शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

रब्बीच्या पेरण्या संथच अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या

By admin | Updated: November 10, 2014 23:58 IST

रब्बीच्या पेरण्या संथच अवघ्या तीन टक्के क्षेत्रावर पेरण्या

 नाशिक : नोव्हेंबरचा दुसरा आठवडा सुरू झाला तरी रब्बी हंगामाच्या पेरण्यांना अपेक्षित अशी गती आलेली नाही. रब्बीचे सरासरी क्षेत्र एक लाख ३२ हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी अवघ्या चार हजार ३५९ (तीन टक्के) हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्'ात रब्बीचे सरासरी क्षेत्र एक लाख ३२ हजार ५०० हेक्टर असून, त्यात सर्वाधिक क्षेत्र गहू व हरभरा पिकांचे आहे. रब्बी ज्वारीचे सरासरी पेरणी क्षेत्र १० हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी एक हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर रब्बी ज्वारी पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. रब्बी गव्हाचे क्षेत्र ७६ हजार ७०० हेक्टर असून, त्यापैकी एक हजार २११ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. तसेच मका पिकाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र दोन हजार ५०० हेक्टर असून, त्यापैकी प्रत्यक्ष ४२ हेक्टरवरच पेरण्या झाल्या आहेत. हरभरा पिकाचे ४० हजार ८०० हेक्टर क्षेत्र असून, त्यापैकी प्रत्यक्ष एक हजार ९७८ हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. त्यातही सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आदि तालुक्यांत रब्बीच्या पेरण्याच झालेल्या नाहीत. नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात आणि डिसेंबरच्या पूर्वाधात रब्बीच्या पेरण्या आटोपण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)