शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

तुकाराम मुंढे यांच्या ‘त्रिसूत्री’विरोधी संघर्षाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:18 IST

स्थायी समिती बैठक : विकासकामे रोखल्याने सदस्य संतप्त

ठळक मुद्देयापूर्वी झालेली कामे चुकीची होती काय, असा सवाल करत सभापतींसह सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारलानूतन आयुक्तांकडून विकासकामांचे प्रस्ताव थांबविले जात असल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त

नाशिक : महापालिकेत विकासकामांसाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी लावलेल्या ‘त्रिसूत्री’ विरोधात स्थायी समितीच्या बैठकीत तीव्र पडसाद उमटले. यापूर्वी झालेली कामे चुकीची होती काय, असा सवाल करत सभापतींसह सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला. नाशिक हे नवी मुंबई नाही, असाही टोला लगावत सदस्यांनी कोणत्याही परिस्थितीत नागरिकांच्या गरजेची कामे व्हायलाच हवीत, असा पवित्रा घेतला तर शिवसेना सदस्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.‘स्थायी’वरील विद्यमान समितीची मुदत २८ फेबु्रवारीला संपुष्टात आली. त्यामुळे बुधवारी सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या कारकिर्दीतील अखेरची सभा घेण्यात आली. सभेत अंदाजपत्रकाला झालेल्या विलंबाबद्दल चर्चा सुरू असतानाच सदस्यांनी नूतन आयुक्तांकडून विकासकामांचे प्रस्ताव थांबविले जात असल्याबद्दल संतप्त भावना व्यक्त केल्या आणि प्रशासनाला जाब विचारला. शिवसेनेचे सदस्य प्रवीण तिदमे यांनी नगरसेवक निधीसाठी अंदाजपत्रकात तरतूद असूनही विकासकामे रोखण्यात आल्याबद्दल विचारणा केली. त्याबद्दल स्पष्टीकरण देताना मुख्य लेखाधिकारी सुभाष भोर यांनी सांगितले, आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर सर्व कामांचा आढावा घेतला असता त्यात अनेक कामांना निधी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कामांची गरज, तांत्रिक योग्यता आणि व्यवहार्यता तपासूनच सदर कामे केली जाणार आहेत तर अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले, आयुक्तांनी ठरवून दिलेल्या त्रिसूत्रीनुसार कामे केली जातील. स्पीलओव्हर ८०० कोटीच्या वर गेला आहे. त्यामुळे कामांची गरज लक्षात घेऊन येणाºया अंदाजपत्रकात काही कामांचा अंतर्भाव करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी भागवत आरोटे यांनी कार्यादेश दिलेल्या कामांचे काय करणार, असा प्रश्न उपस्थित केला असता, पवार यांनी त्रिसूत्रीनुसारच कामे होतील, याचा पुनरुच्चार केला. त्यामुळे सदस्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी सांगितले, लोकप्रतिनिधींनी सांगितलेली कामे होणार नाहीत आणि प्रशासन सांगेल तेच होईल, हा मनमानी कारभार चालणार नाही. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. कामे थांबविली म्हणजे यापूर्वीच्या आयुक्तांनी चुकीची कामे केली काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढे