शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाणांचे दर ९०० रुपयांपर्यंत वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:12 IST

दरम्यान, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेउन यावर्षी सोयाबीन बियाणे विकताना विक्रेत्यांनी सावध पवित्रा घेत उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याचा निर्णय ...

दरम्यान, गतवर्षीचा अनुभव लक्षात घेउन यावर्षी सोयाबीन बियाणे विकताना विक्रेत्यांनी सावध पवित्रा घेत उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून हमीपत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे. सोयाबीनचे बोगस बियाणे निघाल्यामुळे मागीलवर्षी अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया गेली, काहींना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करूनही काहींच्या उत्पादनावरही परिणाम झाल्याने यावर्षी सोयाबीन बियाणांच्या उपलब्धतेवर प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १९ हजार २१० क्विंटल सोयाबीन बियाणांची मागणी करण्यात आली होती. मेअखेरपर्यंत जिल्ह्यात १३ हजार ९३८ क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. यात खासगी आणि शासकीय दोन्ही बियाणांचा समावेश आहे. यावर्षी चांगल्या पावसाचा अंदाज असल्याने आणि गेल्या काही महिन्यात सोयाबीनला मिळणारा भाव पाहता, यावर्षी सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता असल्याने बियाणांचा तुटवडा निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी बियाणांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

चौकट-

प्रमुख कंपन्यांच्या बियाणांच्या किमती (३० कि. गोणी)

कंपनी २०२० २०२१

इगल सीड्‌स‌ २४५० ३१२५

ग्रीन गोल्ड २८०० ३२४०

महाबीज २२५० २२५०

कृषी धन २९०० ३३००

अंकुर २८५० ३३००

कोट-

जिल्ह्यात सध्या सर्वत्र बियाणे उपलब्ध आहे. पाऊस पडल्यानंतर मात्र खरेदी सुरू झाल्यानंतर टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. उगवण क्षमतेबाबत शेतकऱ्यांकडून हमीपत्र भरून घेत असलो तरी, ते आमच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने आहे. त्यातून शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा प्रश्न नाही. अनेक शेतकरी हमीपत्र भरून देत नाहीत, पण त्यांना बियाणे दिले जाते.

- अरुण मुळाणे, उपाध्यक्ष, नाडा

चौकट-

पुरेसा पाऊस झाल्यावरच करा पेरणी

गतवर्षी सोयाबीन बियाणे माेठ्या प्रमाणात बोगस निघाल्याने अनेक शेतकऱ्यांचा खर्च वाया गेला होता. यावर्षी बियाणे पेरण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्याची उगवण क्षमता तपासावी. यासाठी कृषी विभागामार्फत प्रात्याक्षिके घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. पुरेसा पाऊस झाल्यावरच परेणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.