शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांच्या ‘त्रिसूत्री’विरोधी संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:18 IST

स्थायी समिती बैठक : विकासकामे रोखल्याने सदस्य संतप्त

ठळक मुद्देयापूर्वी झालेली कामे चुकीची होती काय, असा सवाल करत सभापतींसह सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारलानूतन आयुक्तांकडून विकासकामांचे प्रस्ताव थांबविले जात असल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त

नाशिक : महापालिकेत विकासकामांसाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लावलेल्या ‘त्रिसूत्री’ विरोधात स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. यापूर्वी झालेली कामे चुकीची होती काय, असा सवाल करत सभापतींसह सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. नाशिक हे नवी मुंबई नाही, असाही टोला लगावत सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या गरजेची कामे व्हायलाच हवीत, असा पवित्रा घेतला तर शिवसेना सदस्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.‘स्थायी’वरील विद्यमान समितीची मुदत २८ फेबु्रवारीला संपुष्टात आली. त्यामुळे बुधवारी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा घेण्यात आली. सभेत अंदाजपत्रकाला झालेल्या विलंबाबद्दल चर्चा सुरू असतानाच सदस्यांनी नूतन आयुक्तांकडून विकासकामांचे प्रस्ताव थांबविले जात असल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या आणि प्रशासनाला जाब विचारला. शिवसेनेचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी नगरसेवक निधीसाठी अंदाजपत्रकात तरतूद असूनही विकासकामे रोखण्यात आल्याबद्दल विचारणा केली. त्याबद्दल स्पष्टीकरण देताना मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी सांगितले, आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व कामांचा आढावा घेतला असता त्यात अनेक कामांना निधी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कामांची गरज, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता तपासूनच सदर कामे केली जाणार आहेत तर अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले, आयुक्तांनी ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीनुसार कामे केली जातील. स्पीलओव्हर ८०० कोटीच्या वर गेला आहे. त्यामुळे कामांची गरज लक्षात घेऊन येणाºया अंदाजपत्रकात काही कामांचा अंतर्भाव करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भागवत आरोटे यांनी कार्यादेश दिलेल्या कामांचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला असता, पवार यांनी त्रिसूत्रीनुसारच कामे होतील, याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले, लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे होणार नाहीत आणि प्रशासन सांगेल तेच होईल, हा मनमानी कारभार चालणार नाही. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. कामे थांबविली म्हणजे यापूर्वीच्या आयुक्तांनी चुकीची कामे केली काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे