शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

श्रमिकांसाठी १५ जून पर्यंत विशेष रेल्वे सुरू ठेवाव्या : मेधा पाटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 20:40 IST

सध्या कोरोनापेक्षा अडचणीच्या ठरलेल्या स्थलांतरीत मजुर आणि अन्य श्रमिकांच्या विषयावर त्यांनी झुम अ‍ॅपव्दारे पत्रकार परिषद घेतली आणि विविध विषयांवर भूमिका मांडल्या.

ठळक मुद्देकामगार कायद्यातील बदलांना विरोधलॉकडाऊन काळात भ्रष्टाचार

नाशिक - लॉक डाऊन आणि संचार बंदीमुळे लाखो श्रमिक त्यांच्या मुळ गावी जात आहेत. केंद्र शासनाने त्यांच्यासाठी विशेष रेल्वे सोडल्या असल्या तरी त्या अशाप्रकारच्या विशेष रेल्वे १५ जुन पर्यंत सुरू ठेवाव्या आणि श्रमिकांना त्यांच्या मुळ गावी जाऊ द्यावे अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केली आहे.सध्या कोरोनापेक्षा अडचणीच्या ठरलेल्या स्थलांतरीत मजुर आणि अन्य श्रमिकांच्या विषयावर त्यांनी झुम अ‍ॅपव्दारे पत्रकार परिषद घेतली आणि विविध विषयांवर भूमिका मांडल्या. विशेषत: श्रमिकांच्या व्यथा त्यांनी मांडल्या. रोजगार सुरू होण्याचा विश्वास नसल्याने श्रमिकांना पायपीट करीत घरी जावे लागले. त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारे बस आणि अन्य सुिवधा नव्हत्या. जवळील पैसे वाहतूकदारांना देऊन अनेक श्रमिक घरी पोहोचले तर अनेकांनी रस्त्यातच मृत्यूला कवटाळले. त्यानंतर त्यांच्यासाठी रेल्वे आणि बस सेवा सुरू झाली असली तरी यासंदर्भात शासकिय यंत्रणांमध्ये कोणत्याही प्रकारचा समन्वय नव्हता. महाराष्टÑातून सोडलेल्या बस या मध्य प्रदेशच्याकोणत्या हद्दीवर न्याव्यात हे देखील अनेकांना माहिती नव्हते, त्यातून गोंधळ उडाला. आता विशेष रेल्वे सेवा सुरू असली तरी ती बंद न करता किंवा १ जून पासून प्रवासी भाडे न आकारता ही सेवा १५ जून पर्यंत सुरूच ठेवावी अशीमागणी त्यांनी केली. स्थलांतरीत मजुरांसंदर्भातील नोंदी नसणे आणि अन्य अनेक समस्या या काळातआढळल्या. बांधकाम व्यवसायिक आणि उद्योजकांनी त्यांची कायदेशीर जबाबदारी म्हणून या श्रमिकांचा सांभाळ करणे आवश्यक होते परंतु तो न केल्याने किंवाकाही ठिकाणी श्रमिकांना स्थलांतरासही मज्जाव झाला. त्यामुळे अशाव्यवसायिकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने रेशन कार्ड नसलेल्यांना देखील धान्य देण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून दिली आहे, शिवाय त्यांनीकोणतीही आर्थिक ततरूद त्यासाठी केलेली नाही. तरीही १ जून पासून सार्वजनिक वितरण प्रणालीतून सर्व श्रमिकांना धान्य द्यावे, अशी मागणीही पाटकर यांनी केली. सुनीती सुर, साधना दधीच आदी देखील यात सहभागी झाल्या होत्या.कामगार कायदे बदलण्यास विरोधलॉक डाऊनच्या काळात केंद्र सरकारने कामगार कायद्यात अनेक बदल केले असून ते घातक आहेत. भ्रष्टाचार व शोषण वाढवणारे आहेत. ते त्वरीत रद्द करावेत अन्यथ कामगार संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा पाटकर यांनी दिला आहे.लॉक डाऊन काळात भ्रष्टाचारलॉक डाऊन काळात शासकिय व्यवस्थेत भ्रष्टाचार वाढला आहे. अगदी श्रमिकांना घरी पाठविण्यासाठी देखील एजंट तयार झाले होते असे सांगून मेधा पाटकर यांनी संबंधीत मंत्र्यांनी यासंदर्भात वेळीच दखल घ्यावी असा इशारा त्यांनी दिला.

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस