शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:35 IST

नाशिक : शहरवासीयांची दीर्घकालीन पाण्याची सोय करण्याबरोबरच मुंबई, दिल्ली औद्योगिक कॉरिडोअरसाठी शाश्वत उपलब्धता देणाºया एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात नियुक्त अधिकाºयांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन माहिती घेतली. सदरचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असल्या तरी डिसेंबर महिन्यापर्यंतच अहवाल पूर्ण करण्याबाबत अधिकाºयांनी आश्वस्त केले आहे.

ठळक मुद्देडीपीआरसाठी बैठक डिसेंबरपर्यंत अहवाल सादर

नाशिक : शहरवासीयांची दीर्घकालीन पाण्याची सोय करण्याबरोबरच मुंबई, दिल्ली औद्योगिक कॉरिडोअरसाठी शाश्वत उपलब्धता देणाºया एकदरे धरणाच्या प्रस्तावाला गती मिळाली असून, त्याचा विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासंदर्भात नियुक्त अधिकाºयांनी नाशिकमध्ये बैठक घेऊन माहिती घेतली. सदरचा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना असल्या तरी डिसेंबर महिन्यापर्यंतच अहवाल पूर्ण करण्याबाबत अधिकाºयांनी आश्वस्त केले आहे.नाशिककर हक्काच्या पाण्याबाबत जागृक झाल्यानंतर दमणगंगा तसेच नार-पार प्रकल्पांचे पाणी नाशिकला वळवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. त्या दरम्यान पेठ तालुक्यात एकदरे धरणाचा विषय पुढे आला. खासदार हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे राजेंद्र जाधव यांनी शासनाकडे याबाबत व्यवहार्य भूमिका मांडली होती. त्यातून दमणगंगा एकदरे लिंक प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली जात आहे. दमणगंगा नदीवर पेठ तालुक्यातील एकदरे पाच हजार दक्षलक्ष घनफूट क्षमतेचे धरण बांधण्यात येणार आहे. आठ किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनद्वारे २१० मीटर उपसा करून उमरद गावाजवळ खिरा डोंगरावर हे पाणी आणण्यात येणार आहे. तेथून ५.५ किलो मीटर लांबीच्या बोगद्याद्वारे गंगापूर धरणात हे पाणी आणण्यात येणार आहे. त्यमाुळे पिण्यास, उद्योगास आणि सिंचनास पाणी उपलब्ध होणार असून त्यास तत्त्वत: मान्यता मिळल्यानंतर राष्टÑीय जलविकास अभिकरणाला विस्तृत प्रकल्प अहवाल बनविण्याचे काम देण्यात आले आहे. या अभिकरणाचे हैदराबाद येथील मुख्य अभियंता एन. श्रीनिवासन, कार्यकारी अभियंता डी. के. शर्मा यांनी नाशिकमध्ये भेट दिली तसेच सिंचन भवनमध्ये बैठक घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता कुलकर्णी, कार्यकारी अभियंता मोरे जलचिंतनचे राजेंद्र जाधव यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी उपलब्ध धरणे तसेच प्रस्तावित धरणे याचा विचार करून कमीत कमी भूसंपादन त्यामुळे कमीत कमी पुनर्वसन करतानाच प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा तसेच वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या. मार्च महिन्यापर्यंत सदरचा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालावधी असला तरी डिसेंबर महिन्यापर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाºयांनी सांगितले.राष्टÑीय नद्याजोड प्रकल्पाअंतर्गत एकदरे आणि सिन्नर गारगोई-वैतरणा- कडवा-देवनदी लिंक प्रकल्पासह एकूण चार प्रकल्पांचा समावेश करण्याचे आश्वासन केंद्रीय जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहे. एकदरे प्रकल्प झाल्यास नाशिक शहरासाठी २५०० दशलक्षघनफूट, तर सिंचनासाठी दीड हजार दशलक्षघनफूट पाणी उपलब्ध होणार आहे. केवळ पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कोरिडोअर नाशिकमधून स्थलांतरित करण्यात आले होते. परंतु आता या पाण्यामुळे दुसºया टप्प्यातील नाशिकचा समावेश निश्चित झाला आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. सौरऊर्जेवर पाण्याचा उपसाएकदरे प्रकल्पासाठी ३२ तसेच सिन्नर तालुक्यातील गारगोई-वैतरणा-कडवा- देव नदी लिंक प्रकल्पात पाणी उपसा करण्यासाठी ३५ मेगावॉट वीज लागणार आहे. धरण पूर्ण झाल्यानंतर त्यासाठी मोठा खर्च येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर सौरऊर्जेवर पाण्याचा उपसा करण्यासाठी सौरऊर्जेचा वापर करावा, अशी सूचना यावेळी करण्यात आली आहे.