शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणांचे दर ९०० रुपयांपर्यंत वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

दरम्यान, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेउन यावर्षी सोयाबीन बियाणे विकताना विक्रेत्यांनी सावध पवित्रा घेत उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याचा निर्णय ...

दरम्यान, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेउन यावर्षी सोयाबीन बियाणे विकताना विक्रेत्यांनी सावध पवित्रा घेत उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनचे बोगस बियाणे निघाल्यामुळे मागीलवर्षी अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली, काहींना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करूनही काहींच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याने यावर्षी सोयाबीन बियाणांच्या उपलब्धतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १९ हजार २१० क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी करण्यात आली होती. मेअखेरपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ९३८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यात खासगी आणि शासकीय दोन्ही बियाणांचा समावेश आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने आणि गेल्या काही महिन्यात सोयाबीनला मिळणारा भाव पाहता, यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता असल्याने बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

चौकट-

प्रमुख कंपन्यांच्या बियाणांच्या किमती (३० कि. गोणी)

कंपनी २०२० २०२१

इगल सीड्‌स‌ २४५० ३१२५

ग्रीन गोल्ड २८०० ३२४०

महाबीज २२५० २२५०

कृषी धन २९०० ३३००

अंकुर २८५० ३३००

कोट-

जिल्ह्यात सध्या सर्वत्र बियाणे उपलब्ध आहे. पाऊस पडल्यानंतर मात्र खरेदी सुरू झाल्यानंतर टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेत असलो तरी, ते आमच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आहे. त्यातून शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रश्न नाही. अनेक शेतकरी हमीपत्र भरून देत नाहीत, पण त्यांना बियाणे दिले जाते.

- अरुण मुळाणे, उपाध्यक्ष, नाडा

चौकट-

पुरेसा पाऊस झाल्यावरच करा पेरणी

गतवर्षी सोयाबीन बियाणे माेठ्या प्रमाणात बोगस निघाल्याने अनेक शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला होता. यावर्षी बियाणे पेरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्याची उगवण क्षमता तपासावी. यासाठी कृषी विभागामार्फत प्रात्याक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पुरेसा पाऊस झाल्यावरच परेणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.