शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

एस.टीने 6 लाख भाविक त्र्यंबकला

By admin | Updated: September 13, 2015 22:22 IST

बसचे नियोजन : काहीकाळ वाहतूक विस्कळीत

नाशिक : शहर आणि शहरातील विविध भागांतून सायंकाळी ६ वाजेपर्यंत एस.टी. बसेसने त्र्यंबकेश्वरला सुमारे सहा लाख भाविकांची वाहतूक करण्यात आली. दुपारनंतर त्र्यंबकला जाणाऱ्या भाविकांचा वेग वाढल्याने प्रवासी संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. महामंडळाने त्र्यंबकेश्वरसाठी खास ३०० बसेसची व्यवस्था केली आहे. दुपारी १२ ते दुपारी १.३० या कालावधीत वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती; परंतु दीड वाजेनंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.राज्य परिवहन महामंडळाने त्र्यंबकेश्वरसाठी ३०० बसेसचे नियोजन केले होते. त्यानुसार जव्हारफाटा, विल्होळी, शहरातील मेळास्थानक, नाशिकरोड बसस्थानक, डोंगरे वसतिगृह, के. के. वाघ, संदीप पॉलिटेक्निक या वाहनतळांवरून प्रवासी वाहतूक करण्यात आली. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ७,७१९ फेऱ्या होऊन ४ लाख ७४ हजार भाविकांची वाहतूक करण्यात आली होती. त्र्यंबकेश्वरचा रस्ता सुरळीत झाल्यावर दुपारनंतर प्रवासी पोहचविण्याच्या कामाला गती आली. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुमारे सहा लाख भाविकांची वाहतूक करण्यात आली. त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या भाविकांची संख्या पाहता मेळास्थानकातून दर पाच मिनिटांनी त्र्यंबकेश्वरसाठी बसेस सोडण्यात येत होत्या. तसेच ग्रुप बुकिंग करणाऱ्यांना खास बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. याबरोबरच नाशिकरोड स्थानकातूनदेखील त्र्यंबकेश्वरसाठी थेट बसेस सोडण्यात आल्या होत्या. या भाविकांना त्र्यंबकेश्वर बसस्थानकावर सोडण्यात येत होते.