शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
4
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
5
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
6
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
7
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
8
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
9
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
10
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
11
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
12
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
13
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
14
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
15
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
16
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
17
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
18
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
19
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
20
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह

मदतीचे स्पिरीट दिसले, आता रोगराई नियंत्रणाचे आव्हान!

By किरण अग्रवाल | Updated: August 11, 2019 01:07 IST

यंदाच्या पूरपाण्याने यंत्रणांना खबरदारीचा धडा घालून दिला आहे. नाशिककरांनी माणुसकी धर्माचे पालन करीत आपद्ग्रस्तांना मदतीचा हात दिला; परंतु अशी वेळच येऊ नये म्हणून कठोर उपाययोजनांची गरज आहे. यंदा कोल्हापूर, सांगलीत जे पहावयास मिळाले ते आपल्याकडे होऊ द्यायचे नसेल तर आपत्ती संबंधीच्या उपायांकडे डोळेझाक करता येऊ नये.

ठळक मुद्देपूरपाण्याने डोळे उघडलेपूररेषा व धोकादायक वाड्यांचे प्रश्न त्वरित निकाली निघणे गरजेचे

सारांशगोदामाईच्या पूरपाण्याने यंदा चांगलीच दाणादाण उडवली व जीव टांगणीला लावला असला तरी संकटकाळी मदतीला धावून जाण्याचे नाशिककरांचेही स्पिरीट प्रकर्षाने दिसून आले. अर्थात, ‘ती’ घडी गेली असली तरी, उद्ध्वस्त मनांना धीर देण्याची गरज असून, आपत्तीच्या वेळी केल्या जाणाऱ्या बातांना अंमलबजावणीत आणून कायमस्वरूपी बांध-बंदिस्तीचे प्रयत्न होणे अपेक्षित आहेत.नाशिककरांसाठी पूरपरिस्थिती नवीन नाही. गोदावरी थेट शहराच्या मध्यवस्तीतूनच वाहत असल्याने जराही पूर आला, की गोदाकाठी उडणारी धावपळ व ओढवणारे नुकसान अपरिहार्य ठरलेले असते. यंदा तर कधी नव्हे अशी परिस्थिती बघावयास मिळाली. २००८ मधील पुरापेक्षाही भयंकर चित्र होते. नाशिककरांचा पूरमापक दुतोंड्या मारुती तर बुडालाच; पण नारोशंकराच्या घंटेलाही पाण्याने वेढले. अशात हाहाकार उडणे स्वाभाविक होते. पण, अडचणीच्या काळात धावून जाण्यासाठी ज्या मुंबई स्पिरीटची चर्चा होते, तेच नाशकातही अनुभवयास मिळाले. खुद्द पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे आदी अधिकारी तातडीने कार्यालयाबाहेर पडून समस्या जाणून घेताना दिसले. आमदार प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे याही पदर खोचून चिखल तुडवत मदतीला धावलेल्या दिसल्या. नाही म्हणायला एकीकडे गोदावरीला आलेला पूर पाहण्यासाठी पुलावर ‘सेल्फी’ काढणाºया ‘सेल्फीशां’ची गर्दी झालेली असताना, अनेक सामाजिक संस्था, व्यक्तींनी सरकारी आवाहनाची वाट न पाहता पूरग्रस्तांच्या जेवणाची, रहिवासाची काळजी वाहिली. बाजारपेठांमध्ये अडकलेल्यांचे साहित्य काढून देण्यासाठी अनेकजण सरसावलेले दिसले. आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी हा जो संवेदनांचा पूर वाहिलेला दिसून आला तो खरा माणुसकी धर्म जागवणारा ठरला. कोण कुठले, ओळखीचे ना पाळखीचे; पण सुस्थितीत बहुतेक जण एका ‘स्पिरीट’ने बिकटावस्थेतील बांधवांसाठी सरसावलेले दिसले. आपत्तीतली ही सुहृदयता सुखावहच म्हणायला हवी.अर्थात, वेळ निभावून गेली म्हणून निर्धास्त राहता येऊ नये. पुरामुळे नदीकाठी साचलेला गाळ तातडीने दूर करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे औषध फवारणी करून रोगराईला रोखण्याचे आव्हान आता महापालिका यंत्रणेपुढे आहे. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळलेले किंवा वाहून आलेले आहेत, दोन ते चार दिवस झालेत तरी ते हटविले गेलेले नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून रस्त्यावरील विजेचे दिवे बंद करण्यात आलेले होते, ते पूर्ववत सुरू झालेले नाहीत. तेव्हा या कामांमुळे अनारोग्याला व नवीन संकटाला निमंत्रण मिळण्याची शक्यता असल्याने त्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे आहे. येथे डास प्रतिबंधक धुरळणीच्या ठेक्यातच घोळ घातला जाताना दिसतो आहे. आहे त्यालाच मुदतवाढ देण्यासाठी अनेकांचा आटापिटा चाललेला दिसतो. अशात आपत्तीला इष्टापत्ती सिद्ध करू पाहणाऱ्यांचे फावणार असले तरी औषध फवारणी त्वरित होणे आवश्यक आहे.महत्त्वाचे म्हणजे, २००८ मधील महापुरानंतर पूररेषा निश्चित करण्यात आली होती. यंदाच्या महापुराने तर त्या रेषेचाही पुनर्विचार करण्याची गरज दर्शवून दिली आहे. पण मुळात, आहे त्या पूररेषेचेच पालन होताना दिसत नाही. महापालिकेच्या निकषांना झुगारून वा त्या रेषेला बासनात गुंडाळून बांधकामे होताना दिसत आहेत. शहरातील वाडेही कोसळत आहेत. सुदैवाने जीवितहानी नाही, म्हणून रस्त्याने चालणारा किंवा लगतचा कुणी त्यामुळे धोक्यात येणार नाही असे नाही; तेव्हा केवळ नोटिसांचे सोपस्कार करण्याऐवजी कठोर पावले उचलून त्याबाबत निर्णय घ्यायला हवा. क्लस्टरची योजना त्याकरिता विचाराधीन आहे; पण वाड्याखाली दबले जाऊन काही अघटित घडण्यापूर्वी त्याचा निर्णय अपेक्षित आहे. बहुसंख्य रस्ते खड्डेमय झाले आहेत. दुचाकी चालकांच्या कमरेतले व मानेचे मणके तुटण्यापूर्वी हे खड्डे बुजविले जायला हवे. यंदा सर्वत्रच पावसाचे पाणी तुंबले. उपनगर परिसरात जिथे ड्रेनेज लाइनच नाही, तिथे पावसाळी गटारींचा विचारच करता येऊ नये. परंतु यंदाची अतिवृष्टी पाहता ती बाबही दुर्लक्षिता येऊ नये. नवीन परिसरात पावसाळी गटारींचे काम हाती घ्यायला हवे. सखल भागातील रस्ते-पुलांची उंची वाढविण्याचाही विचार व्हायला हवा. असा पाऊस दरवर्षी नसतो, अपवादानेच येतो असे म्हणून उपाययोजनांकडे दुर्लक्ष होता कामा नये. आपत्ती व्यवस्थापनाचा विचार करताना जास्तीच्या उपाययोजना हव्यात. यंदाच्या पूरपाण्याने त्यासाठी डोळे उघडून दिले आहेत म्हणायचे.

टॅग्स :NashikनाशिकGovernmentसरकारNashik Floodनाशिक पूरgodavariगोदावरी