शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रब्बीच्या २३ टक्केच पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 00:42 IST

नाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात जेमतेम २३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या असून, अजून आठ ते दहा दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास रब्बी पिकांऐवजी शेतकऱ्यांना भाजीपाल्या-शिवाय पर्याय राहणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देउत्पादन घटणार : शेतकऱ्यांचा भर भाजीपाल्याकडे; हरबºयाला उशीर

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात जेमतेम २३ टक्केच पेरण्या होऊ शकल्या असून, अजून आठ ते दहा दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास रब्बी पिकांऐवजी शेतकऱ्यांना भाजीपाल्या-शिवाय पर्याय राहणार नसल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.दरवर्षी खरिपाचा हंगाम आटोपताच शेतकºयांकडून आॅक्टोबर-अखेरीस रब्बीची तयारी करताना शेतीची मशागतीचे कामे केली जात व नोव्हेंबर महिन्यात रब्बीची लागवड पूर्ण करून डिसेंबरच्या थंडीत पिकांना पोषक वातावरण मिळत असे. यंदा मात्र खरिपाबरोबरच रब्बीचा हंगामदेखील लांबणीवर पडला आहे. मान्सूनचे आगमन उशिरा झाल्यामुळे खरिपाच्या पेरण्यात जुलै, आॅगस्टपर्यंत करण्यात आल्या, त्यामुळे साहजिकच खरिपाचा हंगाम आॅक्टोबरअखेरपर्यंत लांबला. शेतातील पिके काढणीला आलेली असतानाच जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली. सलग दहा ते पंधरा दिवस पावसाने झोडपून काढल्यामुळे खरिपाची पिके शेतातच जमीनदोस्त झाली तर जी काही काढून ठेवलेली पिके होती ती खळ्यातच भिजली. पावसाचा तडखा इतका जबरदस्त होता की, शेतकºयाच्या शेतात पाणी शिरून तळे साचले. पाऊस थांबल्यानंतरही कडाक्याचे ऊन पडले नाही त्यामुळे शेती भिजलेलीच राहिली. परिणामी शेतीतील आवरासावर करण्यातच शेतकरी व्यस्त झाला त्यामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रब्बीच्या पेरणी करण्यासाठी त्याला वेळ व मशागत केलेली शेती न मिळाल्याने लागवड लांबणीवर पडली. यंदा मात्र पेरणी लांबणीवर पडल्यामुळे हरभºयाची लागवड आता होऊ शकत नाही. त्यामुळे रब्बीच्या पेरणीखालील जमिनीवर नजीकच्या काळात भाजीपाला घेण्याशिवाय दुसरा पर्यायही शिल्लक दिसत नाही. एरव्ही नोव्हेंबरअखेरीस रब्बीची पेरण्या करून शेतकरी निर्धास्त होत असताना यंदा मात्र डिसेंबरचा पहिला आठवडा उलटत असताना जिल्ह्यातील एक लाख ३१ हजार १६१ हेक्टर रब्बीच्या क्षेत्रापैकी जेमतेम २६ हजार ९४५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याचे प्रमाण २३ टक्केइतकेच असून, गेल्यावर्षी हे प्रमाण दुप्पटीने होते. सध्याचे हवामान पाहता, गव्हाच्या लागवडीसाठी अनुकूल वातावरण असले तरी, रब्बीचे प्रमुख पीक हरभरा आहे; परंतु त्याची पेरणी नोव्हेंबरमध्येच होणे आवश्यक आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNashikनाशिक