शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
6
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
7
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
8
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
9
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
10
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
11
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
12
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
13
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
14
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
15
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
16
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
17
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
18
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
19
वयोवृद्ध जोडपं दहशतवाद्याशी भिडलं, अखेरीस एकमेकांच्या मिठीत सोडले प्राण, बोरिस आणि सोफियाची थरारक कहाणी
20
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीच्या २३ टक्केच पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 00:42 IST

नाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात जेमतेम २३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या असून, अजून आठ ते दहा दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास रब्बी पिकांऐवजी शेतकऱ्यांना भाजीपाल्या-शिवाय पर्याय राहणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देउत्पादन घटणार : शेतकऱ्यांचा भर भाजीपाल्याकडे; हरबºयाला उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात जेमतेम २३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या असून, अजून आठ ते दहा दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास रब्बी पिकांऐवजी शेतकऱ्यांना भाजीपाल्या-शिवाय पर्याय राहणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.दरवर्षी खरिपाचा हंगाम आटोपताच शेतकºयांकडून आॅक्टोबर-अखेरीस रब्बीची तयारी करताना शेतीची मशागतीचे कामे केली जात व नोव्हेंबर महिन्यात रब्बीची लागवड पूर्ण करून डिसेंबरच्या थंडीत पिकांना पोषक वातावरण मिळत असे. यंदा मात्र खरिपाबरोबरच रब्बीचा हंगामदेखील लांबणीवर पडला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्यात जुलै, आॅगस्टपर्यंत करण्यात आल्या, त्यामुळे साहजिकच खरिपाचा हंगाम आॅक्टोबरअखेरपर्यंत लांबला. शेतातील पिके काढणीला आलेली असतानाच जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दहा ते पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्यामुळे खरिपाची पिके शेतातच जमीनदोस्त झाली तर जी काही काढून ठेवलेली पिके होती ती खळ्यातच भिजली. पावसाचा तडखा इतका जबरदस्त होता की, शेतकºयाच्या शेतात पाणी शिरून तळे साचले. पाऊस थांबल्यानंतरही कडाक्याचे ऊन पडले नाही त्यामुळे शेती भिजलेलीच राहिली. परिणामी शेतीतील आवरासावर करण्यातच शेतकरी व्यस्त झाला त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रब्बीच्या पेरणी करण्यासाठी त्याला वेळ व मशागत केलेली शेती न मिळाल्याने लागवड लांबणीवर पडली. यंदा मात्र पेरणी लांबणीवर पडल्यामुळे हरभºयाची लागवड आता होऊ शकत नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरणीखालील जमिनीवर नजीकच्या काळात भाजीपाला घेण्याशिवाय दुसरा पर्यायही शिल्लक दिसत नाही. एरव्ही नोव्हेंबरअखेरीस रब्बीची पेरण्या करून शेतकरी निर्धास्त होत असताना यंदा मात्र डिसेंबरचा पहिला आठवडा उलटत असताना जिल्ह्यातील एक लाख ३१ हजार १६१ हेक्टर रब्बीच्या क्षेत्रापैकी जेमतेम २६ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याचे प्रमाण २३ टक्केइतकेच असून, गेल्यावर्षी हे प्रमाण दुप्पटीने होते. सध्याचे हवामान पाहता, गव्हाच्या लागवडीसाठी अनुकूल वातावरण असले तरी, रब्बीचे प्रमुख पीक हरभरा आहे; परंतु त्याची पेरणी नोव्हेंबरमध्येच होणे आवश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक