शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

जिल्ह्यात महिनाभरात अवघी ९७ हजार हेक्टरवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 01:41 IST

पावसाळा सुरू होऊन महिना झाला असला तरी जून महिन्यात जिल्ह्यात अवघ्या ९७०३७.५४ हेक्टरवर (१४.५८ टक्के ) खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे एकूण ६ लाख ६५ हजार ५८२.२० हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. खरिपात बहुसंख्य शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली असल्याचे दिसते.

ठळक मुद्देपावसाअभावी रखडल्या पेरण्या : मका, सोयाबीन, कापसाला पसंती

नाशिक : पावसाळा सुरू होऊन महिना झाला असला तरी जून महिन्यात जिल्ह्यात अवघ्या ९७०३७.५४ हेक्टरवर (१४.५८ टक्के ) खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. जिल्ह्यात खरिपाचे एकूण ६ लाख ६५ हजार ५८२.२० हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरण्यात आले आहे. खरिपात बहुसंख्य शेतकऱ्यांनी मक्याला पसंती दिली असल्याचे दिसते. ४७ हजार ३९५ हेक्टरवर मक्याची पेरणी पूर्ण झाली असून, ७०९५ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा पूर्ण झाला आहे. जिल्ह्यात सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस झाला त्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने त्याचा पेरण्यांना फटका बसला आहे. अद्याप पेरण्यांना म्हणावा तसा वेग आलेला नाही. मागील सप्ताहात येवला, निफाड, नाशिक, इगतपुरी, सिन्नर, आदी तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली यामुळे सध्या या परिसरात पेरण्यांना वेग आला असल्याचे दिसून येत आहे. येत्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावल्यानंतर किमान निम्मी तरी पेरणी पूर्ण होईल असा अंदाज वर्तविला जात आहे.

खरिपाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, सायाबीन, भुईमूग, आदी पिकांची थोड्याफार प्रमाणात पेरणी केली आहे. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २०३१२.२० हेक्टरवर कापूस, १०७९३.६१ हेक्टरवर तेलबिया, ७८५६ हेक्टरवर डाळवर्गीय, तर ५८०७५ हेक्टरवर तृणधान्य, तर ६५९३१ हेक्टरवर अन्नधान्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. मका, सोयाबीन, भुईमूग, मूग या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना पोळ कांदे करायचे आहेत त्यांनी सध्या मुगाची पेरणी केली असून, मूग निघाल्यानंतर त्वरित कांद्यासाठी रान मोकळे होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

 

 

 

 

चौकट-

सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांची पाठ

जिल्ह्यात काही भागात सूर्यफुलाची लागवड होत होती; मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. सूर्यफुलासाठी ३६ हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरलेले असले तरी अद्याप एकाही ठिकाणी सूर्यफुलाची लागवड करण्यात आलेली नाही. तर तिळाची अवघी ०.११ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांदा दराकडे लक्ष ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कांद्यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवले आहे.

चौकट -

जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी

एकूण तृणधान्य - १३.०३

डाळी -९.२८

एकूण अन्नधान्य - १२.४३

एकूण तेलबिया - ११.३९

कापूस - ५०.३७

एकूण खरीप पेरणी - १४.५८

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरीagricultureशेती