा करु न देवीचरणी नतमस्तक झाले.सकाळीस जिल्हा व सत्र न्यायाधीश व श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टच्या अध्यक्ष श्रीमती यु. एम. नंदेश्वर, श्री सप्तश्रुंगी निवासनी देवी ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रावसाहेब शिंदे, प्राचार्या डा.ॅ उषा शिंदे, विश्वस्त राजेंद्र सूर्यवंशी, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाभळे, सामाजिक कार्यकर्ते संदीप बेनके पाटील, सरपंच राजेश गवळीसह विविध विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत महापूजा होऊन यात्रोत्सवास प्रारंभ झाला.आज रामनवमी असल्याने मंदिरात जाताना रामटप्प्यावरील श्रीराम मंदिरात दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी तीनला भगवतीच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. चैत्रोत्सव काळात रोज सकाळी सातला भगवतीची पंचामृत महापूजा होणार आहे.खान्देशातून देवी दर्शनासाठी आसुरलेले पाय मजल दरमजल करीत सप्तशृंग गडाकडे निघाल्याने जळगाव, धुळे, मालेगाव, सटाणा, कळवण, नांदूरी रस्त्यावरील पदयात्रेमुळे सप्तशृंगगडावर जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलू लागले आहेत. या देवीभक्तांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी गणेश मंडळे व कार्यकर्ते सरसावले आहे. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो देवीभक्तांनी सप्तशृंग मातेच्या चरणी लीन होवून दर्शन घेत आपली इच्छा प्रकट करु न आशीर्वाद मागितला.ऐन चैत्रातील रणरणत्या जवळपास ४० अंश डिग्री तापमानाच्या कडक उन्हात विविध वयोगटातील स्त्री-पुरु ष, अबालवृद्ध कसलीही पर्वा न करता उन्हाच्या झळा अंगावर घेत सप्तशृंग गडाकडे मार्गक्र मण करताना दिसून येत आहेत. शासन, प्रशासनाने व सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्ट, ग्रामपंचायत यांनी भाविकांना सर्व सुविधा देण्यासाठी नियोजन केले आहे.आदिमाया सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला उत्तर महाराष्ट्रातील देवी भक्तांमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. शेकडो वर्षांपासून परंपरेने चालत आलेला हा चैत्रोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दरवर्षी भाविकांची संख्या लक्षणीय वाढ होत आहे. चैत्रोत्सव कालावधीत उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्ती भावाने देवीचरणी नतमस्तक होतात.चैत्रोत्सवात होते भक्तांची वाढचैत्र मिहन्यात रामनवमीपासून ते चैत्र पौर्णिमेपर्यंत हा चैत्रोत्सव सुरू असतो. आदिमाया सप्तशृंगी देवीची दररोज पंचामृत पूजा केली जाते. गडावर येणारे भाविक नवस फेडत असतात. रामनवमीपासून सुरू होणारा हा उत्सव वाढत जावून पौर्णिमेपर्यंत भक्तांच्या गर्दीने उच्चांक गाठलेला असतो. या काळात मालेगाव, सटाणा, वसाका रोड,भेंडी फाटा, कळवण, नांदूरी या रस्त्यावर पायी चालणाºया भाविकांची वर्दळ जास्त असते. या भाविकांसाठी विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक मंडळे यांच्याकडून भक्तांसाठी पाणपोई, उसाचा रस, महाप्रसाद, भोजन दिले जावून भाविकांचे आदरातिथ्य राखले जात असल्याने ठिकठिकाणी त्याची पूर्व तयारी सुरु झाली आहे. डीजेच्या तालावर जगदंबेचा उदो उदो करीत अनेक भाविक आपआपल्या ग्रुपने सप्तशृंग गडाकडे मार्गस्थ झाला असून धुळे, अमळनेर, शिरपूर भागातील देवीभक्त आदिमायेचा जयजयकार करत डीजेच्या तालावर सप्तशृंगी देवीची गाणी लावून भगवतीचा जयजयकार करत देवी भक्त सप्तशृंग गडाच्या दिशेने पुढे सरकत आहे.चैत्रोत्सव काळात देवी मंदिर २४ तास भाविकांना दर्शनासाठी खुले राहणार असून सकाळी ११ ते रात्री १०.३० या कालावधीत श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टचे प्रसादालय भाविकांसाठी खुले राहणार आहे. तसेच भक्तनिवास, आरोग्यव्यवस्था उपलब्ध राहणार आहे. श्री सप्तशृंग निवासनी देवी ट्रस्टच्या माध्यमातून हंगामी कर्मचारी यात्राकाळात सेवा बजावतील, चैत्रोत्सवात भाविकांनी स्वच्छतेची काळजी घेत प्लास्टिक मुक्त यात्रा पार पाडावी. प्रशासनाला सहकार्य करून दर्शनाचा लाभ घ्यावा.-सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक,श्री सप्तश्रृंगी देवस्थान ट्रस्ट सप्तश्रुंग गड.